Category: रायगड

raigad news and updates

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

ई रिक्षाच्या सोडतीमध्ये वीस जणांना लाभ

माथेरान : सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट वर परवानगी दिली होती परंतु यामध्ये एकूण २३ जणांनी आपले फॉर्म भरले होते.याकामी वीस जणांना अधिकृतपणे या ई रिक्षा मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोडत काढण्यात आली यामध्ये वीस जणांना सध्या सुरू होणाऱ्या पायलट प्रोजेक्ट साठी लाभ मिळाला आहे.यावेळी नगरपरिषदेचे अंकुश इचके, सदानंद इंगळे उपस्थित होते तर २३ हातरीक्षा चालक, मालक सुध्दा सोडतीच्या वेळी समक्ष हजर होते. अनेक दिवसांपासून ई रिक्षाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सुरुवातीला सनियंत्रण समितीने वीस ई रिक्षासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी दिली होती त्यावेळी पंधरा ई रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणि उर्वरित पाच ई रिक्षा पर्यटकांना, स्थानिक,आबालवृद्ध,दिव्यांग यांना वापरण्यात याव्यात असे सूचित केले होते. त्यावेळी आपला यामध्ये तोटा होणार आहे ही बाब लक्षात घेऊन काहींनी अंग काढले होते तर आज ना उद्या सर्वांना ई रिक्षा मिळणार आहेत त्यामुळे डेरिंग करून वीस जणांनी हा कोटा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता      फॉर्म भरण्यात आले होते.अखेरीस यातील वीस जणांना लाभ झाला असून उर्वरित ७४ जणांना ह्या पायलट प्रोजेक्ट नंतर टप्प्याटप्प्याने लाभ घेता येणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे  हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती च्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे हात रिक्षा चालकांचे मत व्यक्त केले. हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार असून ई रिक्षा मुळे आमच्या जीवनात बदल होणात आहे तसेच माझे अन्य हात रिक्षा बांधव त्यांना देखील लवकर ई रिक्षाचा परवाना मिळावा…

चिंतामणराव केळकर विद्यालयाचा  सलग १२ व्या वर्षी शंभर टक्के निकाल

अलिबाग : अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या परीक्षेत सलग १२ व्या वर्षीही चिंतामणराव केळकर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे मराठी माध्यमाचे २० विद्यार्थी, सेमी इंग्रजी माध्यमाचे ४८ विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमाचे ५३ विद्यार्थी असे एकूण १२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ८ विद्यार्थी ९० टक्के  पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ४४ विद्यार्थीना  ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले . ३४ विद्यार्थी ७० टक्के पेक्षा जास्त तर.२७ विद्यार्थी ६० गुण मिळवून उत्तीर्ण झाले.  ८ विद्यार्थी ५० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमात आर्या संदेश आठवले हेने  ८५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा.मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यममध्ये मयुरेश शैलेश पाटील शाळेत पहिला आला. त्याने ९३ टक्के गुण मिळवले. इंग्रजी माध्यमध्ये   स्वरा अविनाश पाटील हिने ९७.६० गुण मिळवून  शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

सुएसो माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल ८६.३६ टक्के

ॲड. प्रसाद पाटील यांनी केले अभिनंदन अशोक गायकवाड अलिबाग :सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सु ए सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. कुमारी शबा रिजवाना रजिउल्ला सिद्दीकी हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी अपूर्वा धनश्री माधव गोसावी हिला ७८.४० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रणय भारवी भरत कांबळे याने ७८.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे. सर्व पालक, ग्रामस्थ, शाळेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी सायकल रॅली

खारघर : संतुलित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी केंद्र शासनाच्या शीघ्र कृती दलाच्या वतीने ५ मे ते ६ जूनदरम्यान ‘माय लाईफ’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचे औचित्य साधून खारघरमधील १०२ शीघ्र…

निवी या स्वप्नातील गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली भेट*

रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करणार – जिल्हाधिकारी किशन जावळे अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावच्या विकासात शासन…

कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्तांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा मदतीचा हात

माथेरान : नुकताच अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. याची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदार संघाचे…

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा पोलीसांनी लावला ३ दिवासात छडा ६ आरोपी जेरबंद

अशोक गायकवाड रायगड : रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी अवघ्या ३ दिवासात छडा लावला आहे आणि ६ आरोपींना जेरबंद करण्यात…

माथेरान नगरपरिषदेच्या पावसाळी पूर्व कामांना गती ; पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची उत्तम सोय

माथेरान : माथेरान मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने काही ठिकाणी मातीची धूप होते.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्रिटिश कालीन मोऱ्या दरवर्षी मातीच्या भरावाने भरत असतात त्यामुळे पावसाळी पाणी थेट…