Category: ठाणे

Thane news

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन

महाराष्ट्रात पहिल्यांदाच पेमेंट गेटवेचा वापर अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा परिषदे मार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील १० लाखाच्या आतील विकास काम विनास्पर्धा ऑनलाईन…

 उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ?

पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी बदलापूरः उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटींना…

कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम – डॉ.डी.एल.कराड

ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व विचारवंत कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीचे, श्रमिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. देशाच्या कम्युनिस्ट चळवळीतील ते सर्वात लोकप्रिय…

नितेश राणेंचा नवा गेम हिंदू मुस्लिम दंगा घडविण्याचा – हाजी शाहनवाज खान

पनवेल : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नितेश राणे आले…

राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्यावर भाजपाचे `कॉंग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ’

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन ठाणे : दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर…

विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

ठाणे : गणरायाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. ठाण्यात विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे पाच हजार पोलिसांचा…

क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन सेवांचा लाभ

भाईंदर : नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु अनेकांना या सेवांचा लाभ कसा घ्यायचा, त्याची लिंक कशी मिळवायची याची माहिती नसते. यासाठी महापालिकीन एक…

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी

पनवेल : लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू…

ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृती कार्यक्रमाचा 11 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ईव्हीएम प्रात्यक्षिक…

 वसई विरारमध्ये पाच दिवसीय गणपतीचे भावपूर्ण विसर्जन

 ६६ टक्के विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावात   विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी ४ हजार ९८१ गणेश मूर्तीचे म्हणजेच ६६.३४ टक्के विसर्जन कृत्रिम तलावात झाले. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेली जनजागृती, ठिकठिकाणी उभारलेले १०५ कृत्रिम तलाव, विसर्जनासाठी केलेल्या सोयी सुविधा यामुळे गणेश भक्तांचा कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. वसई विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून मागील २ वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बुधवारी वसई विरार शहरात बुधवारी ५ दिवसीय एकूण विसर्जनापैकी कृत्रिम तलावात ४ हजार ८७१ घरगुती गणेशमूर्तीचे तर ११० सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन झाले. उर्वरित २ हजार ५२७ मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक तलाव आणि समुद्रात झाले शहरातील पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाकरिता, प्रत्येक कृत्रिम तलाव विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप, फिरते शौचालय उभारून दिवाबत्तींची सोय करण्यात आली होती. तसेच पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक गणेशभक्तांच्या मदतीसाठी तैनात होते. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी वर्ग आपापल्या प्रभागातील विसर्जन स्थळावर हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. विसर्जन शांततेत संप्पन्न झाले आणि गणेशभक्तांची कुठलीही गैरसोय झाली नाही. तसेच यंदा विसर्जनात शाडू मातीच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामुळे नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखले गेले आहे. महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी विसर्जन नियोजनाची प्रत्यक्ष पाहाणी केली आणि गणेशभक्तांशी संवाद साधला. तसेच नियोजनाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. कोट वसई विरार मधील सुजाण नागरिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरुक आणि संवेदनशील असल्याने कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे प्रमाण वाढत आहे. गणेश भक्तांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो. येणाऱ्या सात दिवसीय, अनंत चतुर्दशी आदी विसर्जनावेळी देखील नागरिकांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे आणि निसर्गाची हानी टाळावी. – अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका