Category: ठाणे

Thane news

 पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित केल्या असून ३० मोटर पंप जप्त केले आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. प्रभाग                        कारवाई        वसुली नौपाडा – कोपरी :          १५        –  ४,५४,२७,३२५ उथळसर :                    ५८        –  ३,४७,३२,४९७ माजिवडा मानपाडा :      ००        –  ६,२१,७५,४५९ वर्तकनगर :                  ३५        –  २,९४,२३,७१०…

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात…

 जिल्ह्यात प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा, जलजीवन मिशन यशस्वी – डॉ. भरत बास्टेवाड

 ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन अशोक गायकवाड अलिबाग : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात आली असून ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६२० कुटुंबांपैकी ४ लाख ७१ हजार ८२६ कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले असून, या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील १०० टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत. तालुका : कुटुंबे : नळ कनेक्शन दीलेली कुटुंबे : टक्के, अलिबाग : ७१ हजार ३६४ : ५६ हजार १३२ : ७८.६७, कर्जत : ५४ हजार ५०९ : ४१ हजार ७९९ : ७६.६८, खालापूर : ३६ हजार ४७ : ३६ हजार ४७ : १००, महाड : ४२ हजार ४९९ : ३६ हजार ९४१ : ८६.९२, म्हसळा : १४ हजार ५६५ : १४ हजार ५६५ : १००, मुरुड : १६ हजार ४२३ : १५ हजार २६५ : ९२.९५, पनवेल : ८१ हजार ८३० : ७२ हजार ६०५ : ८८.७३, पेण : ४५ हजार ६७ : २९ हजार १९५ : ६४.७८, पोलादपूर : १६ हजार ५०३ : १३ हजार २९७ : ८०.५७,सुधागड : १५ हजार ८६५ : १२ हजार ४४५ : ७८.४४, तळा : ११ हजार ४९१ : १० हजार ३९६ : ९०.४७, उरण : ३६ हजार ३०० : ३६ हजार ३०० : १००, रोहा : ४२ हजार ६७० : ३७ हजार १९१ : ८७.१६, माणगाव : ४२ हजार १०४ : ३९ हजार ८१० : ९४.५५, श्रीवर्धन : २१ हजार ३८३ : १९ हजार ८३८ : ९२.७७ ०००००

 छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, मीरा भाईंदरच्या इतिहासाचे शो !

