Category: रायगड

raigad news and updates

समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या-आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील, असा विश्वास…

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता पूर्ण-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १९२ अलिबाग विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी प्राप्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता (कमिशनिंग) पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. जे एस एम महाविद्यालय अलिबाग येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कमिशनिंग प्रसंगी निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती जोयस लालरेम्मवी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदान यंत्रांची कार्यक्षमता तपासून सुसज्य करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट ची कमिशनिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदान यंत्र घटक योग्य कार्य करत आहेत याची खात्री करण्यासाठी चाचणी केली जाते. कमिशनिंग प्रक्रियेमध्ये नियोजन, निवडणूक उमेदवार- चिन्ह, मतदान केंद्रनिहाय प्रमाणीकरण सुसज्जता समाविष्ट आहे. यंत्र घटक जसे पाहिजे तसे काम करत आहेत याची खात्री करणे हा देखील कमिशनिंगचा उद्देश आहे. यावेळी प्रक्रिया पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. स्ट्राँग रूमची सुरक्षा सुव्यवस्थेच्यादृष्टीने २४ X ७ पॉवर बॅकअप, सशस्त्र बंदोबस्त आराखडा, पोलीस आदी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात करण्यात आल्या आहेत.

मतदान टककेवारी वाढ होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे-डॉ .महेंद्र कल्याणकर

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ .महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर मार्गदर्शन करताना म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, ८५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची ( होम वोटिंग)सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. दिव्यांग मतदारांचे १००% मतदान होईल या दृष्टीने काम केले जावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी.अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदान दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड याद्वारे निर्माण करण्यात याव्यात, दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्था ची मदत घेतली जावी. होम वोटिंग साठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घेतली जावी. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात ६२% मतदान झाले होते यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी असे जावळे म्हणाले. यावेळी निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर करण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभाग विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक मतदान पूर्वतयारी बाबत माहिती सादर केली. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चौकट रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या आढावा कल्याणकर यांनी यावेळी घेतला. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

संघपाल वाठोरे लिखित ‘अन देव निरुत्तर झाला’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे आयोजन

माथेरान : शिक्षकी पेशा असताना सुध्दा आपल्या अंगातील एका कवीची जाणीव करून देत त्याचप्रमाणे निसर्गावर भरभरून प्रेम करणारे माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेचे शिक्षक संघपाल वाठोरे यांनी आजवरच्या कार्यकाळात अनेक कविता लिहिल्या आहेत तर निसर्गाच्या सानिध्यात वावरताना प्रत्यक्ष निसर्गाशी हितगुज करत निसर्गाचे प्रत्येक ऋतूनुसार लेखन केले आहे. नुकताच त्यांनी ” अन देव निरुत्तर झाला” हा सुंदर काव्यसंग्रह तयार केला असून या काव्यसंग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा छोटेखानी कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह बोपेले, नेरळ या ठिकाणी संपन्न होत आहे. साहित्य रसिकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वतः संघपाल वाठोरे यांनी केले आहे. पीपल्स पब्लिकेशन प्रकाशित आणि संघपाल वाठोरे लिखित ‘अन‌् देव निरुत्तर झाला…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्रा. दामोदर मोरे ज्येष्ठ साहित्यिक, मा. मराठी विभागप्रमुख, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे तसेच ज्येष्ठ कवी व गीतकार अरुणजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यासाठी प्रसिद्ध साहित्यिक गिरीश कंटे,मल्हार संतोष पवार, संपादक, महाराष्ट्र न्यूज-24 यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक पीपल्स पब्लिकेशन्स, मुंबई. आणि पौर्णिमा मित्र मंडळ, बोपेले – नेरळ हे आहेत. सर्व काव्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघपाल वाठोरे यांनी केले आहे.

