Category: रायगड

raigad news and updates

संघपाल वाठोरे लिखित ‘अन देव निरुत्तर झाला’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन

माथेरान : शिक्षकी पेशा असताना सुध्दा आपल्या अंगातील एका कवीची जाणीव करून देत त्याचप्रमाणे निसर्गावर भरभरून प्रेम करणारे माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेचे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी आजवरच्या कार्यकाळात अनेक कविता लिहिल्या आहेत तर निसर्गाच्या सानिध्यात वावरताना प्रत्यक्ष निसर्गाशी हितगुज करत निसर्गाचे प्रत्येक ऋतूनुसार लेखन केले आहे. नुकताच त्यांनी ” अन देव निरुत्तर झाला” हा सुंदर काव्यसंग्रह तयार केला असून या काव्यसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले, नेरळ या ठिकाणी संपन्न होत आहे. साहित्य रसिकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वतः संघपाल वाठोरे यांनी केले आहे. पीपल्स पब्लिकेशन प्रकाशित आणि संघपाल वाठोरे लिखित ‘अन‌् देव निरुत्तर झाला…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्रा. दामोदर मोरे ज्येष्ठ साहित्यिक, मा. मराठी विभागप्रमुख, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे तसेच ज्येष्ठ कवी व गीतकार अरुणजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यासाठी प्रसिद्ध साहित्यिक गिरीश कंटे,मल्हार संतोष पवार, संपादक, महाराष्ट्र न्यूज-24 यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक पीपल्स पब्लिकेशन्स, मुंबई. आणि पौर्णिमा मित्र मंडळ, बोपेले – नेरळ हे आहेत. सर्व काव्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघपाल वाठोरे यांनी केले आहे.

माथेरान प्राथमिक शाळेला टीव्हीसंच व मुलांना शालेय साहित्याचे वाटप

माथेरान : माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला कैलासवासी जश मिलन गांधी यांच्या स्मरणार्थ तिचे वडील  मिलन गांधी यांनी 43 इंची स्मार्ट टीव्ही व शालेय वस्तू तसेच खाऊचे वाटप करून कै.जश याचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला. कै. जश गांधी याचे 2020 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.तरुण वयामध्ये आपला मुलगा जाण्याचे दुःख  मिलन गांधी यांनी सोसले आहे परंतु त्या दुःखाने खचून न जाता त्याच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात याकरता स्मृती दिनाचे औचित्य साधून मिलन गांधी हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्रमंडळी सह जाऊन  गरजूंना मदत करीत असतात यावर्षी त्यांनी माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे.येथील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला 43 इंची स्मार्ट टीव्ही शाळेला  भेट स्वरूपात दिला तर उपस्थित विद्यार्थ्यांना गरजेचे शालेय साहित्य व खाऊचेही वाटप केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना शाळेसाठी लागणारी कोणतीही मदत असल्यास संपर्क करण्याचा शब्दही दिला येथील विद्यार्थ्यांना पाहून या शाळेसाठी आपणास जे काही करता येईल ते करण्यास आपण तयार आहोत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माथेरानचे नितीन शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष-अजित नैराळे

कर्जत : आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यांत आली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दुरध्वनी क्रमांक ०२१४८ – २२२०३७, ९३७३९२२९०९ आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीवकुमार झा यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षक झा यांनी महाड विधानसभा मतदार संघास भेट देऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार खोपकर उपस्थित होते. यावेळी झा यांनी महाड मतदार संघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी केली. तसेच मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राची पाहणी केली. मतदान यंत्र तयार करणे बाबत आवश्यक ती सर्व नियमानुसार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

२५६ आरोपी गजाआड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते २२ एप्रिलपर्यत राज्य…

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.संदिपान सानप*

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

माथेरान पर्यटनस्थळाच्या विकासाला ब्रेक कुणामुळे ?

