Category: ठाणे

Thane news

कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार

कल्याण : कल्याणमध्ये एका २९ वर्षांच्या महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका साप्ताहिक आणि यूट्यूब वाहिनीच्या पत्रकाराविरोधात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला विवाहित असतानाही…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी आभासी पध्दतीने होणार संविधान मंदिराचे उद्घाटन

ठाणे : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), ठाणे द्वारा शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) ४००…

ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी (VVPAT) जनजागृती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृती कार्यक्रमाचा आज दि.11 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी…

एसटी महामंडळाची बसगाडी मेट्रो खांबाला धडकली

आठ प्रवासी जखमी ठाणे : घोडबंदर येथील ओवळा भागात मंगळवारी पहाटे राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या अपघातात चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाची बसगाडी घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळील कठड्याला धडकली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेजोगाई येथून बोरीवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतुक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तर बसगाडीमधील १३ पैकी आठ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना उपचारासाठी ब्रम्हांड आणि मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे के. अडसूळ (चालक, वय- ३५), चाटे (वाहक), उद्धव चौरे (६५), उर्मिला चौरे (५५), सलीम शेख (५८), आत्मराम शेजुळ (४९), राजश्री शेजुळ (४२) आणि आकांक्षा शेजुळ (३५) अशी जखमींची नावे आहेत. 0000

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक

ठाणे : स्वतःचे कार्यालयाचे काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत, नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरूखकर आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे ४२ वे वर्षे आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला.

साखळी उपोषणाच्या २८व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश!

ठाणे: ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. सुरभी रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केले आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते. गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्यावतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६/ २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने २८ दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे.

९७ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या

Untitled-4   पाणीपुरवठा विभागाची मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई ठाणे : मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर, खरीवली, देवी नाला, ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या ९७ नळ जोडण्या पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, पाणी बील वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रिडर यांची बैठक घेतली. या बैठकीत, मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने, मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये कल्याण फाटा येथून ६६० मीमी व ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे ५७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवर अवैधपणे नळ संयोजने घेतल्याचे निर्दशनास आले होते. त्यानुसार ही नळ संयोजने तोडण्याची कारवाई करण्यात आली. याचप्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळ संयोजने तोडण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले. 000000

शीळ फाटा कोंडीमुक्त होणार?

     उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य कल्याण : कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कल्याण फाटा येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा समावेश आहे. २०० कोटी खर्चाचे हे काम आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता गुरुदत्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. कल्याण फाटा येथे उड्डाण पूल उभारणीचा संकल्पन बांधकाम आराखडा नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तयार करायचा आहे. ४२ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे. या उड्डाण पूल आणि भुयारी मार्गामुळे बदलापूर, अंबरनाथ काटई मार्गे शिळफाटा चौक दिशेने येणारी, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगरकडून येऊन नवी मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा येथे (दत्त मंदिर) उड्डाण पुलावरून थेट एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरील पुलावरून महापे-नवी मुंबई दिशेने जातील. ठाणे-मुंब्रा भागाकडून येणारी वाहने कल्याण फाटा येथील उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गिकेतून पनवेल, तळोजा भागाकडे जातील. यामुळे कल्याण फाटा चौकात होणाऱ्या वाहन कोंडीतून आणि प्रवाशांची खोळंब्यातून कायमची मुक्तता होणार आहे. ग्रेड सेपरेशन या प्रणालीद्वारे हे काम केले जाणार आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागातून येणारी वाहने कल्याण फाटा (दत्त मंदिर चौक) येथून एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या पोहच रस्त्यावरून खिंडीतून थेट महापे -नवी मुंबईकडे जातील, असे सुरुवातीला या पुलाचे नियोजन करण्यात आले होते. शिळफाटा खिंडीतील एमआयडीसीच्या जलवाहिन्या अन्य भागात स्थलांतरीत करण्याचे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे जलवाहिन्या आहे त्याच ठिकाणी ठेऊन उड्डाण पुलाची सीमारेषा बदलून जलवाहिन्यांवरून पुलाची मार्गिका खिंडीतून महापे रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उतरविण्यात येणार आहे. पुलावरील मार्गिका तीन मार्गिकेची करण्यात येणार होती. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून ही मार्गिका चार मार्गिकेची करावी आणि त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी चार वर्षापूर्वी प्राधिकरणाने मान्य केली आहे. या उड्डाण पुलांव्यतिरिक्त काटई नाका, सुयोग हाॅटेल (रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर ) येथे उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या पुलांमुळे या दोन्ही चौकांमध्ये होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई भागातून शिळफाटा रस्त्यांवरून जाणारी वाहने उड्डाण पुलांवरून थेट इच्छित स्थळी निघून जातील. स्थानिक शहरांतर्गत वाहने या पुलांखालून इच्छित स्थळी जाणार आहेत, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले.यासंदर्भातच्या अधिक माहितीसाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत,

 नेरुळ येथे तांत्रिक बिघाड  ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावर झाला. या बिघाडामुळे ठाणे, ऐरोली, रबाळे यासह सर्वच महत्त्वाच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाणे स्थानकातील पादचारी पूलावर आणि फलाटावर गर्दी वाढल्याने महिला प्रवाशांचे हाल झाले. नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घनसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, कारखाने आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप भागातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जात असतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊ, १० -१० अ येथे वाशी, पनवेल आणि नेरूळ या स्थानकांच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या रेल्वेगाड्या थांबतात. मंगळवारी पहाटे नेरूळ स्थानकाजवळ पहाटे ५ वाजेपासून ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) समस्येमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. येथील दुरुस्ती दोन तासांनी पूर्ण झाली. परंतु ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. रेल्वेगाड्यांची वाहतुक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरू होता. सकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील ट्रान्स हार्बर मार्गिकेच्या फलाटांवर तुफान गर्दी उसळली होती. रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीबाबत प्रवाशांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. पादचारी पुलावर काही प्रवासी थांबल्याने पुलावर देखील गर्दी झाली. गर्दीमुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती.

गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी

विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम ठाणे : शासकीय योजनांची प्रसिध्दी व्हावी, गरजूंना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपात जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या प्रसिध्दीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर्शनासाठी येत असून या प्रसिध्दी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाऱ्हाटे, सचिव भूपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉ.विजय पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले. विहंग गार्डन सार्वजनिक  गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आणि बालविकास विभागाने यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनीही अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.