Category: ठाणे

Thane news

केडीएमसी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी एका कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी अद्याप झालेली नाही. महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागात एक प्रयोगशाळा…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आदर्शवत – शरद पवार

अशोक गायकवाड पनवेल : पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा आपल्या दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संस्थेच्या हनुमान विद्यालयाच्या नुतनीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी काढले. या इमारतीसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी आणखी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील निढळ येथे रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाची नुतनीकृत इमारत रायगडचे माजी खासदार आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच वर्गखोल्या, विविध कक्ष, ऑफिस यांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीप्रमाणे मुक्तहस्ते मदत केली. ते सातारला रयत शिक्षण संस्थेचे चार वर्षे विद्यार्थी होते. कर्मवीर अण्णांचा कमवा आणि शिका हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी एक वर्ष काम केले. चार वर्षे या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केले आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. वर्ष, दोन वर्षे इथे काम केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये नवी मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि या क्षेत्रात कष्ट करून सगळ्यांना बरोबर घेऊन प्रचंड यशस्वी झाले. त्या यशाचाच परिणाम संस्थेचे कोणतेही नवीन काम असले आणि ते हजर असले तर मला खात्री असते की आता या कामाला जो काही अडथळा किंवा कमतरता आहे त्यातून मार्ग निघेल. आजपर्यंत मला आकडा लक्षात नाही. मागे एकदा मी माहिती घेतली होती की, संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झाले असेल? जो आकडा एक वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो शंभर कोटींचा होता. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणगीदार असतात. तरीपण त्यांच्यात सातत्य नसते. वर्षानुवर्ष मदत करत असतात, देणगीदार असतात, मात्र स्वतःच्या शाळेपुरते हे दातृत्व ते दाखवत असतात. रामशेठ यांचे वैशिष्ट्य हे आहे की, आम्ही लोक आदिवासी भागात गेलो. संस्थेची शाखा त्या ठिकाणी आहे. सगळे काम बघितले. काही कमतरता जाणवल्यावर रामशेठ यांना सांगितले की इतके पैसे जाहीर करा. त्यानुसार त्यांनी अशा अनेक शाखांमध्ये अर्थसहाय्य केलेले आहे. पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श रामशेठ यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. म्हणून याही शाखेला त्यांनी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. निढळ गावचे सुपुत्र तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकारातून आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेल्या ७५ लाख रुपये देणगीतून इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्याला दिशादर्शक ठरणारी शाळेची अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत निढळमध्ये उभारण्यात आली आहे. संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग, सुसज्य स्टाफरूम, बोलक्या भिंती, मुख्याध्यापक कक्ष, रंगरंगोटी, नवीन बेंचेस, अत्याधुनिक डिजिटल बोर्ड अशा अनेक सुविधा विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर, हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, माजी विद्यार्थी विजय जाधव, कला शिक्षक प्रदीप कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हॉईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, अ‍ॅड. रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, डॉ. विठ्ठल शिवणकर, सांगली दक्षिण विभागीय चेअरमन डॉ. एम.बी. शेख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र मोरे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, ‘पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४’ या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली. तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२,  उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर,  रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.

ठामपा क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १७११३ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २४५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील २७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, रायलादेवी, उपवन, नीळकंठ येथील कृत्रिम तलाव, कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची सोमवारी पाहणी केली. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात, स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. या पाहणीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सचिन पवार, मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, स्थानिक सहाय्यक आयुक्त, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १३ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १२ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत. यावर्षीही प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण कमी झाले आहे. कृत्रिम तलाव (१५) – ८७००, खाडी विसर्जन घाट (०९) – ६५२०, विशेष टाकी व्यवस्था (४९) – १६२१,फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २७, मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २४५, एकूण:१७११३. यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर,

वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई

Photo-6   कल्याण : कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच, या वाहनांमुळे सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. त्यामुळे अशी वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेचा घनकचरा विभाग आणि कल्याण वाहतूक विभागातर्फे संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्या पाहणी दौऱ्यात १५ वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली. दुर्गाडी किल्ला येथील दुर्गा चौक, लालचौकी, सहजानंद चौक ते शिवाजी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. सर्व प्रकारची जड अवजड, हलकी वाहने या रस्त्यांवरून धावतात. लालचौकी ते आधारवाडी, गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा मोटार, ट्रक सारखी वाहने उभी करून ठेवली जातात. अनेक वेळा या वाहनांमुळे या रस्त्यांवर वाहन कोंडी होते. कोंडी झाल्यानंतर या वाहनांचे मालक परिसरात नसतात. त्यामुळे ही वाहने आहे त्या जागेवरून हटविणे वाहतूक पोलिसांना अवघड होते. या भागातील वाहन कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. या वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. ही वाहने एकाच जागी अनेक महिने उभी राहत असल्याने सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. अशा वाहनांखाली कचरा साचून रहातो. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाची अशा वाहनांमुळे डोकेदुखी वाढली आहे. ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सुरू केली आहे. रस्त्यांवरील वाहनांचे क्रमांक पाहून त्यांच्या वाहन मालकांचा शोध घेऊन वाहतूक विभाग, पालिकेने अशा वाहन मालकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. ही वाहने तातडीने वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. वाहनतळ सोडून सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर वाहन उभे केल्याने आणि स्वच्छतेमध्ये बाधा आणल्याने पालिकेने एकूण १५ वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक वाहन मालकांनी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर आरटीओच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे, असे पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारची मोहीम डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पत्रकार मित्र असोसिएशनच्या आरती संग्रहाचे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्याहस्ते प्रकाशन

