Category: पालघर

palghar news

Heading – सरपंच अभिजीत देसक यांच्यावरील कारवाईवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब Slug – जिल्हाधिकारी व अतिरीक्त विभागीय आयुक्तांची अपात्रतेची कारवाई कायम पालघरः डहाणू तालूक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत देसक यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून देसक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिजीत देसक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले होते. अतिक्रमणामुळे त्यांचे  सरपंचपद धोक्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती. अपिलामागून अपिले जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत देसक यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. त्या विरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केले. अतिरीक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी देसक यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. तेथेही देसक यांच्या विरोधाची अपात्रतेची कारवाई कायम राहिली. त्या विरोधात देसक यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. एका जागेवर नव्हे, तर दोन जागांवर अतिक्रमण उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी देसक यांनी सर्वे क्रमांक ३६ मध्ये आपली जमीन नसून ती सर्वे नंबर आठमध्ये आहे, आपल्या आजोबांना सरकारने ही जमीन दिली होती आणि त्यावर आपण घर आणि गाळे बांधले आहेत, अतिक्रमण केलेलेच नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांमार्फत केला. डहाणूच्या तहसीलदारांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे, सर्वे नंबर ३६ मधील बांधकामाला नोटीस दिलेली असताना प्रत्यक्षात आपले  बांधकाम सर्वे क्रमांक आठमध्ये असल्याचा पवित्रा देसक यांच्या वतीने घेण्यात आला होता. पितळ उघडे उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयांचे वेगवेगळे निकाल उद्भूत करण्यात आले. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड मागवून त्याची तपासणी करण्यात आली. न्यायालयापुढे देसक यांच्या वकिलांनी, प्रतिवादीच्या वकिलांनी बाजू मांडली. मंडळ अधिकारी यांनी दिलेला अहवाल न्यायालयाने तपासला. ग्रामपंचायतीने दिलेल्या पावतीचा आधार देसक यांनी घेतला. घर क्रमांक ३४ हे सर्वे नंबर आठ मध्ये असून हे घर तसेच सर्वे नंबर ३६ मधील अतिक्रमण ही बेकायदेशीर असल्याचे या वेळी निष्पन्न झाले. या नियमानुसार कारवाई दोन्ही अतिक्रमणे सरकारी जागेवर असल्याने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत कायदा १९५८ च्या कलम १४ (१) (ज ३) नुसार केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.  जिल्हाधिकारी तसेच अतिरीक्त विभागीय आयुक्तांनी देसक यांना अपात्र ठरवण्याची केलेली कारवाई नियमानुसार असून या विरोधात देसक यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अपात्रतेच्या कारवाईवर शिक्का मोर्तब झाला आहे.   अन्य अतिक्रमणधारक पदाधिकाऱ्यांचे दणाणले धाबे देसक यांना या निर्णयाने चांगलाच धक्का बसला असून पालघर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवर निवासस्थाने किंवा व्यापारी संकुले बांधून तेथे राहणाऱ्या किंवा नफा कमवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समित्यांचे  सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना  तसेच नगरसेवकांना त्यातून चांगलाच धडा मिळणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. यांनी पाहिले काम या प्रकरणात देसक यांच्या वतीने ॲड. एस.एस. रेडेकर, योगेश राऊळ, नितीन भोईर, प्रवदा राऊत आणि मोहिनी थोरात यांनी, तर प्रतिवादी जानी शंकर वरठा यांच्या वतीने प्राजक्त अर्जुन वाडकर, प्रथमेश हंड, जुई घरत यांनी काम पाहिले.

