Category: ठाणे

Thane news

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन

अनिल ठाणेकर ठाणे : परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अनेक वर्षापासून ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागांतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी यांची नोंदणी, बॅज वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो. त्यामुळे ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांची अदयावत संपूर्ण माहिती (डेटा) परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनाकडून महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या १. जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, २.आरोग्य विषयक लाभ, ३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५०,०००/-), ४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ५. कामगार कौशल्य वृध्दी योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत. हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या १६ मार्च २०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे, असे कल्याण चे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

युवांनी “माय भारत” पोर्टलवर नोंदणी करा

क्रीडा विभागाकडून आवाहन ठाणे : भारत देश युवांचा देश म्हणून ओळखला जात असून राष्ट्र निर्माणाच्या शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात युवांचे मोठे योगदान आहे. सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग असून तो वाढविणे आवश्यक आहे. यासाठी युवक कल्याण व क्रीडा विभाग यांनी दि.१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान युवांच्या सहभागाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे. “माय भारत” पोर्टलवर विविध युवा उपक्रम नोंदणी करणे, सेवाकार्य, स्वच्छता हा नवीन संकल्प-स्वच्छता पंधरवडा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवांचा राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग वाढविणे, विकसित भारत करण्यामध्ये युवांनी योगदान देणे, याबाबत या पोर्टलवर युवांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी या https://mybharat.gov.in  संकेतस्थळावर  जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड इ. विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी नोंदणी करावयाची आहे. यामध्ये युवांनी केलेल्या विविध कार्याची माहिती संकलित होते. त्यांनी विविध वर्षामध्ये तसेच कार्यक्रमामध्ये घेतलेल्या सहभगाबाबत तपशिल एकत्रित होतो. यामुळे युवांनी केलेल्या कार्याची वैयक्तिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते. ठाणे जिल्ह्यातील विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील युवा व राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र यांनी नोंदणी “माय भारत” पोर्टल वर करण्यात यावी. १५ ते २९ वयोगटातील युवा विचारात घेता शाळा , कनिष्ठ महाविद्यालय  व महाविद्यालय यांनी नोंदणी करावी. उर्वरित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे  दूरध्वनी: ०२२-२५३६८७५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

उल्हासनगरातील ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेली अवैध ४ मजल्याची इमारतीवर आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे. उल्हासनगरात विना परवाना अवैध बांधकामे सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे आल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेल्या ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला दिले. त्यानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे. कॅम्प नं-३ मधून वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारी शांतीनगर व हिराघाट परिसरात अवैध शेड उभे राहिले असून गावडे शाळेजवळ अवैधपणे असंख्य खोल्या बांधण्यात येत आहे. तसेच महादेव कंपाऊंड व जुन्या डम्पिंग परिसरात अवैध बांधकामे उभे राहिल्याची चर्चा शहरात होत आहे. उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे शहर असे समीकरण झाले आहे. अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. त्यामध्ये वेळोवेळी बदल करून अतीधोकादायक इमारतीचा प्रश्न समाविष्ट करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, बांधकाम नियमित झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी रखडली आहे. तर दुसरीकडे अवैध बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप शहरातून होत आहे. सोनार गल्लीतील शौचालये गेले कुठे? कॅम्प नं-२, शिरू चौक ते सोनार गल्ली परिसरात चक्क महापालिका शौचालये भूमाफियांनी हडप करून अवैध बांधकामे उभी राहिली आहे. एकेकाळी सार्वजनिक शौचालयासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनार गल्लीत अपवादात्मक एखादे शौचालये शिल्लक राहिले आहे. तसेच शौचालये हडप करून बांधलेल्या अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

 सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन..   विरार :- शासनाच्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत…

गौरी-गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ

 महापालिका क्षेत्रात १४३९९ श्रीगणेश मूर्तींचे तसेच ११४७ गौरी मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन   ठाणे : श्रीसह गौरी विसर्जनाच्या सहाव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १४३९९ गणेश मूर्ती तसेच ११४७ गौरी…

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत इंद्रलोक जेष्ठ नागरिक संस्था (रजि), इंदलोक केज ४, भाईंदर (पूर्व), ४०११०५ ~येथील विरंगुळा केंद्रात नुकताच जेष्ठ नागरिक सभासदा‘चा वाढदिवस साजरा करण्यांत आला. संस्थेचे अध्यक्ष…

भारतीय मराठा महासंघ च्या जिल्हा अध्यक्षा ठाणे लोकसभा क्षेत्र उद्योग आघाडी आणि तसेच मानवता सेवा जनकल्याण प्रतिष्ठान उपाध्यक्षा आणि कुटुंब फॉउंडेशन उपाध्यक्षा आणि आदिवासी बहुजन पर्यावरण सेवा ची सल्लागार आणि…

 कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

 भांडुप परिमंडलातील १ लाख २० हजार ग्राहक पात्र   ठाणे : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या भांडुप परिमंडलातील १ लाख १९ हजार ५७५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळू शकते. त्यासाठी…

पॅरेगॉन सारख्या नामांकित कंपनीने गणेश भक्तांसाठी रांगेत विश्रांती धाम बनवलं असून चालून थकलेल्या गणेश भक्तांना फूट मसाज केंद्र मोफत सेवा पॅरेगॉन ने दिली आहे. मुंबईमध्ये मुंबईचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा…

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसची पहिलीवहिली शाखा ठाण्यात

ठाणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपनी पैकी एक, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने (जेएमएफएस) तिची पहिली शाखा ए/४१०, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू केल्याची घोषणा केली.गतिशील आणि…