Category: ठाणे

Thane news

ठामपातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत

 जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर, सार्वजनिक उत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण २१ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि पत्रकार पंकड रोडेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या जय भवानी मित्र मंडळाने ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर, द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी ‘कैफियत समाधानाची’ हा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या ‘सुरक्षितता’ या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे)  यांना मिळाला. स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, सावरकर नगर यांना तर, द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हाडा वसाहत, तर, तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, सावरकर नगर यांना मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तीकार प्रथम पारितोषिक वुिनोद शिळकर – गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा, द्वितिय पारितोषिक राकेश घोष्टीकर – श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, तर, तृतीय पारितोषिक दिपक गोरे – कोलबाड मित्र मंडळ यांनी पटकाविले आहे. पारितोषिक वितरणाची तारिख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी – रोहन घुगे

  ठाणे : प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.

गणेश-विसर्जन मिरवणुकीत सळसळती तरुणाई साकारणार ‘ब्रो- ठाणे बदलतंय!’

 सार्वजनिक उत्सव मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत  तरुणाईशी निगडित  विषयांवर विविध समूह आपली कला सादर करतील. यावेळी ठाणेकरांना ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्याचा आनंद घेता येईल. सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून विसर्जन मिरवणूक सुरू होईल.  धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन  वर्तकनगरपर्यंत ही मिरवणूक निघेल. विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेल. शिवाय ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू यात सहभागी होतील, त्यांनी श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला होता. शिवाय नवी दिल्लीत   प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होतील. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये  ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे  प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू,  प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित राहतील. या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक,  मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूह सहभाग घेतील. या आगळ्यावेगळ्या अशा ‘ब्रो ठाणे बदलतंय’ विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे. 0000

आशियाँ फाऊंडेशनने दिला महिला सबलीकरणाचा नारा

ठाणे : आशियाँ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यात सध्या महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यावर जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने आशियाँ फाऊंडेशनने विविध गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात पथनाट्य सादर करून जनजागरण अभियान राबविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिरेश उजगरे, वेदांत खोत, प्रशांत अदनवाले, रवींद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत समाजामध्ये जनजागरण व्हावे तसेच कायद्याची माहिती जनतेला मिळावी, या दृष्टिकोनातून  आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण अभियान सुरू केले आहे. रविवारी या संस्थेच्या वतीने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी रितेश जाधव, साक्षी मंचेकर,राहुल जगताप, सीताराम खडे, आकाश लोणारे यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नारपोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे पथनाट्य सादर केले. या प्रसंगी बालगोपाळ मित्रमंडळ, साई प्रसन्न को. सो. नारपोलीचे अध्यक्ष घोसाळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सर्वकार्येषु सर्वदा: होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आर्थिक पाठबळाचे आवाहन

ठाणे : गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही संस्था गेली १६ वर्ष अविरतपणे काम करीत आहे. संस्थेच्या कामाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासह त्यांच्या…

लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात पैशांच्या उधळणीचे चित्रीकरण प्रसारित झाले. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. शनिवारी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन…

ठाण्याचा राजा, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ४६ वर्षांची अव्याहत परंपरा

Photo-5   अनिल ठाणेकर ठाणे : उदय नगर, पांचपाखाडी येथे २६ जानेवारी १९७९ रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या…

दत्तात्रय चिव्हाणे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर

ठाणे : ठाण्यातील सावरकर नगर येथील कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कला क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ध्येयवादी कलाकारांना सदर पुरस्कार नवी मुंबई स्थित…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

ठाणे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने यापूर्वी असलेली २० ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यात आली असून नवीन मुदतवाढ ही उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.

श्याम ठाणेदार वादळी सन्मान पुरस्काराने सन्मानित

ठाणे : श्रीगोंदा जिल्हा अहिल्या नगर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना  वादळी सन्मान पुरस्काराने सुवर्णाताई पाचपुते, दिग्विजय नागवडे, साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे, उपसंपादक बाळाप्रसाद मंत्री, बाळासाहेब नाहटा, आदर्श शिक्षक रामदास ठाकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचा विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला.  श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना वादळी सन्मान  पुरस्कार देण्यात आला. श्याम ठाणेदार हे साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यमध्ये नियमित लेखन करतात. स्तंभलेखन करतात. साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य मध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत म्हणूनच त्यांना वादळी पुरस्काराने गौविण्यात आले आहे. श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.