जिल्हाधिकारी व अतिरीक्त विभागीय आयुक्तांची अपात्रतेची कारवाई कायम पालघरः डहाणू तालूक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत देसक यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून देसक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिजीत देसक यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले होते. अतिक्रमणामुळे त्यांचे  सरपंचपद धोक्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती. अपिलामागून अपिले जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत देसक यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. त्या विरोधात देसक यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्तांकडे अपील केले. अतिरीक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी देसक यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. तेथेही देसक यांच्या विरोधाची अपात्रतेची कारवाई कायम राहिली. त्या विरोधात देसक यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. एका जागेवर नव्हे, तर दोन जागांवर अतिक्रमण उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी देसक यांनी सर्वे क्रमांक ३६ मध्ये आपली जमीन नसून ती सर्वे नंबर आठमध्ये आहे, आपल्या आजोबांना सरकारने ही जमीन दिली होती आणि त्यावर आपण घर आणि गाळे बांधले आहेत, अतिक्रमण केलेलेच नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांमार्फत केला. डहाणूच्या तहसीलदारांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे, सर्वे नंबर ३६ मधील बांधकामाला नोटीस दिलेली असताना प्रत्यक्षात आपले  बांधकाम सर्वे क्रमांक आठमध्ये असल्याचा पवित्रा देसक यांच्या वतीने घेण्यात आला होता. पितळ उघडे उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयांचे वेगवेगळे निकाल उद्भूत करण्यात आले. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड मागवून त्याची तपासणी करण्यात आली. न्यायालयापुढे देसक यांच्या वकिलांनी, प्रतिवादीच्या वकिलांनी बाजू मांडली. मंडळ अधिकारी यांनी दिलेला अहवाल न्यायालयाने तपासला. ग्रामपंचायतीने दिलेल्या पावतीचा आधार देसक यांनी घेतला. घर क्रमांक ३४ हे सर्वे नंबर आठ मध्ये असून हे घर तसेच सर्वे नंबर ३६ मधील अतिक्रमण ही बेकायदेशीर असल्याचे या वेळी निष्पन्न झाले. या नियमानुसार कारवाई दोन्ही अतिक्रमणे सरकारी जागेवर असल्याने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत कायदा १९५८ च्या कलम १४ (१) (ज ३) नुसार केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.  जिल्हाधिकारी तसेच अतिरीक्त विभागीय आयुक्तांनी देसक यांना अपात्र ठरवण्याची केलेली कारवाई नियमानुसार असून या विरोधात देसक यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले असून त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अपात्रतेच्या कारवाईवर शिक्का मोर्तब झाला आहे. अन्य अतिक्रमणधारक पदाधिकाऱ्यांचे दणाणले धाबे देसक यांना या निर्णयाने चांगलाच धक्का बसला असून पालघर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवर निवासस्थाने किंवा व्यापारी संकुले बांधून तेथे राहणाऱ्या किंवा नफा कमवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, पंचायत समित्यांचे  सभापती तसेच जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना  तसेच नगरसेवकांना त्यातून चांगलाच धडा मिळणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. यांनी पाहिले काम या प्रकरणात देसक यांच्या वतीने ॲड. एस.एस. रेडेकर, योगेश राऊळ, नितीन भोईर, प्रवदा राऊत आणि मोहिनी थोरात यांनी, तर प्रतिवादी जानी शंकर वरठा यांच्या वतीने प्राजक्त अर्जुन वाडकर, प्रथमेश हंड, जुई घरत यांनी काम पाहिले.

