Category: रायगड

raigad news and updates

पावसाळ्यापूर्वी दूषित पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करणार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर तसेच अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागा मार्फत नियमित पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५ हजार ६९१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजनांचे पाणी नमुने जमा करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, हे पाणी नमुने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, कर्जत, महाड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. येथे पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दूषित आढल्लेल्या पाणी नमुन्यांचे शुध्दीकरण करून, पुन्हा संबंधित पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासोबत इतर पाणी स्त्रोतांची गुणवत्ता टिकविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून राहिल्याने विहिरी, विंधन विहिरी तसेच इतर पाणी स्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. यामुळे या स्त्रोत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. विहिरीं मधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच स्त्रोतांचे मजबुतीकरण करण्यात येईल. विहिरीच्या पाण्यात कचरा पडू नये यासाठी विहिरीवर झाकण किंवा जाळी टाकण्यात येणार आहे.

शहापूरला तालुक्याला अवकाळीचा फटका

किन्हवली : शहापूर तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळून पडले. गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यातील तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत चढलेला होता. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी थंडोळखांब, कसारा, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, सोगाव, वाशिंद आदी परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी लग्न व हळदी समारंभासाठी सजावट केलेल्या नक्षीदार व आकर्षक मंडपाच्या कापडातून पाण्याच्या धारा ओघळत होत्या. मंडपात चिखल-माती झाली होती. पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक व सोयी-सुविधा वाया गेल्याने यजमानांचे नुकसान झाले. सजावटीचे महागडे कापड, विद्युत व्यवस्था पावसात भिजून मंडप डेकोरेशनवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच पाऊस लांबलाच तर गुरांच्या वैरणीची व्यवस्था करून ठेवलेला पेंढा भिजून गेला. मंडप डेकोरेटर्सना दरवर्षी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान तर होतेच; परंतु प्रशासनही आमच्या नुकसानीची कधीच दखल घेत नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. – चंद्रकांत देसले, मंडप डेकोरेटर्स, डोळखांब

रेवदंड्यात हवामन बदलाचा फटका

रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे. यंदा तालुक्‍यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्‍याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्‍या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.

बाबासाहेबांच्या शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! या संदेशानुसार शैक्षणिक प्रगती करा – डॉ. जयपाल पाटील

अशोक गायकवाड अलिबाग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात समाज भूषण, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष. मंगेश मोरे. उपाध्यक्ष. वैष्णवी कदम. प्रा. डॉ.जयपाल पाटील. उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन. त्रिशरण,पंचशील, घेण्यात आले. यानंतर पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.जयपाल पाटील यांच्या समाजसेवेबाबत उपस्थित त्यांना माहिती व आपल्या समाज बांधवांना कायम आरोग्याबाबत मदत करणारे असून त्यांना अलिबाग तालुक्यात प्रथमच हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आपल्या मंडळामार्फत बोलावले आहे. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील १०वी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०२ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा विजा कोसळतात त्यासाठी केंद्र सरकारने “दामिनी” ॲप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी सांगितले.त्याचबरोबर विहाराच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक आपत्ती सुरक्षेची पुस्तके भेट दिली. यापुढे असा कार्यक्रम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या समाजातील महिला पुरुषांसाठी बुद्ध विहारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अँड. अनुष्का गायकवाड, प्रीती रघुनाथ मोरे, प्रतिभा मोरे, पांडुरंग मोरे व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सिमरन ओहाळ यांनी मानले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात तात्काळ संपर्क करून…

उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत ३१ मे पर्यंत – नितीन मोहिते

अशोक गायकवाड रायगड : उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.३१ मे पर्यंत आहे याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, अन्न व औषध…

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी रायगडमध्ये आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे किशन जावळे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी…

वन्यप्राण्यांसाठी माथेरानमध्ये पाणी नियोजन करणे गरजेचे

माथेरान : गर्मीचा कहर सुरू झाल्यानंतर पिण्याचा पाण्याचा तुटवडा ही सुरू झाला आहे मनुष्य प्राणी काहींना काही करून स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असतो परंतु जंगलामध्ये राहणारे वन्य प्राण्यांना मात्र…

उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्या उपस्थितीत मतदान हाच ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहे, असा संदेश

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास…

माथेरान मध्ये लवकरच आकर्षक श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साकारणार

माथेरान : माथेरान मधील पंचवटी नगर भागातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नूतनिकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या येथील राकेश कोकळे यांच्या प्रयत्नामुळे आकर्षक असे श्री. विठ्ठल रखुमाई मंदीराचे काम मार्गी लागणार आहे. मावळ मतदार संघाचे संसदरत्न खासदार तथा लोकसभा निवडणुकीत हट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दि.३ रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला धावती भेट दिली होती त्यावेळी त्यांनी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांसह दुसऱ्या दिवशी राकेश कोकळे यांच्या विनंतीला मान देऊन  पंचवटी नगरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास आवर्जून भेट दिली. याचवेळी या दोन्ही मान्यवरांनी स्व. संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, पंचवटी मित्र मंडळ अध्यक्ष गणेश बिरामणे,संजय घरत,किरण पेमारे आदी उपस्थित होते.