Category: ठाणे

Thane news

‘प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल’

एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी बदलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर आपल्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा पालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला तिकीटाला मुकावं लागेल, अशी स्पष्ट कान उघाडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापुरात महायुतीच्या मेळाव्यात केली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी शिंदे बदलापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही वामन म्हात्रे यांची कळ काढली असेल तर दुरुस्त करा. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना महायुतीतील घटक पक्षांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र मुरबाडमध्ये होते. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्याविरुद्ध जाहीर आघाडी उघडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी बदलापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह वामन म्हात्रे आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कान उघाडणी केली. आपण महायुतीमध्ये काम करत आहोत. असे असताना आपापसातील मतभेद मिटवा. कथोरे आपण म्हात्रे यांची काही कळ काढली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. शिवसेनेच्या तसेच महायुतीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या. ज्या प्रभागात कथोरे यांना कमी मतं मिळतील, त्या प्रभागातील नगरसेवकाचे पालिका निवडणुकीचे तिकीट कापले जाईल असाही स्पष्ट इशारा यावेळी शिंदे यांनी बोलताना दिला. शिवसेनेच्याच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचे तिकीटही कापले जाईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच वामन म्हात्रे याच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य करत म्हात्रे यांना अडचणीत आणणाऱ्यांना शिंदे यांनी इशारा दिला. या समेट भाषणानंतर महायुतीचे आणि विशेषतः शिवसेनेचे पदाधिकारी अखेरच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय होतील अशी आशा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. बेईमानी खपून घेणार नाही तुम्हाला आम्ही मोठे केलं, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार दिला असे असताना पण तुम्ही बेइमानी केली. हा एकनाथ शिंदे ही बेइमानी खपवून घेणार नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांचा समाचार घेतला. पवार हे शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली होती.

दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ?

 केदार दिघे यांचा सवाल ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात काही पत्रके चिटकविण्यात आली होती. या पत्रकांवर आनंद दिघे यांचेसुद्धा छायाचित्र होते. परंतु ही पत्रके फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या फाटलेल्या पत्रकांवरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावलेली होती ती फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचे होते तर माझा फोटो काढायचा होता? निवडणुकीत तुम्हाला दिघे साहेब अडचणीचे ठरू लागले का असा प्रश्न त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून केदार दिघे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक लढवित आहेत. केदार दिघे यांनी त्यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावरून एक ट्वीट प्रसारित केले आहे. त्यामध्ये त्यांचे पत्रक फाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक संदेश देखील त्यामध्ये लिहिला आहे. ‘दिघे साहेबांवरचे प्रेम फक्त चित्रपटापुरतेच का? दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावली आहे. ती प्रतिमा फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचेच होते तर माझा फोटा काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला साहेब अडचणीचे ठरू लागलेत का? मिंधे उत्तर द्या.’ असे त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

इथे फक्त डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन

कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक ! अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ…

५१,७६,००० रुपये किंमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिरारोड येथून जप्त

मिरा भाईन्दर : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार मध्यवर्ती गुन्हे कक्षाने आर्यन या इसमाला ५०० रुपयाच्या बनावट नोटा घेवून जाताना डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ड व प्रेझेन्ट पार्क रोडकडे जाणारे…

जागर निष्ठेचा

कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांनी वाहिली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली कल्याण : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सचिन बासरे यांनी आज सकाळी काळा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. बासरे यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली. हे स्मारक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, भारतातील बाळासाहेबांचे पहिले स्मारक म्हणून याचे महत्त्व अधिक आहे. बासरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्मारक उभारले गेले…

हर्षित बोबडेची शतकी खेळी व्यर्थ

ठाणे : हर्षित बोबडेच्या दमदार शतकी खेळीनंतरही पहिल्या डावात अवघ्या एका धावेने पिछाडीवर पडल्यामुळे यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पर्धेतील प्रवास आटोपता घ्यावा लागला. सनराईझ क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील २३५ धावांना उत्तर देताना स्पोर्टिंग क्लब कमिटीने २३४ धावापर्यत मजल मारली होती. प्रथम फलंदाजी करताना अर्णव मिरगेच्या ७६ धावांच्या अर्धशतकी खेळीने सनराईझ क्रिकेट क्लबने द्विशतकी धावसंख्या उभारली. तन्मय मालुसरेने चार आणि आर्यन राजने तीन बळी मिळवले. उत्तरादाखल हर्षितने १२३ आणि स्पर्धेत फलंदाजीत छाप पाडणाऱ्या विवान हजारेच्या ४६ धावांच्या खेळीनंतरही स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शौर्य नवलेने चार फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावात सनराईझ क्रिकेट क्लबने २ बाद १०७ धावापर्यत मजल मारली होती. संक्षिप्त धावफलक : सनराईझ क्रिकेट क्लब : (पहिला डाव) : सर्वबाद २३५ ( अर्णव मिरगे ७६,तन्मय मालुसरे २०-६-६६-४,आर्यन राज १४-६-२२-३). दुसरा डाव : ३६ षटकात २ बाद १०७.…

मिरा-भाईंदरच्या विकासात नरेंद्र मेहतांची महत्त्वाची भूमिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मीरा-भाईंदर : मिरा भाईंदरचा चेहरा मागील दहा वर्षात बदलला  आहे. मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना व इतर अनेक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ह्यामुळे एक प्रकारे शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत असल्याचे…

जेव्हा गद्दारी झाली तेव्हा जितेंद्र आव्हाड हेच पवारांसोबत पहाड बनून उभे राहिले – कन्हैय्या कुमार

 महाविकास आघाडीचे सरकार आले तर देशाचे राजकारण बदलेल – अजय राय अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीवर गद्दारी फार काळ टिकणार नाही. यावेळेस महाराष्ट्रात परिवर्तन होणारच आहे. हे परिवर्तन होत असताना पाच वर्ष मागे जाऊन पहा, जेव्हा अंधारात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शरद पवार यांच्यासोबतडॉ..जितेंद्र आव्हाड हेच पहाड बनून उभे राहिले होते, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ मुंब्र्याच्या एमएप व्हॅली येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत कन्हैय्या कुमार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रांताध्यक्ष अजय राय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह हजारो नागरिक उपस्थित  होते. आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी देशभरातील विविध मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या २० तारखेला परिवर्तनासाठी मतदान करायचे आहे. मी काही एवढा मोठा नाहि की तुम्हाला काही शिकवायला आलो आहे. पण, धर्मनिरपेक्षतेच्या प्रत्येक लढाईत ठाम उभे राहणाऱ्याडॉ..जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत. आपण देश आणा राज्यातील सत्ताधाऱ्यांना पहात आहात. मी स्वतः विविध राज्यांमध्ये फिरत आहे. पण, गडबड करणे हेच भाजपचे काम आहे. हरयाणामध्ये आपण जिंकत होतो. मात्र, भाजपने गडबडी केली. म्हणूनच प्रत्येक मत महत्वाचे आहे. प्रत्येकाने जितेंद्र आव्हाड यांना मत देऊन सेक्युलर आवाज बुलंद केला पाहिजे. अजित पवारांबाबत बोलताना कन्हैय्या कुमार यांनी, खरी राष्ट्रवादी आणि डॉ..जितेंद्र आव्हाड हे हिमतीने लढत आहेत. म्हणूनच अजित पवारांनी घड्याळ चोरून नेले. पण, आता त्यांचे घड्याळ बंद पडले आहे. तरीही, हे बंद घड्याळ पुढे करून अजित पवार हे जनतेला ‘गुमराह’ करीत आहेत. पण, त्यांनी हे लक्षात ठेवावे; त्यांचा खेळ अनिश्चिततेचा आहे. त्याने आमच्या निश्चिततेला फरक पडणार नाही, असे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेवर कोणाचा विश्वास आहे, हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. आपणाला आता ५० कोटी घेऊन गद्दारी केलेल्यांशी लढायचे आहे. कारण, गद्दारीचा पाया रचणारे उपमुख्यमंत्री धर्म…

इथे फक्तडॉ.. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन, कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक !

अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवारडॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, यासाठी  प्रवेशद्वारांवर भला मोठा फलकच लावला आहे. वाय जंक्शन येथे ग्लोबल पार्क ही प्रचंड मोठी आणि कौसा येथील नुराणी हाॅटेलशेजारी आमीर नामक तीन विंगची सोसायटी आहे. या दोन्ही सोसायट्यांमध्ये शेकडो कुटुंबिय वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांनी एकमुखी ठराव करूनडॉ..जितेंद्र आव्हाड यांना मते देण्याचा निर्धार केला आहे. १५ वर्षांपूर्वी मुंब्रा – कौसा हा परिसर अविकसित होता. सन 2009 मध्येडॉ..जितेंद्र आव्हाड हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर परिसराचा विकास होऊ लागला. आज शहरातील रस्ते, पाणी,  वीज या सर्व समस्या…

महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच उद्धव ठाकरेंसोबत – राजन राजे

‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे पक्षाध्यक्ष  राजन राजे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे,…