Category: ठाणे

Thane news

१०० एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर   ठाणे : शहरात सुमारे १०० एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे.  शंभर एकरची वन जमीन अवघ्या ३१ कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे. या संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमधील ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ठाण्यात झालेल्या वनजमिनीचा घोटाळा उघडकीस आणण्याचे सूचक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे.महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. ३१ कोटी रूपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. पण, राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे? अन् यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात येईल. जवळपास १०० एकर पेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल, हे त्या बिल्डरला हे ट्वीट वाचल्या-वाचल्या लगेच समजेल !” जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी या घोटाळ्यात कोण सहभागी असावे, कोणता ट्रस्ट याची चर्चा रंगली आहे. 000000

सुदर्शन दीपक चव्हाण याचा विशेष सन्मान

ठाणे,  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण यांचे सुपुत्र व सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी सुदर्शन दिपक चव्हाण हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.…

कातकरी समाजाच्या कुटुंबाना हक्काची मिळणार घरे

पालकमंत्र्यांनी स्वतःची जमीन देऊन सोडविला प्रश्न राज भंडारी   पनवेल :जिल्ह्यातील कातकरी समाजाचा ७० भटक्या कुटुंबाच्या घरांसाठी जागेची समस्या होती. वर्षानुवर्षे त्यांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. सरकारकडे या समाजातील कुटुंबाना देण्यासाठी जमीन उपलब्ध नव्हती. जेव्हा ही समस्या सिंधुदुर्गनगरी येथील जनता दरबारात मांडण्यात आली त्यावेळी ही समस्या ताबडतोब सोडविण्यात आली. यासाठी आपण स्वतःची ओसरगांव येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आणि जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या कातकारी बांधवांना लवकरच हक्काची घरे उपलब्ध होतील, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या सर्व कुटुंबांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानले आणि असा नेता किंवा मंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. वर्षानुवर्षे आम्ही भटकत होतो पण आता आम्हाला हक्काचा निवारा मिळाला आणि आता आमच्या सर्व पिढ्या हक्काच्या घरात राहतील त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे , अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांच्या सोबत भाजप आमदर नीतेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगट आदींसह खाते प्रमुख तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. जनता दरबार हा प्रसिद्धीसाठी नाही. या पूर्वी सुद्धा जिल्ह्यात असे जनता दरबार होत होते. आज झालेल्या जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाले आहे. सर्वसामान्यांचे तक्रारीचे निरसन होणे हेच खरे या जनता दरबाराचे यश आहे, असे प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदर वैभव नाईक यांच्या टीकेला दिले. आमदर नाईक यांनी पालकमंत्र्याचा जनता दरबार हा निवडणुकांसाठी फार्स असल्याची टीका केली होती. सार्वजनिक बांधकाम हायवे आणि पाटबंधारे विभागातील सर्व ९ अर्जाचे निरसन केले असून पोलीस प्रशासनाचे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्व १६ अर्जाची पूर्तता झाली असून कृषी व आरोग्य विभाग ५, मध्यम पाटबंधारे आणि नियोजन विभाग ३, समाज कल्याण विभाग २, नगर विकास खारभूमी विभाग ६ असे विभागनिहाय अर्ज निकाली काढल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. उर्वरित अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ८५९ युवक – युवतींना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ हजार उमेदवारांना विविध विभागात रोजगार देण्यात आला आहे. उर्वरीत उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील रोजगार विषयक उपक्रमांची माहिती द्यावी, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवर घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्हयात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३८३ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १ लाख ४४ हजार ८७४ अर्ज पात्र ठरले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार सोमवारी कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांसाठी सिंधुदुर्गनगरी येथे जनता दरबार झाला. तसेच मंगळवारी कुडाळ – मालवण मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांसाठी याच ठिकाणी जनता दरबार संपन्न झाला. या सर्व जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला.

 ठाणेकरांच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे पूर्ण होणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून आभार   ठाणे : ठाणे शहरातील २५ लाखांहून अधिक नागरिकांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही धन्यवाद दिले आहे. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पात नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आदी स्थानके असतील. या मेट्रोचा वेग ताशी ८० किलोमीटर असल्यामुळे ठाण्यातील रहिवाशांना एका भागातून दुसऱ्या टोकाला वेगाने जाता येईल. येत्या २०२९ पर्यंत मार्ग पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोमुळे दर तासी १५ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीत अडकावे लागणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली. ठाणे अंतर्गत मेट्रोच्या एका कार युनीटमध्ये प्रती चौरस मीटर प्रवाशांची क्षमता ६ ते ८ आहे. उन्नत व भूमिगत स्थानकांच्या मेट्रो मार्गामुळे ठाण्याच्या विकासाला आणखी वेग येईल. तसेच ठाणे शहराची देशातील विकसित शहरांमध्ये नोंद होईल, अशी आशा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेट्रो प्रकल्पाची किंमत १२ हजार २०० कोटी रुपये असून, पुढील पाच वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. चौकट अशी धावणार अंतर्गत मेट्रो (भूमिगत व उन्नत मार्ग) : नवीन ठाणे (भूमिगत), रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाईनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ (भविष्यामध्ये प्रस्तावित), वॉटरफ्रंट, पातलीपाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित),आझादनगर बस स्टॉप, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र (भविष्यामध्ये प्रस्तावित),बाळकुम नाका, बाळकुम पाडा (भविष्यामध्ये प्रस्तावित), राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन

कोलकात्यातील निर्घुण हत्येबद्दल कोपरीकरांनी व्यक्त केला संताप

ठाणे : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत निषेध…

दहीहंडीसाठी धारावी कुंभारवाडा सज्ज

धारावी : श्रीकृष्‍ण जन्माष्टमी, गोपाळकाला आठवडाभरावर आल्‍याने सर्वत्र या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. दहीहंडीसाठी लागणारी मटकी बनवण्याचे काम धारावीतील कुंभारवाड्यात अनेक वर्षांपासून सुरू आहे. सध्या मटकीवरील कलाकुसरीचे काम अंतिम…

मुकबधिर विद्यार्थिनीकडून वृक्षांना रक्षाबंधन

खर्डी : वासिंद परिसरातील दहागाव येथे रक्षाबंधनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर झाडांना राखी बांधण्यात आली. डोंबिवली येथील रोटरी क्लब, रोटरी क्लब फॉर डेफ स्कूल व पर्यावरणवादी सामाजिक संस्था शहापूरच्या संयुक्त…

ठाणे मनोरुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

ठाणे : भावा-बहिणीचे पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मनोरुग्णांच्या हातावर बांधल्या. या वेळी…

 शिवाजी चौकातील कार्यक्रमांमुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

 शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन कल्याण : सोमवारी नारळी पौर्णिमा आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डामडौलातील दिखाव्याचा कार्यक्रम करण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. या चौकातील मंडपाला पोलीस, वाहतूक, गोपनीय पोलिसांचा विरोध असताना सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून शिवसेनेकडून रेटून शिवाजी चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारात घेऊन आमदार विश्वनाथ भोईर यांनी वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे. वाहतूक विभागाने या मार्ग बदलाची कोणतीही अधिसूचना काढली नसताना, आमदार भोईर यांनी स्वतःहून वाहन चालकांनी शिवाजी चौक मार्गाऐवजी पर्यायी रस्ते मार्गाने वाहने नेण्याचे आवाहन केले आहे. शिवाजी चौकात कोणताही कार्यक्रम नसताना दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अगोदरच वाहन कोंडी असते. या चौकात आंदोलन, मोर्चा काहीही कार्यक्रम असेल तर शिवाजी चौक एक ते दोन तास कोंडीत अडकतो. या चौकापासून वाहनांचा रांगा दुर्गाडी चौक, लालचौकी, आधारवाडी चौक, काळा तलाव चौक भागात लागतात. या रांगांमुळे कल्याण शहरातील रस्ते वाहन कोंडीत अडकतात. पत्रीपुलाकडून येणारी वाहने या कोंडीत अडकतात. या वाहनांचा शिवाजी चौक ते पत्रीपूल आणि पुढे रांगा लागतात. हे माहिती असुनही आमदार भोईर यांनी लाडकी बहिण योजनेचा आणि नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम लोकांसमोर साजरा झाला पाहिजे म्हणून भर वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप टाकण्याचे नियोजन केले आहे. गोपनीय विभागाने शिवाजी चौकात मंडप उभारणी केली तर अभूतपूर्व वाहन कोंडी या चौकात होऊन संपूर्ण शहर ऐन सणासुदीत कोंडीत अडकेल, हा विचार करून शिवसेनेला शिवाजी चौकात मंडप उभारणीस तीव्र आक्षेप घेऊन तसे लेखी पत्र वरिष्ठांना दिले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या कोंडीची माहिती देण्यात आली. पण राज्य सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आणि या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे येणार असल्याने या कार्यक्रमाला विरोध करू नका, अशी चर्चा पोलीस वर्तुळात झाल्याने या मंडपाला यंत्रणांनी विरोध केला नसल्याचे समजते. शिवाजी चौकात सोमवारी कोंडी झाली तर आणि काही गैरप्रकार झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर टाकण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. आमदार भोईर यांनी मात्र शिवाजी चौकात मंडप असला तरी तेथे वाहन कोंडी होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे, असे सांगितले. शहर कोंडी मुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचीही आहे. पण पालिका अधिकारी सुट्टी असल्याने आपल्या मुळ शहरात जात असल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही या महत्वपू्र्ण विषयाकडे लक्ष नसल्याचे समजते.

 पनवेल उरण महाविकास आघाडीची आज यलगार परिषद

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती     पनवेल : राज भंडारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पुरण…