अशोक गायकवाड पनवेल : भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पत्रकार मित्र असोसिएशनने विविध देवी देवतांच्या ३२ आरत्या एकत्र असलेला आरती संग्रह संपादित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एकाच पुस्तकात सर्व आरत्या सापडतील या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासिचव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. सामाजिक, सांस्कृतीक कार्यात पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच अग्रेसर असते असे म्हणत त्यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे आधारस्तंभ दिपक महाडीक, संस्थापक केवल महाडीक, उपाध्यक्ष सुनील भोइर, कार्याध्यक्ष नितीन जोशी, दैनिक युवक आधारचे संतोष आमले उपस्थित होते. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनीही या आरतीसंग्रहाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

मुरबाडच्या पत्रकार विश्वावर शोककळा

पत्रकार लक्ष्मण पवार यांचे निधन राजीव चंदने      मुरबाड रू मुरबाड होमगार्ड ड्युटी सांभाळून पत्रकारिता करणारे मुरबाडचे नामवंत पत्रकार लक्ष्मण पवार यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.रविवारी होमगार्ड म्हणून बंदोबस्तासाठी मुरबाड पोलीस ठाण्यात हजर होताना ही दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमध्ये पत्रकार म्हणुन लक्ष्मण पवार हे मुरबाडची जबाबदारी सांभाळत होते.सामाजिक बांधिलकी जपताना ते होमगार्ड म्हणुन देखील पोलीस खात्याला सहकार्याची भूमिका बजावत होते.पत्रकारिता सांभाळून ते पोलीस खात्यासोबत विविध ठिकाणी बंदोबस्तावर असायचे.निवडणुका,विविध सण,मोर्चे, व आपत्कालीन परस्थितीत त्यांची होमगार्ड म्हणुन चोख कामगिरी होती.रविवारी ते ड्युटीवर मुरबाडकडे  येताना गोवेली नजीक त्यांच्या छातीत दुखू लागले.यातच त्यांची प्राणज्योत मालवली.ते 42 वर्षांचे होते.त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.एका गुणी पत्रकाराला व चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष होमगार्डला तालुका मुकला आहे,अशा प्रतिक्रिया त्यांच्या जाण्याने समाजात व्यक्त होत आहेत. पवार हे रात्री,बेरात्री, आपत्कालीन परस्थितीत होमगार्ड म्हणुन चोख व नियमित कर्तव्य बजावत होते.दिवसा पत्रकारिता करणे व रात्री बंदोबस्ताची ड्युटी बजावणे यात कदाचित त्यांचा कामाच्या तणावामुळे हा प्रकार घडला असावा अशी मतं यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहेत.होमगार्ड पोलीस बळाला सोबत म्हणुन मोलाची भूमिका बजावत असतात,हीच भूमिका बजावत असताना पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. पवार हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय पत्रकार होते,त्यांच्या जाण्याने चळवळीचीही हानी झाल्याच्या दुःखद प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीत व्यक्त होत आहेत.यावेळी होमगार्डच्या मुरबाड युनिट तर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.त्यांच्या अंत्यसंस्कार समयी तालुक्यातील मान्यवर,पत्रकार, सामाजिक,राजकीय पुढारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. पवार हे कर्तव्य चोख बजावणारे होमगार्ड होते.ते स्वतः ड्युटी मागून घ्यायचे,व ती प्रामाणिक पार पाडायचे.त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.त्यांच्या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत,—-महेंद्र चंदने :- समादेशक अधिकारी,होमगार्ड मुरबाड युनिट

व-हाळदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर

ठाणे : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशियाँ फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी “भावाला संस्कार द्या… बहिणी सुरक्षित राहतील” ही संकल्पना राबविणारे अभियान आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील व-हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी   गौतम सोनवणे , साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड , मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले.  हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव  आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  

ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन

यूएसएड या संस्थेच्या ‘क्लीन एअर बेटर हेल्थ’ या प्रकल्पा अंतर्गत तयार झाले ऑनलाइन साधन   ठाणे : ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ…

ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन

यूएसएड या संस्थेच्या ‘क्लीन एअर बेटर हेल्थ’ या प्रकल्पा अंतर्गत तयार झाले ऑनलाइन साधन   ठाणे : ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ…