Category: ठाणे

Thane news

ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी

ठाणे : शहरातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासन आणि माजी नगरसेवकांची एकत्रित बैठक बुधवारी सायंकाळी आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला भाजपाचे माजी…

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी दिला जाणारा आहार, गृहभेट व आरोग्याची तपासणी वेळोवेळी करा. घरातील मुलाप्रमाणे ग्रामपंचायतीतील बालकांना सांभाळा अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे  यांनी दिल्या.…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या…

ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या या पत्रकात म्हटले आहे की, कोकण विभागीय क्षेत्रात राहणारे व ज्यांची  कोकण पदवीधर मतदार संघाचे यादीत नावे आहेत अश्या सर्व निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस बांधवांना संघटनेतर्फे विनंती करण्यात येत आहे की, श्री डावखरे निरंजन वसंत हे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. श्री. डावखरे निरंजन वसंत  हे आपले सर्वांचे खास मित्र व परिचयाचे असून ते पोलिसांना सतत मदत करीत असतात. ते या क्षेत्रात महान कार्य करीत आहेत. तरी कोकण परिसरातील नोंदणी झालेले सर्व पदवीधर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवारी, २६ जुन २०२४ रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण पदवीधर मतदारसंघातुन उमेदवार असलेले श्री. डावखरे निरंजन वसंत यांच्या नावासमोरील प्रथम क्रमांकाचा 1 आकडा टाकून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे, अशी विनंती संघटनेचे  सल्लागार सोपानराव महांगडे, काशीनाथ कचरे, राजाभाऊ तांबट, मोतीलाल जाधव, अध्यक्ष माधव माळवे, कार्याध्यक्ष  रघुनाथ घरटे, सचिव व खजिनदार बाळासाहेब दंडवते आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्ष रहा – पालक सचिव सुजाता सौनिक

ठाणे,  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा तसाच पावसाळ्याच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यंदाच्या…

कल्पक, प्रयोगशील प्रकाशक माधव जोशी यांचे निधन

ठाणे : परममित्र पब्लिकेशनचे संस्थापक तथा अभाविपचे माजी पूर्णकालिन कार्यकर्ते माधव जोशी यांचे बुधवारी (ता.१२ जून) मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यु समयी ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर माकपचा हजारोंचा धडक मोर्चा

अनिल ठाणेकर ठाणे : पोलीस आणि प्रशासन यांच्या दादागिरीविरुद्ध तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, माकपचे पाॅलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, लहानी दौडा, सुरेश भोये, चंद्रकांत घोरखाना यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जबरदस्त धडक मोर्चा काढण्यात आला. गेले काही महिने तलासरी तालुक्यात पोलीस आणि प्रशासन भाजप-आघाडीच्या राज्य सरकारने आणलेल्या दबावाला बळी पडून सामान्य आदिवासी, महिला यांवर दादागिरी करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे, त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कहर म्हणजे थेट तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनीता शिंगडा यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करण्याची भाजपच्या गुंडांनी हिम्मत केली. याचा समाचार घेणे भागच होते.  या त्यांच्या दादागिरीविरुद्ध जबरदस्त मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवण्याचा निर्णय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांनी घेतला. आठवडाभर जोरदार प्रचार करून बुधवारो, १२ जून २०२४ रोजी हजारो महिला व पुरुषांचा मोर्चा दणकेबाज घोषणा देत तहसील आणि पोलीस स्टेशनच्या आतच घुसला. अखेर सर्व अधिकार्‍यांनी तातडीने शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. सर्व तक्रारी ताबडतोब सोडवण्याचे आश्वासन दिल्यावरच मोर्चा संपला. 0000

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे ठाणे :- इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या भिवंडी व कल्याण येथील मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहांचे गृहपाल प्र. ना. मडावी यांनी केले आहे. वसतीगृहात प्रवेशासाठी अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)- 1. गुणपत्रिका, 2. शाळा सोडल्याचा दाखला, 3. जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), 4. उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकारी),  5. रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), 6. आधार कार्ड तसेच प्रवेश घेतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 2. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, 3. वैद्यकीय प्रमाणपत्र 4. पासपोर्ट साईज फोटो  5.  10 रुपयांचे कोर्ट फी टिकीट लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शॉपीग कॉम्पलेक्स, पहिला माळा, भिवंडी, (संपर्क क्र 9767612897) मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शाँपिग कॉम्प्लेक्स, दुसरा माळा भिवंडी.मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), कल्याण, गौरी अपार्टमेन्ट, पाचवा माळा, बेहतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, (संपर्क क्र. ९७६७६१२८९७). या वसतिगृहात वर्ग 11 ते 12 व पॉलिटेक्निक प्रथम / आय. टी. आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. (हे वसतिगृह शासकीय इमारत, गौरीपाडा, कल्याण, येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.) 000

डोंबिवलीत वीजेचा पुरवठा दहा तास बंद

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू…

कोपरमधील उद्यानाच्या आरक्षणावरील बेकायदा इमारतीवर हातोडा?

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बेकायदा बांधकामांवर ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे वाढल्या आहेत. निवडणूक कामामुळे…