Category: ठाणे

Thane news

नवी मुंबईत ‘थर’ या मराठी चित्रपटाचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : तरुणांनी दहीहंडी खेळताना आठ थराच्या वरती थरावर थर रचा, परंतु अपघात होणार नाही,  याची दहीहंडी मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षितपणे खेळ खेळावा आणि सणांचा आनंद घ्यावा. दहीहंडी…

 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पाच लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 नवी मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत…

शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा – रामेश्वर पाचे

ठाणे : अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (विशेष घटक योजना) जिल्हा परिषद,ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ…

ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा उपक्रम ठाणे : गेली अनेक वर्षे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक आणि विठाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदाही हा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी केले तेव्हा त्यांनी नमूद केले की, गेली २० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन दशेपासून त्या मनोरुग्णालयात येऊन रक्षाबंधन साजरे करतात याविषयी सांगितले व संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील हा उपक्रम चालूच आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपण अशा विविध उपक्रमांना गेले पाहिजे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे याविषयी भाष्य केले आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमा – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना ही परंपरा चालू ठेवा असेही संबोधले. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुळीक सर, ममता मॅडम, जाधव मॅडम व इतर सहकारी स्त्री व पुरुष रुग्ण, शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, कार्यक्रम अधिकारी प्रा. संजना भाबल, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अजय ब्राम्हणे, रजिस्ट्रार आकाश ढवळ, विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, तुषार सावंत व इतर सदस्य मंडळी उपस्थित होते.

नवी महापालिका होईलही, पैशांचे सोंग कुठून आणणार?

ठाणे : अंबरनाथ व कुळगाव-दलापूर नगरपालिकांचे विसर्जन करून नवी महापालिका करण्याची मागणी शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली व मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ठाणे जिल्ह्यातील…

‘सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन वेळेवर मिळालेच पाहिजे’

मेधा पाटकर यांचा आंदोलनाचा  इशारा ठाणे :सफाई कामगार हे शहराची साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात; मनोरुग्णालयातील सफाई कामगार तर रुग्णालयाच्या साफसफाई बरोबर मनोरूग्णांच्या सफाईचीही जबाबदारी उचलतात. त्यांच्या कामाचं महत्व जाणून त्यांना खरं तर कंत्राटी पद्धतीने कामावर न ठेवता कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला हवं पण या कामगारांना न्यायालयाने आदेश देऊनही किमान वेतन दिले जात नाही की मागील वेतनाची थकबाकी अजून दिली जात नाही, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या. ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतन मिळावं आणि वेतन थकबाकी मिळावी म्हणून १३ ऑगस्टपासून साखळी उपोषण करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मेधाताईंनी आंदोलन स्थळी भेट दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कंत्राटदाराने कामगारांना वेळाच्या वेळी वेतन, भत्ते दिले नाहीत तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामगारांना देऊन कंत्राटदारांकडून वसूल केले पाहिजेत असा कायदा असताना इथे अधिकारी ते न करता कंत्राटदारावर सर्व सोपवतात. या कामगारांना अजून जुलै महिन्याचे वेतन दिलेले नाही. लवकरच कामगारांना न्याय नाही मिळाला तर साखळी उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात होईल, असा इशाराही त्यांनी मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला या वेळी दिला. यावेळी मेधाताईंनी महिलांना राखी बांधून या बंधनात आपण एकत्रितपणे राहून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगून त्यांना धीर दिला. सफाई कामगारांना जुलै महिन्याचे वेतन रूग्णालय प्रशासन अदा करेल, आजच्या आज वेतन साठी प्रस्ताव अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांना पाठवण्याचे आदेश उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांनी डॉ नेताजी मुळीक आणि सीएओ श्री लांजेवार व प्रशासकीय अधिकारी डॉ रानडे यांना दिले. प्रादेशिक मनोरुग्गणालयातर्फे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक, CAO गजानन लांजेवार AO. डॉ. रानडे यांच्या आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या वतीने श्रमिक जनता संघ  युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, कार्यकारी सचिव अजय भोसले, कामगार प्रतिनिधी संघटक दिनानाथ देसले, अनिता कुमावत, सोनी चौहान, संजय सैदाणे , महेश निचिते आदी उपस्थित होते. यावेळी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री जगताप  उपस्थित होते. यावेळी सहा.संचालक डॉ चाकूरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री पाटणकर ही उपस्थित होते. सदरच्या प्रस्तावावर मा. आरोग्य आयुक्त यांची मंजूरी घेऊन सोमवार पर्यंत वेतन अदा करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांना मोबाईल वर चर्चा करताना आश्वासन दिले आहे. मागील पाच वर्षाच्या थकीत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम ९५ लाख सात हजार चारशे छत्तीस रूपये, बोनस पोटी थकीत रक्कम एकवीस लाख पन्नास हजार एकशे शहाण्णव रूपये आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम बारा लाख एकशे चौसष्ठ रूपये अशी एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार सातशे शहाण्णव रूपये इतकी रक्कम सफाई कामगारांना देय असलेल्या रकमेचे मागणी पत्र यावेळी युनियन तर्फे उपसंचालक डॉ नंदापुरकर यांना सादर करण्यात आले. या बरोबरच इएसआयसी आणि अन्य सोयी सुविधा आदी इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य अजित डफले, स्वराज अभियानचे सदस्य सुब्रोतो भट्टाचार्य, समता विचार प्रसारक संस्था मीनल उत्तूरकर, सुनिल दिवेकर, किसन सिंग बेदी, अनमोल साळवी, मोनाली सरोदे.श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते किसन गडगिळे आणि सामाजिक कार्यकर्ते शरद जोशी हे उपस्थित होते.

