Category: रायगड

raigad news and updates

हातरिक्षा चालकांच्या हाती येणार ई-रिक्षाचे स्टीयरिंग

माथेरान : मागील एका तपापासून पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू होऊन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी गावातील त्याचप्रमाणे अन्य मंडळींच्या विरोधाचा सामना करत अनेकांच्या कडव्या संघर्षाला सामोरे जात आपला लढा कायम ठेवून अखेरीस आपली ई- रिक्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे हातरीक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. सुप्रीम कोर्टाने वीस ई- रिक्षांना परवानगी दिली असून यापुढे हातरिक्षा चालकांच्या हाती लवकरच ई-रिक्षाचे स्टीयरिंग येणार असून या कष्टकरी श्रमिकांच्या संघर्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश असल्याचे ई-रिक्षा प्रेमी बोलत आहेत. सुप्रीम कोर्टांने दि 10 जानेवारीला ई- रिक्षा हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता.त्याचवेळी सनियंत्रण समितीला ई रिक्षाची संख्या निश्चित करणे व ई-रिक्षाची मार्गिका ठरविण्यास सांगितले होते त्यानुसार सनियंत्रण समितीने 6 मार्चला झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात 20 ई-रिक्षांची परवानगी दिली व अहवाल कोर्टाला सादर केला मात्र सनियंत्रण समितीच्या मिनिट्स मध्ये 20 ई रिक्षांचे वर्गीकरण 15 विद्यार्थ्यांना व 5 स्थानिकांना असे करून प्रामुख्याने या ई-रिक्षाच्या सेवेत पर्यटकांचा उल्लेख न केल्याने तर्क वितर्क सुरू झाले होते श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ऍड ललित मोहन यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना देखिल देण्याची मागणी केली पर्यटन हाच येथील प्रमुख उद्योग असून दरवर्षी दहा लाख पर्यटक माथेरानला भेट देतात कायद्यात समानता आहे वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोणत्याही समूहाला डावलता येत नाही तसेच वीस हात रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असून पर्यटकांना सेवा दिली तरच त्यांना उत्पन्न मिळू शकते ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. न्या बी आर गवई व न्या संदीप मेहता यांनी ई रिक्षाची सेवा स्थानिक व पर्यटकांना दिली जाईल असा स्पष्ट आदेश दिला आहे तसेच जे परवानाधारक हातरिक्षा चालक आहेत यांनाच परवानगी द्यावी या चालकांचा  सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत कोर्टाला सादर करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच हात रिक्षा चालकांच्या ई रिक्षा माथेरानच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.  कोर्टामध्ये ऍड ललित मोहन सोबत ऍड विधे वैश्य व ऍड आकांक्षा यांनी युक्तिवाद केला तर अश्वपाल संघटनेसाठी श्याम दिवाण यांनी युक्तिवाद केला होता. पहिल्या टप्यात वीस ई रिक्षांना मिळालेली परवानगी ही हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीची सुरवात आहे व लवकरच उर्वरित  74 हात रिक्षा चालकांना देखील ई रिक्षाची…

 रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार रिंगणात

८  जणांनी घेतली उमेदवारी मागे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड लोकसभा मतदार संघात १३  उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  रायगड लोकसभा मतदार संघातील ८  उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ७  मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी दिली. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. अनंत गिते, (अपक्ष),अनंत बाळोजी गिते, (अपक्ष),  अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २८  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छानणीत  ७ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी  दुपारी ३  वाजेपर्यंत ८  उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे १३  निवडणूकीच्या रिंगणात उरले आहेत. १३ उमेदवार असल्यामुळे एक युनिटवर  मतदान घेता येणार आहे.  प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार १) अनंत गिते, (अपक्ष), २) अनंत बाळोजी गिते, (अपक्ष), ३) अनंत गंगाराम गिते, (शिवसेना , उद्धव बाळासाहेब ठाकरे), ४)  नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष), ५) मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष), ६) प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी)…

रायगडमध्ये डुप्लिकेटांची चलती !

रायगड : रायगडमध्ये भाजपप्रणीत महायुतीचे राष्ट्रावीदीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यात काटें की टक्कर आहे. दोन्ही उमेदवार तापत्या उन्हात प्रचाराचा धडाका लावत आहेत. पण…

निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) संजीव कुमार झा मतदार संघात दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड…

रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहिर-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत.ही माहिती नागरिक व मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे असे जिल्हाधिकारी…

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रल्हाद केणी तसेच भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पनवेल परिसरातील रांजणपाडा, पेंधर, कोयनावेळे, तोंडरे, ढोंगऱ्याचा पाडा, कानपोली, हरिग्राम आणि इतर ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवास सदिच्छा भेट देवून प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रायगडभूषण पंडित उमेश चौधरी, माजी नगरसेवक संतोष भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘मनसेच्या बिनशर्त पाठींब्यावर भास्कर जाधवांची टोलेबाजी

रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महायुतीला पाठिंबा दिला की, त्यांना तो द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी मनसेला टोले लगावेलत. “मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा…

रायगड लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी  पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांना अभिप्रेत लोकशाहीसाठी उत्तरदायी-धिरेंद्रमनी त्रिवेदी

 अशोक गायकवाड अलिबाग : संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत, असे मत भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी…

माथेरानमध्ये पाणी पुरवठा समाधानकारक

जल प्राधिकरणाच्या पाणी नियोजनामुळे माथेरान : माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरान कराना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सूनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे. काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व एन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असेल परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांनी पाणीटंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई सामोरे जावे लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणार पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने  व शालेय मध्ये मुबलक पाणीसाठा सध्या  उपलब्ध असल्याने  माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या  पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई पासून माथेरान करांना दिलासा निश्चित मिळणार आहे. माथेरान मध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापर  ही कमी झाला आहे  त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.