Category: रायगड

raigad news and updates

लोकसभा मतमोजणीसाठी १०० मीटर परिसरात मनाई आदेश- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदार संघासाठी ४ जून २०२४ रोजी मत मोजणी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, जि.रायगड येथे होणार आहे. या…

ई रिक्षाच्या बोर्डाची दयनीय अवस्था

माथेरान : माथेरान मध्ये २०२२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या त्यावेळी अनेक ठिकाणी ई रिक्षाच्या बाबतीत माहिती फलक नगरपरिषदेच्या माध्यमातून लावण्यात आले होते. परंतु कुणा अज्ञात…

अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण आणि उपाययोजना करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित…

चुक झाली, माफी असावी- आव्हाड

 अनिल ठाणेकर ठाणे : मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनवधानाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो अशी खंत ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

प्रत्येकी १४ टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी ८ वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. २६५ चिपळूण विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ३४५ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. २६७ राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. २६८ कणकवली विधानसभा मतदार संघात ३३२ मतदान केंद्र असल्याने २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६९ कुडाळ विधानसभा मतदार संघात ३७८ मतदान केंद्र असल्याने २० फेऱ्यांमध्ये तर, २७० सावंतवाडी विधानसभा मतदार संघात ३०८ मतदान केंद्र असल्याने २२ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बध असून मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पाणी टंचाईग्रस्त ताम्हाणशेत आदिवासीवाडी झाली पाणीदार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने रोहा तालुक्यातील ताम्हाणशेत आदिवासीवाडी पाणीदार झाली आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात या आदिवासी वाडीवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, सद्यस्थितीत पाणी टंचाई मधून नागरिकांची सुटका झाली असून, वाडीवरील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ भरत बास्टेवाड यांनी दिली.* जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.रोहा तालुक्यातील तांबडी ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्याने ताम्हाणशेत आदिवासी वाडी पाणीदार झाली आहे. या आदिवासी वडिवरील ३०४ कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सदर वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवण विहीर बांधण्यात आली असून, सदर विहिरीत पुरेसा पाणी पुरवठा शिल्लक आहे. ताम्हाणशेत आदिवासी वाडी आदिवासी वाडीला दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. वाडीवर पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर येथील नागरिकांना परिसरात असणाऱ्या एका खासगी फॉर्म हाऊस वरून पाणी आणावे लागत होते. आश्वासक पाणी स्त्रोत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत होती. मात्र जल.जीवन मिशन अंतर्गत वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवन विहीर बांधून पाणी स्त्रोत निर्माण करण्यात जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी झाले आहे.

जि. प. शाळेतील २० जणांची ‘नासा’साठी निवड -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३ गुणवत्ता परीक्षेतून २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली. आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस, आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे. पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे. मी वयाच्या २५ व्या वर्षी प्रथम विमानात बसलो. तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. २३ हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात. तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

ई रिक्षाच्या सोडतीमध्ये वीस जणांना लाभ

माथेरान : सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट वर परवानगी दिली होती परंतु यामध्ये एकूण २३ जणांनी आपले फॉर्म भरले होते.याकामी वीस जणांना अधिकृतपणे या ई रिक्षा मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोडत काढण्यात आली यामध्ये वीस जणांना सध्या सुरू होणाऱ्या पायलट प्रोजेक्ट साठी लाभ मिळाला आहे.यावेळी नगरपरिषदेचे अंकुश इचके, सदानंद इंगळे उपस्थित होते तर २३ हातरीक्षा चालक, मालक सुध्दा सोडतीच्या वेळी समक्ष हजर होते. अनेक दिवसांपासून ई रिक्षाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सुरुवातीला सनियंत्रण समितीने वीस ई रिक्षासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी दिली होती त्यावेळी पंधरा ई रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणि उर्वरित पाच ई रिक्षा पर्यटकांना, स्थानिक,आबालवृद्ध,दिव्यांग यांना वापरण्यात याव्यात असे सूचित केले होते. त्यावेळी आपला यामध्ये तोटा होणार आहे ही बाब लक्षात घेऊन काहींनी अंग काढले होते तर आज ना उद्या सर्वांना ई रिक्षा मिळणार आहेत त्यामुळे डेरिंग करून वीस जणांनी हा कोटा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता      फॉर्म भरण्यात आले होते.अखेरीस यातील वीस जणांना लाभ झाला असून उर्वरित ७४ जणांना ह्या पायलट प्रोजेक्ट नंतर टप्प्याटप्प्याने लाभ घेता येणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे  हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती च्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे हात रिक्षा चालकांचे मत व्यक्त केले. हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार असून ई रिक्षा मुळे आमच्या जीवनात बदल होणात आहे तसेच माझे अन्य हात रिक्षा बांधव त्यांना देखील लवकर ई रिक्षाचा परवाना मिळावा…

चिंतामणराव केळकर विद्यालयाचा  सलग १२ व्या वर्षी शंभर टक्के निकाल

अलिबाग : अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेत सलग १२ व्या वर्षीही चिंतामणराव केळकर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे मराठी माध्यमाचे २० विद्यार्थी, सेमी इंग्रजी माध्यमाचे ४८ विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमाचे ५३ विद्यार्थी असे एकूण १२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ८ विद्यार्थी ९० टक्के  पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ४४ विद्यार्थीना  ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले . ३४ विद्यार्थी ७० टक्के पेक्षा जास्त तर.२७ विद्यार्थी ६० गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ८ विद्यार्थी ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमात आर्या संदेश आठवले हेने  ८५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा.मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यममध्ये मयुरेश शैलेश पाटील शाळेत पहिला आला. त्याने ९३ टक्के गुण मिळवले. इंग्रजी माध्यमध्ये   स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून  शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.