माथेरान प्राथमिक शाळेला टीव्हीसंच व मुलांना शालेय साहित्याचे वाटप

माथेरान : माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला कैलासवासी जश मिलन गांधी यांच्या स्मरणार्थ तिचे वडील  मिलन गांधी यांनी 43 इंची स्मार्ट टीव्ही व शालेय वस्तू तसेच खाऊचे वाटप करून कै.जश याचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला. कै. जश गांधी याचे 2020 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.तरुण वयामध्ये आपला मुलगा जाण्याचे दुःख  मिलन गांधी यांनी सोसले आहे परंतु त्या दुःखाने खचून न जाता त्याच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात याकरता स्मृती दिनाचे औचित्य साधून मिलन गांधी हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्रमंडळी सह जाऊन  गरजूंना मदत करीत असतात यावर्षी त्यांनी माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे.येथील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला 43 इंची स्मार्ट टीव्ही शाळेला  भेट स्वरूपात दिला तर उपस्थित विद्यार्थ्यांना गरजेचे शालेय साहित्य व खाऊचेही वाटप केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना शाळेसाठी लागणारी कोणतीही मदत असल्यास संपर्क करण्याचा शब्दही दिला येथील विद्यार्थ्यांना पाहून या शाळेसाठी आपणास जे काही करता येईल ते करण्यास आपण तयार आहोत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माथेरानचे नितीन शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष-अजित नैराळे

कर्जत : आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यांत आली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दुरध्वनी क्रमांक ०२१४८ – २२२०३७, ९३७३९२२९०९ आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीवकुमार झा यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षक झा यांनी महाड विधानसभा मतदार संघास भेट देऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार खोपकर उपस्थित होते. यावेळी झा यांनी महाड मतदार संघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी केली. तसेच मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राची पाहणी केली. मतदान यंत्र तयार करणे बाबत आवश्यक ती सर्व नियमानुसार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

२५६ आरोपी गजाआड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते २२ एप्रिलपर्यत राज्य…

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.संदिपान सानप*

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

माथेरान पर्यटनस्थळाच्या विकासाला ब्रेक कुणामुळे ?

माथेरान : अनेक वर्षांपासून नावाजलेल्या माथेरान पर्यटनस्थळावर पहिल्यांदाच मागील दोन महिन्यांपासून तीव्र मंदीची झळ स्थानिकांना सोसावी लागत आहे त्यामुळे इथे जी काही थोड्याफार प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत आणि अजूनही काही कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत. पर्यटकांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीसुविधाचा अभाव त्याचप्रमाणे काही व्यावसायिक यांच्याकडून दिशाभूल होऊन पर्यटकांचा एकप्रकारे खिसा रिकामा करण्यासाठी प्रयत्न केला जाणाऱ्या व्यावसायिक यांच्यामुळे इथे पर्यटक फिरकत नाहीत की ह्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे खोडा घातला जात असल्याने महत्वपूर्ण विकास कामे जलदगतीने मार्गी लागत नाहीत. काळानुसार  पर्यटन वाढीसाठी आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे आहे परंतु स्वतःच्या व्यावसायासाठी गावाच्या विकास कामांना खोडा घालून एकप्रकारे ठेकेदाराला वेठीस आणून आपल्या पदरात चिरीमिरी पाडून घेण्यासाठी काही मंडळी याबाबत निष्णात आहेत. परंतु यामध्ये नकारात्मक धोरणामुळे हे छोटेसे गाव प्रगती पासून खूपच दूर फेकले जात आहे. सद्यस्थितीत इथे पर्यटकांचा भरणा अल्पप्रमाणात दिसून येत आहे. ज्यांची हातावर कमाई आहे अशा लहानसहान स्टोल्स धारकांना,तसेच मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांना मंदीचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या याठिकाणी वर्षाचा सुट्टयांचा शेवटच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रथमच तीव्र मंदी आल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देताना महिला वर्गाला त्रासदायक बनले आहे. पर्यटकांना अभिप्रेत असणारी महत्वपूर्ण कामे आजही पूर्ण झालेली नाहीत.इथल्या विकासाला ब्रेक लागत असल्यामुळे याचाच पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. परिणामी प्रशासनाच्या अधिकारी वर्गाचा हतबलपणा की मतांच्या राजकारणा पायी सर्वच मतदारांना गोंजारणार्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे विकास खुंटत चालला आहे हा सुद्धा संशोधनाचाच विषय बनला आहे. त्यासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधीची माथेरानला आवश्यकता आहे अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.