Category: रायगड

raigad news and updates

रायगड जिल्ह्यातील ४९९ इमारती धोकादायक

अलिबाग– आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.…

१४ जून रोजी डाक अदालतीसाठी तक्रार पाठवा – सुनिल थळकर

अशोक गायकवाड रायगड – ग्राहकांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालया‌द्वारे १४ जूनला सकाळी ठीक ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

पत्रकार अशोक गायकवाड यांनी केले फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे प्रबोधन

जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव कळमशेत येथे संपन्न रायगड : फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन करताना, प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष उभा केला. जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव बुधवार,(दि.१५ मे) रोजी कळमशेत येथे संपन्न झाला. यानिमित्ताने पत्रकार अशोक गायकवाड प्रबोधन करत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, वसंत गायकवाड गुरुजी, पाठारे गुरुजी, युवराज नाक्ते, जानुजी भा. नाक्ते, नरेश लक्ष्मण नाक्ते, देविदास नाक्ते, अनुसया नाक्ते, प्रकाश ग. नाक्ते, काशीनाथ लक्ष्मण नाक्ते आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. जेतवन बुद्ध विहार वर्धापन दिन आणि विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, देवनांप्रिय प्रियदर्शिनी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रसंत जगतगुरू तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाज संस्थापक खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व प.पू. महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई या महामानवांची व महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक आणि नवतरुण बौध्द सेवा संघ कळमशेत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. बुधवारी, १५ मे २०२४ रोजी नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबईचे अध्यक्ष देवीदास नाक्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सुत्रसंचालन जगदीश हि. कासे, मंगेश मो. नाक्ते, आ. यशवंत म. नाक्ते यांनी केले. सकाळी ८.०० वाजता, धम्म ध्वजारोहण करण्यात आले.सकाळी ८.३० वाजता, बुध्द पूजापाठ आणि महामानवांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन ॲड. प्रकाश देवजी गायकवाड, बौध्दाचार्य भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा तळा यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ९.०० वाजता, अल्पोपहार भोजन दाते प्रभाकर पि. नाक्ते यांच्याकडून देण्यात आला. सकाळी ९.३० वाजता, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध , राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष यावर प्रबोधन केले. दुपारी १२.०० वाजता, महिलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.दुपारी १.०० वाजता, सर्वांसाठी कौन बनेगा धम्मग्यांनी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. दुपारचे स्नेह भोजन, भोजन दाते- जर्नादन जा. नाक्ते यांनी दिले तर रात्रीचे स्नेह भोजन कृष्णा द. नाक्ते यांनी दिले. दुपारी ३.०० वाजता, महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायं ४.३० वाजता, भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायं ७.०० वाजता, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. रात्री १०.०० वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. व्यवस्थापक आणि कार्यकारिणी, माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, कळमशेत अध्यक्षा अनुसया ज. नाक्ते, उपाध्यक्षा निशा नि. नाक्ते, सचिव वैशाली र. नाक्ते, उपसचिव निलम नरेश नाक्ते, खजिनदार जयश्री भि. नाक्ते, उपखजिनदार सारिका सं. नाक्ते बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक, कळमशेत अध्यक्ष नरेश लक्ष्मण नाक्ते, उपाध्यक्ष जर्नादन जा. नाक्ते, उपाध्यक्ष भिमराव पि. नाक्ते, सचिव नितीन बा. नाक्ते, उपसचिव राकेश दौ. नाक्ते, खजिनदार लक्ष्मण पि.नाक्ते, उपखजिनदार अशोक दा. शिर्के नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबई अध्यक्ष देविदास वि. नाक्ते, उपाध्यक्ष सुधाकर यशवंत नाक्ते, सचिव प्रभाकर पि. नाक्ते, उपसचिव मोहन म. नाक्ते, खजिनदार मनोहर भा. नाक्ते, उपखजिनदार मनोज लक्ष्मण नाक्ते, लेखा परीक्षक महेश चं. नाक्ते, उपलेखा परीक्षक संदेश मो. नाक्ते आदी मान्यवर व ग्रामस्थ बंधु- भगनी यांनी उपस्थित राहून व सक्रिय मदत करुन जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करण्यासाठी सहकार्य दिले.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. आता सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनालाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन-२०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीये साठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.

एक लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

महाड : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी त्‍यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, याचबरोबर पटसंख्या वाढावी यासाठी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. त्‍यानुसार सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्‍तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील मुले व खास करून मुलींमध्ये शाळा गळतीचे प्रमाण अधिक असते. पुस्तके नसल्याने अनेक मुले शाळेपासून दूर राहतात. शाळेतील पटसंख्या तसेच उपस्‍थिती वाढावी, याकरिता विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीत शिकवणाऱ्या एक लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) सरकारमार्फत मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात येणार आहे. ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समितीनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कोट जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका शाळा आणि खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील. – पुनिता गुरव, प्राथमिक विभाग, रायगड

जंजिरा किल्‍ला २६ मेपासून बंद

मुरूड :- साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपैकी एक असून वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्‌यात किल्‍ल्‍यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा २६…

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार, 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

पत्रकार संघर्ष  समितीची मागणी

बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवरवर करवाई करण्याची पनवेल : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे. , होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत . या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड :आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता…

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार १९ जून रोजी आयोजन करण्यातयेणार आहे. मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळासाडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होती. यंदा होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागें, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन आर नामदे, राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस बी काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी १५ हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखापेक्षा जास्त जण आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी गडावर नागरिकांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी या साठी करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही व यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. तत्पूर्वी जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणाना निर्देश दिले.