Category: रायगड

raigad news and updates

माथेरानला अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ मतदारांचीच गरज !

विकासाचा आलेख उंचावुन पर्यटन क्रांतीसाठी माथेरान : माथेरान हे जरी राज्यातील नावाजलेले रमणीय पर्यटनस्थळ असले तरी सुद्धा याठिकाणी अद्यापही अन्य स्थळांच्या तुलनेत विकासात्मक दृष्टीने आमूलाग्र बदल घडवून आणले गेले नाहीत.याला…

खोती पद्धतीविरुद्ध चरी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे स्मारक करणार – रामदास आठवले

अशोक गायकवाड अलिबाग: शेतीमधील खोती पद्धती विरुद्ध अलिबाग तालुक्यातील चरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देवून चरी येथे भेट दिली होती. या आंदोलनाचे स्मारक चरी गावाजवळ अलिबाग वडखळ रस्त्यानाजिक करण्याचे विचार असून त्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार, (दि. २१ जानेवारी २०२५ ) रोजी अलिबाग येथे पत्रकारांना सांगितले. त्यांनी चरी येथील शेतकरी आंदोलनस्थळी भेट देवून जागेची पाहणी केली. शेतकऱ्यांचे खोती प्रथेविरुद्ध आंदोलन रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील चरी या गावात १९३३ ते १९३९ असे ६ वर्षे झाले. या आंदोलना अंतर्गत शेतकऱ्यांनी संप केला.शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून चरी गावाजवळ सुमारे दीड एकर जमिनीची आवश्यकता असून पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मुख्य रस्त्याजवळील जागा एमएमआरडी यांच्या ताब्यात असल्याने राज्य सरकारबरोबर चर्चा करून जागा मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगून राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पाच वर्षात करतील तसेच देशाची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात पहिल्या तीन क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणातील विकास करायचा असेल तसेच रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे जाणारा कोकणवासी थांबवायचा असेल तर कोकणात उद्योग आले पाहिजेत. त्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असेही मंत्री आठवले यांनी सांगितले. यावेळी मंत्री आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मोहनिष गायकवाड प्रभारी पनवेल महानगरनगर पालिका, हिरामण गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष, राहुल सोनावणे सुधागड तालुका अध्यक्ष, सुनील सप्रे अलिबाग तालुका अध्यक्ष, संजय गायकवाड उरण तालुका अध्यक्ष, जयप्रकाश पवार कोकण प्रदेश सहसचिव, जिवक गायकवाड कोकण प्रदेश युवासचिव, तानाजी गायकवाड रायगड जिल्हा उपअध्यक्ष, संजय जाधव अलिबाग तालुका सचिव ,शंकर दिनकर माने अलिबाग शहर अध्यक्ष , विजय गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमूख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय मुंडेंचा आता ५० कोटींचा कृषी घोटाळा ?

नागपूर : राज्यात गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आता कृषी विभागात पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला गेला आहे. डीबीटी योजना…

 घराच्या छतावर वीज निर्मिती करून २४४८ ग्राहक झाले स्वावलंबी

 कल्याण आणि भांडुप परिमंडलात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ   कल्याण :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत. 0000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाश

अलिबाग : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्याचे सन २०२४ चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्”जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर आदि उपस्थित होते. 0000

विधी सेवा शिबीर तसंच शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्या – न्या. ए.एस.राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी, सकाळी ११.०० वा. बालगंर्धव रंगभवन, रिलायन्स पेट्रोकेमिकल टाउनशिप, नागोठणे, ता. रोहा येथे “विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. 000000

मुंबई पोर्टच्या कलाकार योगिनी दुराफे यांना अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार

मुंबई : टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती…

१ हजार १६ गावे, वाड्यांच्या पाणीटंचाईसाठी ५ कोटी ६२ लाख‌ांचा आराखडा तयार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा…

सीएसटी रेल्वे स्थानकावरील हळदीकुंकू समारंभ जल्लोषात

केतन खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटी रेल्वे स्थानकावर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला चाकरमानी महिलांचा उत्स्फूर्त…

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात – पुनीता गुरव

रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध अशोक गायकवाड अलिबाग : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवार १४ जानेवारीपासून सुरूवात झाली…