Category: ठाणे

Thane news

 सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास

 उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या कल्याण : जमिनीच्या वादातून सावत्र भावाला लोखंडी सळईने मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्यास कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. र. अष्टुकर यांनी १० वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. विष्णु राजाराम रामगुडे असे कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. तुकाराम रामगुडे असे मृताचे नाव आहे. हे दोघे सावत्र भाऊ आहेत. रामगुडे कुटुंब उल्हासनगर येथे राहते. तुकाराम हे अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. विष्णु आणि तुकाराम यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. जानेवारी २०१७ मध्ये तुकाराम रामगुडे ऑर्डनन्स फॅक्टरीतून रात्रपाळी करून घरी आले होते. ते घरात बसले होते. त्यावेळी विष्णु रामगुडे तुकाराम यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला. तुकाराम यांनी घराबाहेर जाऊन विष्णु यांना तू शिवीगाळ कशासाठी आणि कोणाला करतो, असा प्रश्न केला. त्याचा राग विष्णुला आला. त्याने हातामधील लोखंडी सळईने तुकाराम यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विष्णुने हा हल्ला केला होता, असे तुकारामची पत्नी वंदना यांनी पोलीस, न्यायालयातील जबाबात म्हटले आहे. या झटापटीच्यावेळी तुकाराम यांची पत्नी मध्ये पडून तुकाराम यांना विष्णुच्या मारहाणीपासून वाचविले. लोखंडी सळईचे घाव वर्मी बसल्याने तुकाराम रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना मध्यवर्ति रुग्णालय, तेथून खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना काही महिन्यांनी तुकाराम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला होता. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून सबळ पुराव्यांच्या आधारे विष्णु रामगुडे याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एस. आर. कुलकर्णी, ॲड. इघारे, आरोपीतर्फे ॲड. भोपी यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. पी. आहेर, हवालदार के. पी. घरत यांनी केला होता. ०००००

 पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

 शिळ-दिवा भागात कारवाईत ०६ मोटर पंप जप्त, ११ नळ जोडण्या खंडित   ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिते शिळ-दिवा भागात ०६ मोटर पंप जप्त करण्यात आले. तर, ११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ०१ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही.  तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.

 कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित २४५ ग्राहकांच्या घरात परतला ‘प्रकाश’

महावितरण अभय योजनेतून मिळवली वीजजोडणी; व्याजमाफीसह मूळ थकबाकीत सवलत कल्याण : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या कल्याण परिमंडलातील २४५ ग्राहकांची घरे प्रकाशाने पुन्हा उजळली आहेत. या ग्राहकांनी व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान ३० टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना-२०२४ चा लाभ घेत ही संधी साधली. १ सप्टेबरपासून या योजनेची सुरुवात झाली असून परिमंडलातील २ लाख ९४ हजार ९१ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना कायमस्वरुपी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी यातून मिळणार आहे. परिमंडलातील ३८९ ग्राहकांनी आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून उर्वरित ग्राहकांनीही योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे. अभय योजनेनुसार मार्च-२०२४ अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी अथवा ३० टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. ३० टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे. कल्याण परिमंलातील २ लाख ९४ हजार ९१ ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. योजनेत सहभाग घेत या ग्राहकांना विलंब आकाराचे ३ कोटी ८१ लाख व व्याजाचे ४० कोटी ६१ लाख रुपयांची सवलत मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित झालेल्या संबंधित ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ अतिउच्च दाब वाहिनीवर तातडीचे काम

अंबरनाथ व मोहने १०० केव्ही उपकेंद्रावरील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित   कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ या अतिउच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी (१३ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते १०…

बाळकुम प्रसुतीगृहाला अवकळा; पर्यायी जागेचाही आवळला गळा – आ.संजय केळकर

अनिल ठाणेकर   ठाणे : बाळकुम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतीगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ…

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन्सिलींची मदत : हल्ली घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये नैवेद्य म्हणून पेढे मोदक ऐवजी वह्या पेन्सिलींची मदत करण्याची नवीन प्रथा सुरु करण्यात आली आहे. ही वह्या पुस्तके…

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

वाडा : राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना…

कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस

मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मलवाहिन्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सफाई कामाचे तीन वर्षाचे कंत्राट मे. ग्रॅविट इंजिनिअर्स वर्क्स कंपनीला देण्यात आले…

स्वच्छता ही सेवा मोहिम राबवली जाणार – रोहन घुगे

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने, १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही…

गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या वतीने ५ मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल – निलेश सांबरे अनिल ठाणेकर   ठाणे : गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागांत असलेल्या गोर गरीब जनतेच्या…