Category: रायगड

raigad news and updates

मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

अशोक गायकवाड रायगड :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली अलिबाग येथे पार पडणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज रविवार (दि.२) रोजी मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.* यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष, मतमोजणी कक्षाची विधानसभा निहाय रचना, बैठक व्यवस्थापन, निवडणूक अधिकारी कर्मचारी, मत मोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, आपत्कालीन यंत्रणा, वैद्यकीय कक्ष, अत्यवश्यक सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष या सर्व तयारीची पाहणी केली. तसेच आढावा घेतला. यावेळी वाहनतळांची जागा निश्चिती, ध्वनीक्षेपक यंत्रणा, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना झा यांनी दिल्या. यावेळी झा यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीसाठी केलेली तयारी व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवून गुलाम निर्माण होतील-राजरत्न आंबेडकर

अशोक गायकवाड रायगड : लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून देशाची वाटचाल हुकूमशाही च्या दिशेने होत आहे.अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका येथे सालाबादप्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन दि. ३१ मे व १ जून २०२४ असा दोन दिवसीय भव्य दिव्य असा भिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भिम महोत्सव निमित्ताने वैचारीक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख वक्ते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब डॉ. आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भिम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला चारशे पार जायचं आहे कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत. ३७० चा आकडा टू थर्ड हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे. २०१४ पासून नरेंद्र मोदी आणी भाजप चा हा अजेंडा उघड झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावर राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफीसियल स्टेटमेंट केली आहे. यावरून त्यांचं मिशन स्पष्ट होत आहे. अभ्यासक्रमात, पाठय पुस्तकात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे. आंबेडकर म्हणाले की बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांचे विधान आहे की शिक्षण हे वर्णव्यवस्थेला जातीयतेला उखडून फेकतील अशा लोकांचं झालं पाहिजे. जे लोक मनुस्मृती व वर्णव्यवस्था लागू करतील ते लोक ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आयुक्षभर प्रयत्न करतील. मनुस्मृती पाठ्यपुस्तकात लागू केली जाते कारण मनुस्मृती चे समर्थक या देशात तयार होतील. बाबासाहेब डॉ. आंबेडकर म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील, आज परिस्थिती पहा मनुस्मृती लागू करून मनुस्मृती चे समर्थक वाढवले जातात, आता धर्म धिष्टीत शिक्षण लहान पणापासूनच गुलामी एन्जॉय करणारी पिढी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रात आय ए एस, आय पी एस, आय आर एस, आय एफ एस, डॉक्टर, इंजिनियर, वकील बाहेर पडायचे आत्ताच्या शिक्षण प्रणालीतून आर एस एस (राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे) कार्यकर्ते बाहेर पडतील . असे आंबेडकर म्हणाले. आम्ही विद्यार्थी दशेत असताना प्रशासन, महाविद्यालयाच्या विरोधात आमचे भांडायचे मुद्दे होते की आम्हाला पुस्तक मिळत नाहीत, लेक्चर होत नाहीत, तर आत्ताचे मुद्दे हे आहेत की हिजाब घालायचा की नाही, की भगवे घालायचे की नाही हे मुद्दे पुढे आलेत, यातूनच मनुस्मृती चे समर्थन करणारे कार्यकर्ते घराघरात निर्माण होतील अशी चिंता आंबेडकर यांनी व्यक्त केली. भारताची लोकशाही धोक्यात आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशानी जाहीर केल. लोकशाहीचे चार स्तंभ न्यायपालिका, कार्यपालिका, संसद, प्रसार माध्यमावार (आर एस एस) राष्ट्रीय स्वयं संघानेने कब्जा केला आहे. एकही टीव्ही चैनल आमचे मुद्दे मांडणारे नाही. संसदेत चारशे पार चा नारा लावून संविधान बदलविण्याचे, हुकूमशाही लादण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून दबाव तंत्रातून विरोधक संपवले जात आहेत. भाजपचा वन नेशन वन पॉलिटिशन चा प्लॅन आहे. असा गंभीर आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला. आंबेडकर जयंतीत कोट्यवधी चा खर्च होतो, याबरोबरच आम्ही हक्काच्या आपल्या बँका, शैक्षणिक संस्था, धम्म केंद्र उभे करण्यासाठी येत्या – काळात चळवळ गतिमान – केली पाहिजे असे आवाहन आंबेडकर यांनी केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनुस्मृती चे समर्थन करून संविधान विरोधी भूमिका दर्शवली, मनुस्मृती नुसार येणारी स्त्री गुलामी त्या स्वीकारतील का असा सवाल राजरत्न – आंबेडकर यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर दिलेला ५८ टक्के हा मतांचा आकडा वाढला आहे, तो कसा वाढला हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला, याच उत्तर निवडणूक आयोगाला देता आले नाही. अविकसित देशात ई व्ही एम मशीनचा वापर केला जातं आहे, मात्र विकसित देशात मशीनचा वापर न करता तिथे बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जातात. इतर देशात आज बॅलेट पेपर वर मतदान, आणी दुसऱ्या दिवशी निकाल दिला जातो. मात्र इथे इव्हीएम वर मत घेऊन मशीन सेक्टर मध्ये बंद ठेवून नंतर निकाल दिला जातो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी देशातील एकत्रित येऊन काळा कायदा उलथून लावला तसेच मतदारांनी एकत्र येऊन इव्हीएम मशीन उलथून लावली तरच लोकशाही मजबूत होईल असे आंबेडकर म्हणाले. बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी सांगितलं होते की आपण जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. बौद्ध म्हणून पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री हे आय एम बुद्धा नावाने परदेशात जाऊन बौद्ध म्हणून पैसे उकळत असल्याचा आरोप राजरत्न आंबेडकर यांनी केला. आम्ही खरे बौद्ध विविध जातीत न विखरता जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. आज आम्ही भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून बौद्ध राष्ट्रातून आपले अधिकार आणत आहोत. वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धीष्ट ही १३८ देशाच्या संघटनेत आपली संस्था पुनर्जीवीत करून आज जगाच्या पटलावर आम्ही बौद्धाच्या समस्या मांडत आहोत. इतर देशात बौद्ध धम्म हा पुतळे, मुर्त्या, आणि विहारात नसून बुद्ध तत्वज्ञान त्यांनी अंगीकारले आहे. बुद्ध तत्वज्ञान जीवनात अंगीकारले तरच आमची संघटन शक्ती वाढून प्रगती होईल. असे आंबेडकर म्हणाले. गड किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी, अधिकार संभाजी राजे यांना दिले आहेत, त्याप्रमाणे या देशातील बौद्ध लेण्या, स्तूप संवर्धन जतन करण्याची जबाबदारी बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध संस्थेला द्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. या भीम महोत्सव २०२४ या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, जिवक गायकवाड, किशोर द्वारकनाथ गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड (सावेळे), अलकाताई सोनवणे, सुरेखाताई कांबळे, नितीन सोनावणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष एड.शैलेश पवार, दौलत ब्राम्हणे, के के गाडे, मनोहर ढोले, रमेश खैरे, गणपत गायकवाड, बबन रामा गायकवाड, सिद्धार्थ सदावर्ते, संतोष सोनावणे (कडाव), एड. सुमित साबळे, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. वैभव गणेश गायकवाड, सूरज पंडीत, उमेश गायकवाड, सचिन मारुती भालेराव, योगेश मारुती गायकवाड, जितरत्न जाधव,सचिन गायकवाड, सुनिल गायकवाड, संतोष आडसुळे, पप्पु वाघमारे, चेतन विनायक गायकवाड, प्रेमनाथ जाधव, विश्वनाथ बडेकर, आदींसह भीम महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, भिम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियत्रंण कक्षाची स्थापना – तहसिलदार डॉ. शीतल रसाळ

अशोक गायकवाड रायगड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेच्या अनुषंगाने नवीन प्रशासकीय भवन, कर्जत, जि. रायगड येथे नियत्रंण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही आपत्ती…

लोकसभा मतमोजणीसाठी १०० मीटर परिसरात मनाई आदेश- किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदार संघासाठी ४ जून २०२४ रोजी मत मोजणी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता.अलिबाग, जि.रायगड येथे होणार आहे. या…

ई रिक्षाच्या बोर्डाची दयनीय अवस्था

माथेरान : माथेरान मध्ये २०२२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या त्यावेळी अनेक ठिकाणी ई रिक्षाच्या बाबतीत माहिती फलक नगरपरिषदेच्या माध्यमातून लावण्यात आले होते. परंतु कुणा अज्ञात…

अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण आणि उपाययोजना करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित…

चुक झाली, माफी असावी- आव्हाड

 अनिल ठाणेकर ठाणे : मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनवधानाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो अशी खंत ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

प्रत्येकी १४ टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी ८ वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. २६५ चिपळूण विधानसभा मतदार संघात ३३६ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ३४५ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. २६७ राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्र असल्याने १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. २६८ कणकवली विधानसभा मतदार संघात ३३२ मतदान केंद्र असल्याने २४ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. ३६९ कुडाळ विधानसभा मतदार संघात ३७८ मतदान केंद्र असल्याने २० फेऱ्यांमध्ये तर, २७० सावंतवाडी विधानसभा मतदार संघात ३०८ मतदान केंद्र असल्याने २२ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बध असून मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पाणी टंचाईग्रस्त ताम्हाणशेत आदिवासीवाडी झाली पाणीदार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याने रोहा तालुक्यातील ताम्हाणशेत आदिवासीवाडी पाणीदार झाली आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात या आदिवासी वाडीवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता, सद्यस्थितीत पाणी टंचाई मधून नागरिकांची सुटका झाली असून, वाडीवरील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ भरत बास्टेवाड यांनी दिली.* जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.रोहा तालुक्यातील तांबडी ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्याने ताम्हाणशेत आदिवासी वाडी पाणीदार झाली आहे. या आदिवासी वडिवरील ३०४ कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सदर वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवण विहीर बांधण्यात आली असून, सदर विहिरीत पुरेसा पाणी पुरवठा शिल्लक आहे. ताम्हाणशेत आदिवासी वाडी आदिवासी वाडीला दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. वाडीवर पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर येथील नागरिकांना परिसरात असणाऱ्या एका खासगी फॉर्म हाऊस वरून पाणी आणावे लागत होते. आश्वासक पाणी स्त्रोत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत होती. मात्र जल.जीवन मिशन अंतर्गत वाडीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी साठवन विहीर बांधून पाणी स्त्रोत निर्माण करण्यात जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी झाले आहे.

जि. प. शाळेतील २० जणांची ‘नासा’साठी निवड -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३ गुणवत्ता परीक्षेतून २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’ ला जाण्यासाठी निवड करण्यात आली. आयुष्यभर हाच अभ्यासूपणा, गुणवंतपणा ठेवून, भविष्यात आयएएस, आयपीएस, एमपीएससी, डॉक्टर, इंजिनियर बनावे. पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, डॉ. ज्योती यादव, शिक्षक वैभव थरवळ, समीक्षा मुळे, अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या. त्याचबरोबर चांगल्याप्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे. मी वयाच्या २५ व्या वर्षी प्रथम विमानात बसलो. तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात. तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. २३ हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली, हा आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल, यशस्वी करिअर घडवा. गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात. तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली. नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या बरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आले आहे.