Category: रायगड

raigad news and updates

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष-डॉ. संदिपान सानप

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

उमेदवारांनी निवडणुक प्रक्रिया व प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे पालन करा-किशन जावळे

रायगड : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुक कालावधीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. या सर्व नियमानुसार प्रचार, त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच प्रचार खर्चा बाबत कार्यवाही करावी. तसेच प्रचारा दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार व खर्च प्रतिनिधींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह मध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम, आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करतील. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून आयोगाच्या नियम पालनास प्राधान्य द्यावे. निवडणूक विषयक विविध शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच खर्च पथक कार्यरत आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथक नेमण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारासाठी वाहने, मिरवणूक, सभा आदी परवानगी अर्ज प्राप्त झाले नंतर ” प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रचार दि. ६ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचार करता येणार नाही परंतू वृत्तपत्रातून मतदान दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जाहिरात जिल्हा माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करून प्रसिद्ध करता येईल,असे जावळे यांनी म्हणाले. यावेळी आदर्श आचारसंहिता, होम व्होटिंग, माँक पोल, ई व्हो एम सरमिसळ, प्रचार खर्चासाठी विविध दरसुची, निवडणूक प्रचार कार्यालय, मतदानसाठी ओळखपत्र अथवा ओळखपत्राचे पर्यायी १२ पुरावे, मतदानाच्या दिवशी उभा करावयाची बूथ, मतदान केंद्र राजकीय प्रतिनिधी याबाबतची माहीती दिली. तसेच निवडणूक प्रचार कामासाठी बालकामगार ठेवू नये, प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी निवडणूक खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे तपशील आयोगाच्या नियमानुसार तपासण्याचे काम खर्च पटकन द्वारे होत असून यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात आली आहे. यातील नोंदी हिशोब व बँक व्यवहाराची माहिती उमेदवारांना त्याच दिवशी नोंदवणे गरजेचे आहे. उमेदवारांसाठी येथील खर्च मर्यादा ९५ लक्ष रुपये असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवसापासून निकालाच्या दिवसापर्यंत सर्व प्रचार नोंदवला जाणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल नंतर तीस दिवसाच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे कदम म्हणाले. आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी जावळे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या असणाऱ्या शंकांबाबत प्रश्नोत्तर घेवून शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलीस व शासकीय अधिकारी, जिल्हा खर्च नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते.

भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत जप्त रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती

अशोक गायकवाड रायगड : मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती स्थापन करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे. जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य. ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.

हातरिक्षा चालकांच्या हाती येणार ई-रिक्षाचे स्टीयरिंग

माथेरान : मागील एका तपापासून पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू होऊन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी गावातील त्याचप्रमाणे अन्य मंडळींच्या विरोधाचा सामना करत अनेकांच्या कडव्या संघर्षाला सामोरे जात आपला लढा कायम ठेवून अखेरीस आपली ई- रिक्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे हातरीक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. सुप्रीम कोर्टाने वीस ई- रिक्षांना परवानगी दिली असून यापुढे हातरिक्षा चालकांच्या हाती लवकरच ई-रिक्षाचे स्टीयरिंग येणार असून या कष्टकरी श्रमिकांच्या संघर्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश असल्याचे ई-रिक्षा प्रेमी बोलत आहेत. सुप्रीम कोर्टांने दि 10 जानेवारीला ई- रिक्षा हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.त्याचवेळी सनियंत्रण समितीला ई रिक्षाची संख्या निश्चित करणे व ई-रिक्षाची मार्गिका ठरविण्यास सांगितले होते त्यानुसार सनियंत्रण समितीने 6 मार्चला झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 20 ई-रिक्षांची परवानगी दिली व अहवाल कोर्टाला सादर केला मात्र सनियंत्रण समितीच्या मिनिट्स मध्ये 20 ई रिक्षांचे वर्गीकरण 15 विद्यार्थ्यांना व 5 स्थानिकांना असे करून प्रामुख्याने या ई-रिक्षाच्या सेवेत पर्यटकांचा उल्लेख न केल्याने तर्क वितर्क सुरू झाले होते श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ऍड ललित मोहन यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना देखिल देण्याची मागणी केली पर्यटन हाच येथील प्रमुख उद्योग असून दरवर्षी दहा लाख पर्यटक माथेरानला भेट देतात कायद्यात समानता आहे वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही समूहाला डावलता येत नाही तसेच वीस हात रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असून पर्यटकांना सेवा दिली तरच त्यांना उत्पन्न मिळू शकते ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. न्या बी आर गवई व न्या संदीप मेहता यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना दिली जाईल असा स्पष्ट आदेश दिला आहे तसेच जे परवानाधारक हातरिक्षा चालक आहेत यांनाच परवानगी द्यावी या चालकांचा  सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत कोर्टाला सादर करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच हात रिक्षा चालकांच्या ई रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.  कोर्टामध्ये ऍड ललित मोहन सोबत ऍड विधे वैश्य व ऍड आकांक्षा यांनी युक्तिवाद केला तर अश्वपाल संघटनेसाठी श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला होता. पहिल्या टप्यात वीस ई रिक्षांना मिळालेली परवानगी ही हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीची सुरवात आहे व लवकरच उर्वरित  74 हात रिक्षा चालकांना देखील ई रिक्षाची…

 रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार रिंगणात

८  जणांनी घेतली उमेदवारी मागे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  रायगड लोकसभा मतदार संघातील ८  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ७  मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. अनंत गिते, (अपक्ष),अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),  अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २८  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत  ७ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी  दुपारी ३  वाजेपर्यंत ८  उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे १३  निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत. १३ उमेदवार असल्यामुळे एक युनिटवर  मतदान घेता येणार आहे.  प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार १) अनंत गिते, (अपक्ष), २) अनंत बाळोजी गिते, (अपक्ष), ३) अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे), ४)  नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष), ५) मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष), ६) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)…

रायगडमध्ये डुप्लिकेटांची चलती !

रायगड : रायगडमध्ये भाजपप्रणीत महायुतीचे राष्ट्रावीदीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यात काटें की टक्कर आहे. दोन्ही उमेदवार तापत्या उन्हात प्रचाराचा धडाका लावत आहेत. पण…

निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) संजीव कुमार झा मतदार संघात दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड…

रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहिर-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत.ही माहिती नागरिक व मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे असे जिल्हाधिकारी…

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रल्हाद केणी तसेच भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पनवेल परिसरातील रांजणपाडा, पेंधर, कोयनावेळे, तोंडरे, ढोंगऱ्याचा पाडा, कानपोली, हरिग्राम आणि इतर ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवास सदिच्छा भेट देवून प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रायगडभूषण पंडित उमेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘मनसेच्या बिनशर्त पाठींब्यावर भास्कर जाधवांची टोलेबाजी

रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महायुतीला पाठिंबा दिला की, त्यांना तो द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी मनसेला टोले लगावेलत. “मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा…