Category: ठाणे

Thane news

 कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार

कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार भाजप पदाधिकाऱ्यांचा सहाय्यक आयुक्तांना इशारा कल्याण :  डोंबिवली पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात आले. मात्र या स्मशानभूमीवर अंतविधीसाठी लागण्याऱ्या सुविधांचा अभाव असून सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नाही आहे. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत अनागोंदी कारभाराबाबत मंगळवारी प्रभागक्षेत कार्यालयात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य, विशाल पारखे, जयप्रकाश सावंत,पवन मोरे आणि इतर भाजप पदाधिकारी प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना रीतसर पत्र दिले. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत २४ तास कर्मचारी आणि  सुरक्षा रक्षक नियुक्त करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा द्यायलाच पाहिजेत अशी मागणी भाजप पदाधिकारी यांनी पालिकेकडे दिली आहे. जर याकडे पालिकेने लक्ष दिले नाहीतर आंदोलन केले जाईल इशारा देण्यात आला आहे. या स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील असे कर्मचारी नाहीत. अलीकडेच येथे दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते. ज्यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिली आहे. स्मशानभूमीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे स्मशानभूमीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे, तसेच रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते. स्मशानभूमीत पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून त्यांची नियमित सफाई केली जात नाही, असे भोईर यांनी सांगितले..

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध ! अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच, दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या  थकीत वेतन वाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.२४ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच, नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. “दिलेला शब्द पाळला,” अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.

 मातीच्या विल्हेवाटीसाठी डेडीकेट कॉरिडॉरचा आग्रह

ठाणे – बोरीवली भुयारी मार्ग मातीच्या विल्हेवाटीसाठी डेडीकेट कॉरिडॉरचा आग्रह न जुमानणाऱ्या विकासकांवर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा रहिवाश्यांचा इशारा अनिल ठाणेकर ठाणे-ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवर…

 डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडे मागणी कल्याण: डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, वाहतुकीची अडचण तसेच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चोधरी, उपमहापौर राहुल दामले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नागरिकांकडून प्राप्त झालेली निवेदने, स्थानिक रहिवाशांच्या मागण्या व सार्वजनिक हिताचा विचार करून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्बाध पादचारी मार्ग उपलब्ध व्हावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका रंजना पेणकर आणि मितेश पेणकर यांनी दिला आहे.

 सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा इंदिरानगर संघर्ष रहिवासी संघटनेची  पोलिसांकडे मागणी कल्याण: टिटवाळा पुर्व येथील इंदिरानगर स्मशानभूमी रस्ता विभागात सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र शेजुळ हे गेले १५ वर्षांपासून राहणारे असून गेल्या ८ वर्षांपासून परिसरातील सामाजिक कामे जनतेची सेवा सर्वांशी मनमिळावू स्वभावामुळे त्यांची ओळख होती.  मात्र २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेजूळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इंदिरानगर संघर्ष रहिवासी संघटनेने पोलिसांकडे केली आहे. शेजूळ कामावरून घरी जात असताना अचानक अर्जुन शर्मा यांने आवाज दिला मागे वळून बघितले तितक्याच पाठीमागून त्यांचे आणखी दोन सहकारी यांनी धार-धार कोयत्याने वार करून जिवे मारण्यासाठीचा कट त्याचा अधिपासुनच प्लानिंग केला होता असे दिसून येते.  महेंद्र जोरात ओरडल्या ने चाळीत राहणाऱ्यानी बचाव करण्यासाठी गेले असता त्यांच्या वर देखिल हल्ला करत तेथुन पळ काढला. यावेळी  चाळीतील लोकांनी महेंद्र यांना रक्तस्राव चालू असलेल्या अवस्थेत उचलून रुग्णालयात दाखल केले असता त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक असून पुढील उपचार सुरू आहेत. हि घटना माहिती पडताच परिसरात हळहळ व्यक्त होत असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगर मार्फत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आले असून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता कल्याण: संकल्प संस्था आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंतवालावलकर स्कूल, नेहरू नगर येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच समाजकार्याची आवड असलेल्यांसाठी संकल्प संस्थेच्या वतीने १९ आठवड्यांचा सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय, समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, गटकार्य, प्रचार- प्रसिद्धी माध्यमे, समाजकार्यकर्त्यांची भूमिका तसेच विविध सामाजिक समस्या अशा एकूण ५२ विषयांवर ३५ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून चार शनिवारी विविध सामाजिक संस्था, संघटना व शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. यासोबतच दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, स्वयं- परिचय व गट उपक्रम यांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या गायत्री सज्जन वरिष्ठ वैद्यकीय समाज विकास अधिकारी, के. जे. सोमय्या हॉस्पिटल उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून युगंधरा कोळी अभिनेत्री, मॉडेल व रील स्टार तसेच गौरी राव अखिल चित्रपट महामंडळ सदस्या आणि अभिनेत्री व शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना तसेच सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील व रेश्मा जगताप यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

 मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार

मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार आसनगाव उड्डाणपुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक ठाणे: शहापूर तालुका येथील गर्दीचे एकमेव स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक ओळखले जाते.दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.मात्र,रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका स्थानिक नागरिक व प्रवाशांना बसत आहे. स्थानक परिसरातील एकमेव जुने फाटक रेल्वेने संरक्षक भिंत उभारून बंद केल्यामुळे हजारो नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.त्यामुळे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आसनगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र, पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली असली तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. उड्डाणपूल नसल्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि चाकरमानी प्रवाशांना तब्बल तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.हनुमान मंदिराजवळील रस्ताही रेल्वेने बंद केल्याने शिवाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. जुने फाटक बंद केल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड  किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.शिवाय उंच स्थानकावरील जिने चढताना महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली असून माजी खासदार कपिल पाटील यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र,अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त होत असून लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिक्रिया : “आसनगाव फाटकातून गेली अनेक वर्षे आम्ही पश्चिमेकडून पूर्वेला जात होतो. विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी हा मार्ग सोयीचा होता.पण आता संरक्षक भिंत उभारून सर्व रस्ते बंद केल्यामुळे आम्हाला मोठा फेरा मारावा लागतो.या समस्येमुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. – संजय उमवणे, स्थानिक नागरिक

  वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत

वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत शहापूरात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप, अविनाश उबाळे ठाणे : नीलगायींचे कळप स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायींचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत. किन्हवली परिसरात रस्त्याकडे लावण्यात आलेले हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण प्रकल्प व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहे.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत.दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत. निलगायी या भाजीपाला आणि कडधान्य फस्त करीत आहेत. निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत. शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव, कुडशेत, मुसई बेडीसगाव, परटोली, उंब्रई, कानवे, चेरवली, आष्टा, आदिवासी, लवले, ठुणे आणि किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत. या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा, वाल, मटकी इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी, घोसाळी, शिरवळे, भोपळा, गवार, काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत. यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे.नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये ठाणे -बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील बुध्द विहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला…

भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी

भाजपाच्या करवाढी विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन-अरविंद जोशी मीरारोड – विधिमंडळात विरोधकांचा जोमाने एकत्रित मुकाबला करणारे सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रस्त्यावर मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी असल्याचे…