Category: ठाणे

Thane news

३०० घरेलु कामगारांना शासकीय लाभ!

तारामाऊली सेवाभावी संस्थेने मिळवून दिला  भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : तारामाऊली सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन कोपरी परिसरातील ३०० घरेलु कामगार महिलांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभापाठोपाठ घरेलु कामगार कुटुंबांना भांड्याचे संच भेट म्हणून मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी घरेलु कामगारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. हातावर पोट असलेल्या कोपरी परिसरातील सामान्य घरकामगार महिलांना भरत चव्हाण यांच्याकडून नेहमी सहकार्य केले जाते. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ कुटुंबांना मिळवून दिले जातात. त्यानुसार घरेलु कामगारांच्या योजनेतून कोविड आपत्तीच्या काळात कोपरी परिसरातील ३०० हून अधिक घरेलु महिला कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह तारामाऊली सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कोपरीतील घरेलु महिला कामगारांचे अर्ज भरुन घेण्यात आले होते. तसेच या अर्जासाठी कागदपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने दाखले शिबीर भरविण्यात आले होते. नोंदणीकृत घर कामगार भगिनींना महायुती सरकारने ३० भांडी असलेला गृह उपयोगी भांड्याचा सेट भेट म्हणून दिला आहे. कोपरी परिसरात या भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी या भगिनींनी महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, तारामाऊली सेवा संस्थेच्या माध्यमातून नुकतेच कोपरी भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी महिला भगिनींना साडीभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विधानसभेसाठी मराठा समाजाचा ‘मराठा पॅटर्न’

 महिनाभर मराठा जोडो अभियान ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न” राबवण्याचा यल्गार केला आहे. या अनुषंगाने आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला प्रविण पिसाळ, प्रविण कदम, दत्ता चव्हाण, दिनेश पवार, रमेश चौधरी, संतोष पालांडे आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना, समन्वयक ॲड. सुर्यवंशी यांनी, यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.तेव्हा, आम्हाला केवळ गृहित धरले जाते, असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी ५० टक्यांच्या आतच आरक्षण द्यावे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकुल अहवाल दिला असे असतानाही ४० वर्ष झाली तरी मागण्या मान्य होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे. तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात “मराठा जोडो अभियान” राबवुन मराठा समाजाला जागरूक करणार आहे.   ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे विधानसभेत १ लाख ३५ हजार मराठा मतदार तर ओवळा – माजीवडयात ५ लाख मतदारांपैकी १ लाख ५० मराठा, कोपरी- पाचपाखाडीत ८० हजार आणि कळवा – मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत. याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले. चौकट मराठा समाजाच्या मागण्या * कोपर्डी अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. * ५० टक्याच्या आत टिकणारे आरक्षण हवे. * जातनिहाय जनगणना झाली पाहिजे * ओबीसीसह सर्व जातींचे फेर सर्वेक्षण व्हावे * सारथी उपकेंद्र ठाण्यात उभारून त्याची व्याप्ती वाढवावी * ठाण्यात मराठा हॉस्टेल व मराठा भवन व्हायला हवे * सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नेमकी कशामुळे अडली हे स्पष्ट करावे. * मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

जिल्ह्यातील सर्वाधिक प्रश्न मांडणारे माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या नावाची नोंद

२८८ आमदारांमध्ये राज्यात प्रश्न मांडण्यात आमदार विनोद निकोले यांचा सातवा क्रमांक, ‘संपर्क’ संस्थेच्या अहवालात कामगिरीवर शिक्कामोर्तब अनिल ठाणेकर ठाणे : १४ वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होणार असून सन…

अभिजात दर्जा लाभल्यामुळे मराठी ही भारताचा अभिमान होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचे आभार : संजय वाघुले ठाणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ऑक्टोबर, २०२४…

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचा सन्मान*

ठाणे : जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा…

७ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद!

राजेंद्र साळसकर अंबाजोगाई : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक…

ठाणे महापालिका मुख्यालय इमारत भुमीपुजन वादात

भुमीपुजनास काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोध ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून या कामाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे 

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे, दि. ४ – वर्तकनगर येथील ग्रामदेवता श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण घटस्थापना दिनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 

शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष ठाणे : `अमृतातेही पैजे जिंका’ असे ज्ञानेश्वर माऊलंनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…