म्युझिकल फाउंटनच्या ‘वॉटर स्क्रीन’वर दिसणार मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण, १६ कोटींच्या खर्चातून पूर्ण झाले तलाव सुशोभीकरण -प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी   भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील २ तलावांचे सुशोभीकरण करून त्यात ‘म्युझिकल फाउंटन’ बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी या म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण होणार आहे. मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात हे संगीत कारंजे बसवले गेले असून यामुळे तलावासोबतच परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नवघर येथील तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलाव या तलावात म्युझिकल फाउंटन ३० तारखेपासून सुरु होणार असून दररोज रात्री म्युझिकल फाउंटनचे येथे शो येथे होतील , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दोन्ही तलावातील या कामांवर सुमारे १६ कोटी खर्च करून हे भव्य – दिव्य आकर्षक काम पूर्ण केले गेले असून मीरा भाईंदर शहर सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामात मोठी भर पडली आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर , गोडदेव , काशिमीरा तलाव हे जुने तलाव असून येथे परिसरातील नागरिक फिरण्यासाठी , निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ – संध्याकाळी येत असतात. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाउंटन) बसविण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून याकामासाठी १०० टक्के निधी राज्य सरकार कडून आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणला होता. हा निधी राज्य सरकारने मीरा भाईंदर महापालिकेला दिला होता. त्यातून तिन्ही तलावात सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यातील दोन तलावातील कामे पूर्ण झाली आहेत. आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी सुशोभीकरणाच्या कामाच्या साईटवर जाऊन आढावा घेतला, कामाला गती दिली. गेल्या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे.आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती देताना सांगितले की , नवघर येथील तलावाचे सुभोभिकारण करण्यात आले आहे आणि तलावात म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. नवघर तलावाच्या आत असलेल्या म्युझिकल फाउंटन म्हणजेच संगीत कारंजे उडतील त्यावर ‘वॉटर स्क्रीन’ बनेल. त्यावर ऑडिओ व्हिडीओ कन्टेन्ट म्हणजेच पाच – पाच मिनिटांचे शो दाखवले जातील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज , अयोध्या येथील प्रभू श्री रामाचे मंदिर , मीरा भाईंदरचा इतिहास यावर हे म्युझिकल फाउंटन शो होणार आहेत व त्याची स्क्रिप्ट बनवली जात आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच नवघरच्या तलावात म्युझिकल फाउंटन सोबत ‘फायर नोझल’ लावला गेला आहे. फायर नोझल म्हणजे म्युझिकल फाउंटन सुरु असताना काही नोझल मधून फायर निघते …वॉटर आणि फायरचा संगम येथे पाहायला मिळेल. शिवाय नवघर तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाच्या परिसरात अम्पी थियेटर बनवले असून तेथे ५०० लोक बसून हा म्युझिकल फाउंटन शो बघू शकतील. लहान मुलांना खेळण्यासाठीची जागा आहे , तलावाला ग्रील लावले आहेत व लॅन्ड स्केपिंग गार्डन केले गेले आहे. नवीन कुंपण भिंत, नागरिकांना चालण्यासाठी पाथ वे , बसायला वेगवेगळे कट्टे बनवले आहेत. नवघरच्या तलावात होणारा म्युझिकल फाउंटनचा शो हा लक्षवेधी , नयनरम्य आणि पाहण्यासारखा असेल , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दररोज रात्री ७ , ८ व ९ वाजता म्युझिकल फाउंटनचे शो होतील व संपूर्ण मीरा भाईंदर मधून लोक ते बघण्यासाठी येतील असेही ते म्हणाले. आकर्षक लाईट इफेक्ट्स विद्युत रोषणाई या म्युझिकल फाउंटच्या वेळी पाहायला मिळेल आणि लोक हे पाहताना आनंद व्यक्त करतील. काशिमीरा येथील जरीमरी तलाव येथेही म्युझिकल फाउंटन बसवला गेला आहे. संगीतावर नाचणारे कारंजे येथे दिसतील. विशेष म्हणजे या संगीत कारंज्याची रंगसंगती दिवसाप्रमाणे व दिन विशेषांप्रमाणे बदलू शकणार आहे अशी त्यात व्यवस्था केली गेली आहे.  स्वातंत्र्य दिन , दिवाळी , श्री गणेशोत्सव असे जे जे महत्वाचे दिवस असतील त्या दिवशी त्या म्युझिकल फाउंटनचे रंग बदलतील आणि त्या रंगातील व त्या म्युझिकवर म्युझिकल फाउंटन बघायला मिळतील. देशभक्ती , भक्ती संगीत किंवा प्रत्येक दिवसाप्रमाणे म्युझिकल फाउंटन सुरु राहणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.  मीरा भाईंदरच्या दोन मोठ्या तलावांचे रूप पूर्णपणे या कामामुळे पालटले गेले असून परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे तलाव सुशोभीकरण करीत असताना तलावाचे पाणी कायम शुद्ध राहील याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदरला भरभरून विकास निधी दिल्याने ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर शहर खूप विकसित आणि सुशोभित होत आहे. ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदरही सुशोभीकरणात पुढे चालले आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. ठाण्याच्या उपवन तलावात म्युझिकल फाउंटन लावला गेला आहे. त्याचप्रमाणे आता मीरा भाईंदरच्या दोन तलावात हे म्युझिक फाउंटन लावले गेले आहेत. नवघर तलावात तर म्युझिकल फाउंटनचे काम करताना फायर नोझल पहिल्यांदा लावला गेला आहे. आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडून निधी आणला. त्यांच्या संकल्पनेतून तलाव सुशोभीकरणासोबतच म्युझिकल फाउंटन लावले गेले. शिवाय आमदार सरनाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा , जागेवर येऊन वेळोवेळी घेतलेला कामाचा आढावा व दिलेल्या सूचना यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले आणि संपूर्ण मीरा भाईंदरकर नागरिकांच्या पसंतीस उतरेल , असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका…

जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट…

स्पर्धा युगात डिजिटल मीडिया प्रभावी साधन – संजय शर्मा

डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती द्या – एस. एम. देशमुख राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ४०० पेक्षा अधिक पत्रकारांचा सहभाग   पिंपरी, पुणे : डिजिटल च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील…

ठाणेकरांसाठी ध्यानमंदिर, अद्यावत ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत वास्तू या सुविधा उपलब्ध होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या या कामांची केली पाहणी   ठाणे : ठाणेकरांना ध्यानधारणा आणि योग…

श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे मिळाले जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार

अशोक गायकवाड   पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

विसर्जन तलाव स्वच्छ करण्याची मागणी

मुलुंड ः पूर्वेतील मिठागर येथील तलावामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते; मात्र या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. या तलावाची दुर्दशा झाली असून या ठिकाणी…