डहाणू येथे सीपीआयएमकडून मित्रपक्षांचा मेळावा

अनिल ठाणेकर पालघर : गेल्या आठवड्यात, पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सीपीआय(एम) ने महाविकास आघाडीमधील आणि बाहेरील मित्रपक्षांच्या ३०० हून अधिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. डहाणू  विधानसभा जागेवर सीपीआय(एम) चे उमेदवार विनोद निकोले यांचा विजय सुनिश्चित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला. या विजयात यंदा सीपीआय(एम) ला १,०४,००० पेक्षा जास्त मते मिळाली, जी २०१९ मध्ये मिळालेल्या विजयापेक्षा ३२,००० मतांनी जास्त होती. डहाणूतील विजयाने महाराष्ट्रात आलेल्या भाजप-महायुतीच्या त्सुनामीला आव्हान दिले गेले. यात लक्षणीय बाब म्हणजे, १९७८ पासून झालेल्या गेल्या ११ राज्य विधानसभा निवडणुकांपैकी १० निवडणुकीत सीपीआय(एम) ने डहाणू (अज) जागा (जी २००९ मध्ये सीमांकनापूर्वी जव्हार-अज जागा होती) जिंकली आणि ती देखील पाच वेगवेगळे उमेदवार देऊन. दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या या मेळाव्याच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (एआयकेएस) स्थापनेचा ८०वा वर्धापन दिन होता. कॉम्रेड शामराव आणि गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १९४५ साली ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे हे स्थापना अधिवेशन झाले होते, आणि त्यानंतर लगेच मे १९४५ मध्ये ऐतिहासिक व विजयी आदिवासी उठावाची सुरुवात तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या तलासरी-डहाणू भागात झाली होती. या मेळाव्याला संबोधित करणाऱ्यांमध्ये सीपीआय(एम) पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि पुनर्निर्वाचित आमदार विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि जिल्हा सचिव किरण गहला, राष्ट्रवादी-शरद पवार यांचे नेते काशीनाथ चौधरी, कीर्ती मेहता आणि मिहिर शाह, शिवसेना-उद्धव ठाकरे यांचे नेते अजय ठाकूर, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पाटील, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो आणि बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण निकोले यांचा समावेश होता. सर्व वक्त्यांनी भाजप आणि महायुतीवर सडकून टीका केली आणि लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीला बळकट आणि व्यापक करण्याचे आणि दीर्घकाळापासून रखडलेल्या ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे आणि जिंकण्याचे बुलंद आवाहन केले.

डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप

डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेला एक भाई रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले रस्त्यावरून स्वताची मोटार चालवित होता. या भाईने मोटारीच्या दर्शनी भागाचा प्रखर…

गौण खनिज माफियाना अभय कोणाचे महसुल विभागाची तिजोरी रिकामी

राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील शेकडो विट भट्ट्या व दगडखाणी सुरू होऊन चार महिने उलटले तरी त्यांना तहसीलदार कार्यालयाकडून अधिकृतपणे राॅयल्टी मिळाली नसल्याने गौण खनिज माफियाना अधिकाऱ्यांचे पडद्या मागुन अभय…

मानव विकास शिबिराच्या निधीला फुटले पाय उपसरपंचाच्या भावाच्या नावावर पैसे जमा डॉक्टरांनीही घेतले हात धुवून?

योगेश चांदेकर पालघरः शासन स्तरावरून मानव विकास शिबिरे भरवण्यासाठी निधी मिळत असतो. या निधीचा वापर ज्या संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जातात, त्या संस्थांना तसेच रुग्णांना औषधांसाठी या निधीतून पैशाची…

कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय,

उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण   उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा येथे…

उल्हासनगर शिवसेना उबाठा शहरप्रमुख पदी कुलविंदरसिंग बैंस

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती     उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.त्यात उल्हासनगर पश्चिम…

 उल्हासनगरात गरजूंच्या मोफत कायदेशीर सल्ल्यासाठी 23 वकिलांचे पॅनल

 स्वराज्य संघटनेचा पुढाकार   उल्हासनगर : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड.जय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करणाऱ्या स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून मागच्या महिन्यात सप्तखंजेरी निर्माते, राष्ट्रीय…

 डहाणूचा मनस्वी इंटरप्राईजेस संघ संदीप भुरभुरे चषकाचा मानकरी

‘परिवर्तन ग्रुप’च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद   योगेश चांदेकर पालघरः मोडगाव येथील ‘परिवर्तन ग्रुप’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेटच्या महासंग्रामात ६४ संघांनी भाग घेतला. आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषकाचा मानकरी डहाणू तालुक्यातील चिखले येथील मनस्वी एंटरप्राइजेस संघ ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ‘परिवर्तन ग्रुप’ दरवर्षी संदीप भुरभुरे स्मृती चषक स्पर्धा भरवत असतो. गेली २४ वर्षे हा उपक्रम अखंड चालू असून पुढचे वर्ष हे या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या स्पर्धेचे सर्व नियोजन ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी हे करत असतात. दोन राज्ये एका केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी दादरा नगर हवेली, गुजरात, नंदुरबार, रायगड, मुंबई, मालाड, ठाणे, भिवंडी, नाशिक, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, बोईसर, डहाणू, तलासरी आदी ठिकाणचे संघ या स्पर्धेत भाग घेत असतात. दरवर्षी ही स्पर्धा नीटनेटक्या नियोजनाने चर्चेत असते. या वर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मिळून ६४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. दादरा नगर हवेली, गुजरातच्या संघालाहा पारितोषिक आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम २०२४ आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप भुरभुरे स्मृती चषक डहाणूच्या मनस्वी इंटरप्राईजेस चिखले या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दादरा नगर हवेलीतील प्रिन्स खानवेल या संघाने मिळवला. तिसरा क्रमांक वसईच्या बेनापट्टी संघांनी मिळवला, तर चौथा क्रमांक गुजरातच्या खेडगाव नवसारी येथील संघाने मिळवला. या स्पर्धेत मनस्वी स्पोर्टस् चिखले डहाणू येथील संघ मालिकावीर ठरला. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील भुसारा, पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ‘परिवर्तन ग्रुप’चे अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती  आणि ‘परिवर्तन ग्रुप’चे कार्याध्यक्ष प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. भुरभुरे यांचे मोठे योगदान गेल्या २४ वर्षांपासून आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम सुरू असतो. सुरुवातीच्या काळात संदीप भुरभुरे यांचा या स्पर्धेच्या नियोजनात मोठा सहभाग होता. त्यांचे प्रोत्साहन होते. मैदानापासूनच्या सर्वच गोष्टी ते हाताळत असत; परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे पाच मे २०२१ रोजी निधन झाले. ॲड. काशिनाथ चौधरी यांनी त्यांच्याच नावाने पुढे स्पर्धा चालू ठेवत या चषकाला संदीप भुरभुरे स्मृती चषक असे नाव दिले. आता त्याच नावाने ही स्पर्धा होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी दोन राज्ये आणि  आणि केंद्रशासित प्रदेशातील संघ सहभागी होत असतात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. ०००००

 नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 एस. टी. कदम विद्यालयाचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः प्रत्येक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरे केले जात असते; परंतु एखादी विशिष्ट ‘थीम’ निवडून त्यावर कार्यक्रम सादर करण्याचे आव्हान कुणीच स्वीकारत नाही, असे आव्हान स्वीकारून पालघरच्या एस. टी. कदम विद्यालयाने नवरसाच्या ‘थीम’वर एक अभिनव उपक्रम राबवून पालक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’वर या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभिनव ‘थीम’ची चर्चा आता पालघरमध्येच नव्हे, तर सर्वत्र होत आहे. नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादरीकरण तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नवरस ही ‘थीम’ घेऊन त्यावर विविध नृत्य, नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर केले. आनंद, दुःख, करुणा, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, विभक्त आणि शांत या नऊ रसांची प्रभावी व व भावनिक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मुलीचा जीवन प्रवास उलगडला ‘थीम’मधून नवरस या ‘थीम’चा मुख्य भाग एका मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित होता. तिच्या आनंदी बालपणानंतर ती कठीण प्रसंगावर कशी मात करते, समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या सहाय्याने ती कशी उभारी घेते, हे या वेळी नृत्य नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मोनोॲक्ट आणि नुत्यांद्वारे या भावनांना प्रभावीपणे सादर करून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाची सुरुवात जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक कमल कचोलिया यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. या वेळी विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कदम परिवार आवर्जून उपस्थित या वेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, व्यवस्थापक कोमल कदम, भावी मुख्याध्यापक प्रदीप पाणीग्रही, उपमुख्याध्यापक नेहा पाटील, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक संगीता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक आणि उपस्थितांची मनापासून मिळालेली दाद ही या शाळेसाठी एक अभिमानाची आणि चिरस्थायी बाब ठरली. 000000