Category: रायगड

raigad news and updates

माथेरानमध्ये स्वच्छ पाणी व तलाव स्वच्छतेसाठी उपोषण

माथेरान : माथेरानमधील श्री राम मंदिर समोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून येथील शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून, गेले १० वर्ष पेक्षा अधिक काळ होऊन ही माथेरान मधील पिण्याचा पाण्याचा लेक साफ केला गेला नसून त्यामुळे येथे पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठा ही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा अशी मागणी केली होती व जून 25 पर्यंत स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला होता परंतु ह्या कालावधी मध्ये काम सुरू न झाल्याने आजपासून संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष कदम हे आमरण उपोषणास बसले आहेत. शार्लेट हा माथेरान नगरपालिकेच्या मालकीचा असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून माथेरान शार्लेट तलाव सुशोभी करण्याकरता 4:99.82 लक्ष इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते,अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ पनवेल कार्यालयाकडून त्यास 6/2/2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती सदर अंदाज पत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकने तसेच सदर तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीकरितांची तरतूद होती त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्यसरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरण दृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7/ 3/ 2007 रोजीच्या शासन निर्णय नुसार362:65लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिशापोटी रुपये 326:38लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मंजूर रकमेपैकी 200 लक्ष इतका निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2/3/ 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 100 लक्ष इतका निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27/03/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आले आहे.परंतु ह्या निधीचा वापर लेक च्या स्वच्छते व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला का की ह्यामध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला आहे असे उपोषण ठिकाणी चर्चा सुरू होती. निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएन ने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनविरोधात दंड थोपटले असून ,माथेरान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना गडूळ अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा ह्याकरता उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यास माथेरान मधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे,अविनाश गोरे,सीमा कदम,जगदीश कदम,विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते. 000000

ट्रेकिंगला येणाऱ्या पर्यटकांना अनुभव नसल्याने अपघातांमध्ये वाढ

माथेरान : पावसाळा म्हणजे तरुणाईला साद घालणारा निसर्ग, अनेक जण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असाल व पावसाला सुरुवात होताच वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता कोणतीही माहिती न घेता थेट पोहोचत असतात परंतु या हौशी पर्यटकांना माहिती अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पहिल्याच पावसामध्ये अशा अनेक अपघाती घटना घडल्याने हा प्रश्न आता खंबीर स्वरूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा भेद करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले. माथेरान  हे मुंबई पुणे ठाणे कल्याण नाशिक यासारख्या मेट्रो सिटी पासून अगदी जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे माथेरानच्या पर्वत रांगांची अनेक पर्यटकांना नेहमीच भुरळ पडलेली आहे, त्यामुळे तरुणाई पाऊस सुरू होण्या अगोदरच माथेरानला येणाऱ्या पर्वतीय पर्वतरांगांमधून ट्रेकिंग द्वारे येण्याचे बेत आखत असतात, व पावसाला सुरुवात होताच माथेरानच्या डोंगररांगा या हौशी ट्रेकर्सने फुलून गेलेल्या दिसतात परंतु या परिसराचे योग्य माहिती नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. माथेरान करिता येणारे सुरक्षित ट्रेकिंगचे रस्ते पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे व तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे,त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता येतील सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते , येथील खालापूर तालुक्यातील चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येतो . नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे . भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा, अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूज ही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसऱ्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करून ट्रिप आखावी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान मध्ये  आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास खालील नंबर बरोबर संपर्क करावा.

पर्यटनासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करा-किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यातील गड किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहेत. तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटनांच्या होऊ नये यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीद्वारे सदर गावाच्या परिसर हद्दीतील पर्यटन स्थळ, तलाव, धबधबे , समुद्रकिनारे अशा जागांवर जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार , गटविकास अधिकारी , पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सुचित केले.;यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बस्टेवाड यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्रकिनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे, विविध धबधबे गड-किल्ले आदीं ठिकाणी संबंधित विभागांच्या वतीने उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रूपाली पाटील , कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली. मान्सून पर्यटनाच्या अनुषंगाने विविध तलाव, धबधब्याच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात पर्यटक येत असतात . या व मागील वर्षी काही ठिकाणी अपघात होवून पर्यटकांच्या मृत्यु होण्याच्या दुघटना घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रबळगडाच्या धर्तीवर इरशाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड(पेठ गड), सागरगड व इतर पर्यटकांच्या गर्दी होणाऱ्या वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे. पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे. पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे , पाणी प्रकल्प समुद्र किनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे बाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. 0000

महाविद्यालयीन शिष्यवृत्तीकरिता निवडलेल्या विद्यार्थ्यांना फेरअर्ज सादर करण्याची संधी – सुनिल जाधव

अशोक गायकवाड   रायगड : Revert back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि.३० जून २०२४ पूर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून महाविद्यालयीन शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन फेरसादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज…

सुधाकर घारेंच्या गावभेट दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत प्रक्षप्रवेशाचा ओघ वाढला

कर्जत : २३ जून रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिक बळकट होत चालला आहे. गेल्या अनेक…

पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता पर्यायी कागदपत्रे ग्राह्य-अमोल यादव

अशोक गायकवाड नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. २६ जून, २०२४ रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारकर्त्यानी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करता येईल, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. विधानपरिषदेची द्विवार्षिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीकरिता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), राज्य/केंद्र सरकारद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र उपक्रम, स्थानिक संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक घरे, खासदार/आमदार/एमएलसी यांना अधिकृत ओळखपत्रे जारी केली जातात. ज्या शैक्षणिक संस्थांनी दिलेले सेवा ओळखपत्र संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघात काम केले जाऊ शकते. विद्यापीठाने जारी केलेले पदवी/डिप्लोमाचे प्रमाणपत्र, मूळ स्वरूपात, सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड अशी कागदपत्रे पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. दिनांक २६ जून,२०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पदवीधर/शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

‘बायकांना पुढे करून जमिनी लाटल्या; धक्काबुक्कीसह शिवीगाळ करताना जिभाच घसरल्या’

माहेरवाशीण असलेल्या निता विचारेंनी मंत्रालय सचिवालयाची धमकी देवून सावंतांना मारहाणीसाठी केले प्रोत्साहित   राज भंडारी   रायगड : म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी येथील विचारे कुटुंबियांच्या चुलतीच्या नावे असलेल्या जमिनीचे मूळ वारसदार असलेल्या रामचंद्र किसन विचारे व अन्य चार भाऊ असे वारस असून त्यांच्या मालकीच्या या जागेत रमेश व संदीप सावंत यांच्या वडिलांना ४०० स्क्वेअर फूट जागा घर बांधून राहण्यासाठी सन १९६२ साली तोंडी व्यवहाराने देण्यात आली होती. याबाबत आता रामचंद्र विचारे आणि बंधूंची कोणत्याही प्रकारची हरकत नव्हती. मात्र कालांतराने रमेश व संदीप सावंत यांचे वडील श्रीधर सावंत यांनी सदर घराभोवती पुढील बाजूस पडवी तसेच मागील बाजूस एक पडवी बांधून अतिक्रमण करून जागा लाटली. त्यानंतर त्यांची मुले यावरच न थांबता ग्रामपंचायतीने बांधकामास मज्जाव घातलेला असताना देखील त्यांनी आता तर घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवरही बेकायदेशीर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून चक्क पाच फूट उंचीची संरक्षक भिंतच उभारली. त्यानंतर रामचंद्र किसन विचारे यांनी या प्रकाराला विरोध केला असता सावंत कुटुंबातील संदीप श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत आणि निता यशवंत विचारे यांनी ६८ वर्षीय रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करीत आपल्या जिभेवरील ताबा सोडत अर्वाच्च शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यातच माहेरवाशीण असलेल्या निता यशवंत विचारे यांनी तर कहर केला, स्नेहा सावंत यांना अंगावर धावून जाण्यासाठी प्रोत्साहन करताना त्यांनी जिभेवरील ताबा सोडत “मी मंत्रालयात सचिवालयात कामाला आहे, तुझे कोण काहीही करू शकणार नाही. मी सर्व बघून घेईन” असे बोलून खतपाणी घातले. अखेर विचारे बंधूंनी पोलीसात दाद मागितल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच सदर प्रकारावर येथील लोकप्रतिनिधी यांनी हस्तक्षेप करून रविवारी (दि.२३ जून) रोजी यावर मार्ग काढण्यासाठी बैठक लावली. मात्र सदर बैठकीला सावंत कुटुंबीयांनी पुन्हा जैसे थे भूमिका घेत आपला गोंधळ घालण्यास सुरुवात करून सदरची बैठक धुडकारून लावली. यावेळी उपस्थितांनी त्यांना न्यायालयीन दणका देण्याची गरज असल्याचे सुचाविल्यामुळे रामचंद्र विचारे यांच्यासह पाचही बंधूंनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रामचंद्र किसन विचारे यांनी बोलताना सांगितले की, गेली अडीच वर्षे सदर प्रकार सुरू आहे. आम्ही सर्व भाऊ हे नोकरीनिमित्त मुबई परिसरात राहतो. अडीच वर्षांपूर्वी आम्ही आमच्या जागेत लावलेली झाडे तसेच इतर पूर्वजांच्या काळातील दोन आंब्याची झाडे व एक नारळाचे झाड रमेश आणि संदीप सावंत यांनी कोणाचीही परवानगी न घेता तोडले व ते चोरुन विक्री केले. याबाबत पोलीसात तक्रार दिली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास विरोध करताना आपले वारस दाखले दाखवा असे सांगितले. त्यानुसार सदर वारस दाखल्यांचे काम सुरू होते. साधारण दीड महिन्यापूर्वी आम्हाला वारस दाखले मिळाले. पुन्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली झाली असल्यामुळे नव्याने आलेले सुर्वे या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपली तक्रार घेता येणार नाही असे उत्तर दिले. या प्रकारामुळे संदीप आणि रमेश सावंत यांची हिम्मत अधिकच फोफावली. त्यानंतर त्यांनी आमच्या मोकळ्या जागेवर त्यांचीच जागा असल्याचे भासविण्यासाठी गेल्यावर्षी एका बाजूला संरक्षक भिंत