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा 

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी आणि आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या रॉट्रॅक्ट क्लब व एनसीसी कॅडेट्स यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी ठाण्यातील आनंद दिघे जिद्द स्कूल मधील विद्यार्थ्यां सोबत रक्षाबंधन…

लाडक्या बहिणींना लखपती बनवायचे आहे –  देवेंद्र फडणवीस

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महायुती सरकारने ठरविले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला `लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींनाही लखपती बनवायचे आहे, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता नोंदणीकृत बहिणींच्या खात्यातही जमा झाला. महायुती सरकारने ही राज्यातील बहि‍णींना दिलेली रक्षाबंधनाची ही भेट ठरली. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाने अंधेरी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील महिलांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लाभार्थी बहीणी ज्योती गिरी व रुपा केळकर यांनी श्री. फडणवीस यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. त्यावेळी प्रत्येक महिलेला लखपती बनविण्याचे ध्येय ठेवले असून, आम्ही बहिणींना लखपती बनवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. भाजपा ठाणे व महिला मोर्चाच्या वतीने ठाण्यातील महाजनवाडी येथील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर बहि‍णींची उपस्थिती होती. या वेळी आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेवक संदीप लेले, सुनील हंडोरे, राजकुमार यादव, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कविता पाटील, कमल चौधरी, नम्रता कोळी, नंदा पाटील, मृणाल पेंडसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचे आर्थिक जीवन समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्न करीत आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले गेले. तर वार्षिक तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. लेक लाडकी योजनेतून मुलींना १८ वर्ष झाल्यावर १ लाख रुपये मिळणार आहेत. एस. टी. मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करता येत आहे. लाडक्या बहिणींना भक्कम आधार दिला जात आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती गिरी यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त केली. संसार सांभाळू शकणारी स्त्री जगालाही सांभाळू शकते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचा गौरव केला. या कार्यक्रमाला शहरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाजनवाडी हॉल खच्चून भरला होता.

‘मंगळागौर’च्या खेळामध्ये रमल्या महिला!

भाजपा, विश्वास सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे : भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी देहभान विसरून पारंपरिक पद्धतीबरोबरच अभिनव कल्पना राबवून खेळ सादर करीत वयोवृद्धांची मने जिंकली. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार करीत काही गटांनी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, दीपा गावंड, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, उपाध्यक्ष अनुराधा रोडे, सचिव माधुरी मेटांगे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सुनिता संजय वाघुले, सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, प्रीती मणियार, नीता पाटील, वर्षा पाटील, तृप्ती जोशी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकुर, विद्या शिंदे, अर्चना पाटील, कांचन पाटील यांच्यासह यांच्यासह भाजपाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत कांदिवली येथील कलादर्पण संस्थेने ५१ हजारांचे प्रथम बक्षीस व स्मृतीचिन्ह, पनवेल येथील सखी ग्रूपने द्वितीय क्रमांकासह २५ हजार व स्मृतिचिन्ह, अलिबाग येथील मनस्विनी मंगळागौर ग्रूपने दहा हजारांचे तृतीय आणि अंबरनाथ येथील जागर मंचने चौथ्या क्रमांकासह पाच हजारांचे बक्षीस व स्मृतीचिन्ह पटकावले. या स्पर्धेत माजिवडा येथील सृजन सख्या, सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील सखी मंगळागौर ग्रूप, पनवेल येथील नाच ग घुमा, राबोडी येथील जय महालक्ष्मी, ऐरोली येथील रुचिरा ग्रूपमधील महिला गटांना उत्तेजनार्थ बक्षीसाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत नऊ बक्षिसे देण्यात आली. गडकरी रंगायतनमध्ये सकाळी सुरू झालेल्या या स्पर्धेला शेकडो महिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे रंगायतनचा परिसर महिलांनी फुलून गेला होता. महिलांच्या एकेक…

 राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व गुंड प्रशांत देशमुख यांना अटक करा !

शिवाजीराव जोंधळे हत्येप्रकरणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांची मागणी अनिल ठाणेकर     ठाणे : शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नामचीन गुंड प्रशांत देशमुख, तसेच गीता खरे, वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी जाहीर मागणी शिवाजीराव जोंधळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र व समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी त्यांच्या आई व ट्रस्टच्या उपाध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, भाऊ व ट्रस्टचे सेक्रेटरी देवेंद्र शिवाजीराव जोंधळे, बहिणी श्वेतांबरी शिवाजीराव जोंधळे, वैष्णवी गायकवाड, भाऊ किशोर जोंधळे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते. शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना यकृताचा कर्करोग झाला होता. या आजारपणचा गैरफायदा घेऊन त्यांची संपत्ती, मिळकत, जमीन,  व्यापारी गाळे, सोने, रोकड अशी कोट्यावधीची प्राॅपर्टी शिवाजीराव यांच्याशी विवाहबाह्य संबंध असलेल्या गीता खरे व त्यांच्या परिवाराने  हडप केली तसेच शिवाजीरावांवर उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा करुन त्यांची नियोजनबद्ध हत्या घडवून आणली. याबाबत विष्णुनगर पोलीसांत तक्रार करुनही त्यांनी गीता खरे व त्यांच्या परिवारावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर कल्याण प्रथम वर्ग न्यांयालयाने याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने, याप्रकणी गीता खरे,वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गीता खरे व त्यांच्या कुटुंबियांना शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी सक्रिय सहकार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व नामचीन गुंड प्रशांत देशमुख यांच्यावरही शिवाजीराव जोंधळे हत्याप्रकरणात गुन्याची नोंद करुन त्यांनाही अटक करावी अशी जाहीर मागणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘शिवाजीराव जोंधळे यांचे गेले ३० वर्षाचे आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रीतम देशमुख हा माझा नातेवाईक असल्याने तेवढाच माझा संबंध आहे.पण सागर जोंधळे यांना मी ओळखत नाही, ते काळा की गोरा मला माहित नाही. त्यामुळे सागर जोंधळे यांनी दावा केलेल्या प्रकरणाशी माझा काहीही  आणि कोणताही संबंध नाही.याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस योग्य तो तपास करतीलच.’