Category: ठाणे

Thane news

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जागृती उपक्रमाचे आयोजन करा –  सौरभ राव

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले…

आफ्रोह्चे ठाण्यात आंदोलन अनुसूचित क्षेत्रातील ‘बोगस’ आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील

 कर्मचा-यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन         ठाणे :.सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या…

एकलव्यांसाठी संधींची खिडकी उघडली आहे तिचा उपयोग करा – अलका धुपकर

ठाणे : आपल्या आर्थिक परिस्थितीने खचून न जाता, विषमतेने भरलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीला न घाबरता समता विचार प्रसारक संस्थेने उघडून दिलेल्या खिडकीतून अनेक संधी तुम्हाला खुणावत आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी…

 राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे : राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणेबाबत जाहीर अवाहन

ठाणे : महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्य दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, यावर…

कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार श्री.निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक करून विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा देताना  समाजसेवक व उपाध्यक्ष  म्युनिसिपल मजदूर युनियन  मुंबई महानगरपालिका सुनिल मोरे दिसत आहे.

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे वारकरी बांधवांसह विठू नामाच्या जयघोषात झाले दंग !

तरडगाव ते फलटण या मार्गावर वारीत घेतला सहभाग     कल्याण : लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असता. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग होत असतात. गेल्या वर्षी प्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला. खासदार डॉ.शिंदे यांनी यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांदयावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपायोजना राबविल्या आहेत. विशेष दिंड्यांना आर्थिक साहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचे मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. 00000.

डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल

गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शेतघरात आश्रय दिल्याचा ठपका अनिल ठाणेकर     ठाणे, उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला. रुतिक उर्फ अटल अनिल शुक्ला (रा. म्हारळ, उल्हासनगर), गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ), सुमीत सत्यवान सैनी (रा. योगीधाम, कल्याण), शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक जनार्दन ठाकरे (रा. कल्याण) आणि डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव व शेतघराच्या मालकीण गीता खरे अशी आरोपींची नावे आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन बबनराव पत्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तीन ते चार जणांनी केला होता. या प्रकरणातील आरोपी गुन्हा करून फरार झाले होते. उल्हासनगर पोलीस शोध घेत होते. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी माळशेज घाटातील ओतुर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन पत्रे, उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक करंजाळे येथे पोहचले. रात्रीच्या वेळेत ओतुर पोलिसांच्या साथीने उल्हासनगर पोलिसांंनी शेतघरावर छापा टाकला. तेथे १५ जण होते. सहा इसम पोलिसांना पाहून पळून गेले. शेतघराचे व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना पोलिसांनी या शेतघरात आरोपींची नावे वाचून दाखवून ते येथे राहतात का म्हणून विचारणा केली. प्रतीकने, अटल शुक्ला याच्या सूचनेवरून सोहन पवार, धीरज रोहेरा, यश पवार येथे राहत आहेत असे सांगितले. हेच गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उल्हासनगर येथे आणून अटक केली. अटल शुक्ला याने शेतघराचा व्यवस्थापक प्रतीक ठाकरे यांना येथे राहणारे तीन लोक हे उल्हासनगर मधील गंभीर गुन्हयातील आरोपी आहेत. त्यांची राहणे, भोजनाची व्यवस्था कर, अशी सूचना केली होती. त्यामुळे तिघांना या शेतघरात आश्रय मिळाला होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अटल शुक्लाला गोपाळ सत्यवान पाटील (रा. म्हारळ) याने शेतघराचा संदर्भ दिला होता. तीन जण गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत हे माहिती असुनही त्यांची माहिती पोलिसांपासून लपवली आणि गन्हेगारांना शेतघरात आश्रय देण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 00000

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने

नमुंमपा कर्मचा-यांना एनडीआरएफ मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण       ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात ते स्पृहनीय असल्याचे सांगत त्यांनी एनडीआरएफमार्फत आज मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. अनिता जवंजाळ, यशदाचे मुख्य प्रशिक्षक श्री. योगेश परदेशी तसेच एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे उपस्थित होते. पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले. 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकणाव्दारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहका-यांसह प्रात्याक्षिके दाखविली. आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी होणार आहे.

 राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२४’ साठी रोख १ लाखाहून अधिक पारितोषिके

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने साहित्य पाठविण्याचे आवाहन     ठाणे : साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान करणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी रूपये १ लाखाहून अधिक रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारी २०२३ मराठी भाषा गौरव दिवस ते २७ फेब्रुवारी २०२४ मराठी भाषा गौरव दिवस या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखन, विनोदी साहित्य, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, वृत्तबद्ध काव्य साहित्य, स्त्रीवादी साहित्य, गजल साहित्य, ऐतिहासिक साहित्य, लक्षवेधी साहित्य या पुरस्कारांसाठी साहित्य मागविण्यात येत आहे. ‘साहित्यवलय’ या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी १ हजार रूपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली. साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी कथा, कविता, कादंबरी या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट साहित्यकृतीला पुरस्कृत करण्यात येईल. पुरस्कार सोहळा ठाण्यात होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रातील नवोदित लेखकांच्या पहिल्या पुस्तकासाठी साहित्यवलय साहित्य पदार्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक साहित्यिकांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून ठराविक उत्कृष्ट पुस्तकांना ‘साहित्यवलय लक्षवेधी साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याचबरोबर साहित्यवलय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, साहित्यवलय विनोदी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय बालसाहित्य पुरस्कार, साहित्यवलय अनुवादित साहित्य पुरस्कार, साहित्यवलय वृत्तबद्ध काव्य साहित्य पुरस्कार, साहित्यवलय स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय गजल साहित्य पुरस्कार, साहित्यवलय ऐतिहासिक साहित्य पुरस्कार अशा विभागात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अधिकाधिक साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृती पाठवाव्यात असे आवाहन पाचंगे यांनी केले. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्प परिचय आणि पासपोर्ट फोटोसह १५ जुलै२०२४ पर्यंत पाठवावे. धृपद एन्टरटेन्मेंट, १३०६, जे व्ही एम वेदा, ट्रॅफिक सिग्नल पार्क जवळ, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे प. ४००६१५ या पत्त्यावर साहित्य पाठविण्याचे आवाहन पाचंगे यांनी केले. अधिक माहितीसाठी 9773953775 या क्रमांकावर संपर्क साधावा. 000000