बांधली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये तशी तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम थांबविले आणि विना परवानगी आपण बांधकाम करू शकत नसल्याची त्यांना नोटीस दिली. मात्र मुजोरीचा कळस गाठलेल्या सावंत बंधूंनी मात्र प्रशासनाला केराची टोपली दाखवून दुसऱ्या बाजूला याच आठवड्यात दुसरी संरक्षक भिंत बांधून संपूर्ण जागा आपलीच असल्याचे भासवित बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. सदर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच पाचही विचारे बंधू हे दिनांक ९ जून रोजी याठिकाणी आले. यातील मोठे बंधू रामचंद्र किसन विचारे यांनी त्यांना बांधकाम करताना अडविले असता रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत आणि माहेरवाशीण असलेली निता यशवंत विचारे हे याठिकाणी येवून ६८ वर्षीय वृद्ध असलेल्या रामचंद्र किसन विचारे यांना धक्काबुक्की करून परत अडवाल तर जिवंत राहणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात करू लागले. हे सर्व होत असताना याचा आवाज बाजूलाच असलेल्या विचारे बंधूंच्या कानावर गेल्यानंतर हे सर्व बाहेर आले. यावेळी माहेरवाशीण असलेली निता विचारे ही स्नेहा संदीप सावंत हिला पुढे करून “तू मार त्याला, मी मंत्रालय सचिवालयात कामाला आहे, तुझे कोणीही काहीही करू शकणार नाही. मी बघते सर्व” असे बोलून मारहाणीसाठी प्रोत्साहित करीत असल्याचे सर्व बंधूंनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे सर्व चित्रफीत पोलिसांना दाखविल्यानंतर देखील पोलिसांनी सदर बाब ही सिव्हील मॅटर असल्याचे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. सरळ आणि साधेपणाने वागणाऱ्या विचारे कुटुंबाला न्याय तरी कोण देणार अशी स्थिती उद्भवली आहे. सावंत कुटुंबाच्या पाठीमागे कोणाचे हात दडले आहेत ? ते का प्रशासनाला जुमानत नाहीत ? पोलिसांचे देखील ते का ऐकत नाहीत ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील अशीच एक चॅप्टर केस २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये संदीप श्रीधर सावंत, रमेश श्रीधर सावंत, स्नेहा संदीप सावंत, ऋतुजा रमेश सावंत, निता यशवंत विचारे आणि प्रसाद महादेव विचारे यांचा समावेश होता. त्या चॅप्टर केसनुसार एक वर्षे सावंत कुटुंब शांत राहिले आणि चॅप्टर केसची मुदत संपताच त्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. दिनांक ९ जून रोजी घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्यामुळे रामचंद्र किसन सावंत यांनी गोरेगाव पोलिसांसह संदेरी ग्रामपंचायत, पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग, गृहमंत्रालयाच्या सचिवांना तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना एक पत्र तयार करून पाहिली प्रत गोरेगाव पोलिसांना शनिवार दिनांक २२ जून रोजी दिली. यावेळी सदर तक्रार अर्ज पोलिसांनी वाचल्यानंतर तत्काळ त्यांनी संदीप सावंत, स्नेहा सावंत, ऋतुजा सावंत आणि निता विचारे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलाम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी विचारे कुटुंब आणि सावंत कुटुंबांची बैठक लावण्याचे प्रयत्न केले. रविवारी (२३ जून) रोजी सदरची बैठक देखील पार पडली. या बैठकीला काही राजकीय पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी देखील ग्रामस्थांसह उपस्थित होते. सुरुवातीला बैठकीमध्ये चर्चा सुरळीतपणे सुरू झाली मात्र काही वेळाने रमेश सावंत आणि अनेक गुन्हे दाखल असलेला प्रसाद विचारे यांनी याठिकाणी येऊन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असलेल्या मध्यस्थांनी दिलेला पर्याय हा सावंत बंधूंनी धुडकावला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे प्रसाद विचारे याचे काम हे बिघडविण्याचे काम असल्याचे ग्रामस्थांमधून नेहमीच बोलले जात असते त्याची प्रचिती देखील या बैठकीमध्ये ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळाली. मुळातच सावंत कुटुंबाची ही जागा नसताना देखील कामानिमित्त आपण बाहेर राहत असल्यामुळे त्यातील अर्धी जागा देऊन मार्ग काढण्यासाठी विचारे कुटुंबांनी एक पाऊल मागे घेतले होते. मात्र जागा बळजबरी करून लाटण्याचा घाट घालणाऱ्या सावंत बंधूंना हे मान्य नसल्यामुळे अखेर विचारे बंधूंनी आपण न्यायालयीन लढाई लढून सत्याचा विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. 00000

दोन दिवस माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी

माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण…

निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत  १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

रायगड : निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त…

माथेरानमध्ये नव्या एटीएममुळे पर्यटकांना दिलासा

माथेरान : माथेरान मध्ये आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून 85 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्थानिक व पर्यटकांना एक वेगळी भेट देताना स्वतःचे एटीएम सुरू केले आहे यामुळे पर्यटकांना…