माथेरान : अनेक वर्षांपासून नावाजलेल्या माथेरान पर्यटनस्थळावर पहिल्यांदाच मागील दोन महिन्यांपासून तीव्र मंदीची झळ स्थानिकांना सोसावी लागत आहे त्यामुळे इथे जी काही थोड्याफार प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत आणि अजूनही काही कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत. पर्यटकांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीसुविधाचा अभाव त्याचप्रमाणे काही व्यावसायिक यांच्याकडून दिशाभूल होऊन पर्यटकांचा एकप्रकारे खिसा रिकामा करण्यासाठी प्रयत्न केला जाणाऱ्या व्यावसायिक यांच्यामुळे इथे पर्यटक फिरकत नाहीत की ह्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे खोडा घातला जात असल्याने महत्वपूर्ण विकास कामे जलदगतीने मार्गी लागत नाहीत. काळानुसार  पर्यटन वाढीसाठी आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे आहे परंतु स्वतःच्या व्यावसायासाठी गावाच्या विकास कामांना खोडा घालून एकप्रकारे ठेकेदाराला वेठीस आणून आपल्या पदरात चिरीमिरी पाडून घेण्यासाठी काही मंडळी याबाबत निष्णात आहेत. परंतु यामध्ये नकारात्मक धोरणामुळे हे छोटेसे गाव प्रगती पासून खूपच दूर फेकले जात आहे. सद्यस्थितीत इथे पर्यटकांचा भरणा अल्पप्रमाणात दिसून येत आहे. ज्यांची हातावर कमाई आहे अशा लहानसहान स्टोल्स धारकांना,तसेच मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांना मंदीचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या याठिकाणी वर्षाचा सुट्टयांचा शेवटच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रथमच तीव्र मंदी आल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देताना महिला वर्गाला त्रासदायक बनले आहे. पर्यटकांना अभिप्रेत असणारी महत्वपूर्ण कामे आजही पूर्ण झालेली नाहीत.इथल्या विकासाला ब्रेक लागत असल्यामुळे याचाच पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. परिणामी प्रशासनाच्या अधिकारी वर्गाचा हतबलपणा की मतांच्या राजकारणा पायी सर्वच मतदारांना गोंजारणार्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे विकास खुंटत चालला आहे हा सुद्धा संशोधनाचाच विषय बनला आहे. त्यासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधीची माथेरानला आवश्यकता आहे अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष-डॉ. संदिपान सानप

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

उमेदवारांनी निवडणुक प्रक्रिया व प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे पालन करा-किशन जावळे

रायगड : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुक कालावधीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. या सर्व नियमानुसार प्रचार, त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच प्रचार खर्चा बाबत कार्यवाही करावी. तसेच प्रचारा दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार व खर्च प्रतिनिधींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह मध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम, आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करतील. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून आयोगाच्या नियम पालनास प्राधान्य द्यावे. निवडणूक विषयक विविध शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच खर्च पथक कार्यरत आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथक नेमण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारासाठी वाहने, मिरवणूक, सभा आदी परवानगी अर्ज प्राप्त झाले नंतर ” प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रचार दि. ६ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचार करता येणार नाही परंतू वृत्तपत्रातून मतदान दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जाहिरात जिल्हा माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करून प्रसिद्ध करता येईल,असे जावळे यांनी म्हणाले. यावेळी आदर्श आचारसंहिता, होम व्होटिंग, माँक पोल, ई व्हो एम सरमिसळ, प्रचार खर्चासाठी विविध दरसुची, निवडणूक प्रचार कार्यालय, मतदानसाठी ओळखपत्र अथवा ओळखपत्राचे पर्यायी १२ पुरावे, मतदानाच्या दिवशी उभा करावयाची बूथ, मतदान केंद्र राजकीय प्रतिनिधी याबाबतची माहीती दिली. तसेच निवडणूक प्रचार कामासाठी बालकामगार ठेवू नये, प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी निवडणूक खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे तपशील आयोगाच्या नियमानुसार तपासण्याचे काम खर्च पटकन द्वारे होत असून यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात आली आहे. यातील नोंदी हिशोब व बँक व्यवहाराची माहिती उमेदवारांना त्याच दिवशी नोंदवणे गरजेचे आहे. उमेदवारांसाठी येथील खर्च मर्यादा ९५ लक्ष रुपये असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवसापासून निकालाच्या दिवसापर्यंत सर्व प्रचार नोंदवला जाणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल नंतर तीस दिवसाच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे कदम म्हणाले. आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी जावळे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या असणाऱ्या शंकांबाबत प्रश्नोत्तर घेवून शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलीस व शासकीय अधिकारी, जिल्हा खर्च नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते.

भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत जप्त रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती

अशोक गायकवाड रायगड : मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती स्थापन करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे. जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य. ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.