Category: ठाणे

Thane news

रामदास आठवले यांचे कर्जत येथे रिपाइं तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड कर्जत:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री, खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून कर्जत…

शिवाजीपार्कवर ‘सावरकर’ बीकेसीत ‘आंबेडकर’

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…

कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील गोविंंद करसन चौकात प्रवासी वाहतुकीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस उभ्या करून ठेवण्यात येतात. या बस मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने या भागात दररोज वाहन कोंडी होते. या बस प्रवासी वाहतुकीसाठी गोविंद करसन चौकात वळविल्या जातात. या मोठ्या बस वळविताना अनेक वेळा वाहन कोंडी होते. या बसचा थांबा बाजारपेठ विभागातील आतील रस्त्यांवर, बाजार समिती भागातील रस्त्यांवर करण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता आता काँक्रीटचा आणि प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अलीकडे वाहन कोंडी होत नाही. परंतु, गोविंद करसन चौकात केडीएमटीच्या प्रवासी वाहतुकीच्या बस या भागात असतात. या बससाठी उभे असलेले प्रवासी चौकात मुख्य रस्त्यावर उभे असतात. एका पाठोपाठ बस रांगेत उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याचा मुख्य भाग व्यापला जातो. त्यामुळे पत्रीपुलाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एका मार्गिकेतून जावे लागते. या रस्त्यावरून अवजड वाहन जात असेल तर ते या बसच्या कोंडीत अडकते. अनेक वेळा वाहने करसन चौकात वळण घेऊन वलीपीर रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात ही वाहने या बसमुळे अडकतात. आणि शिवाजी चौकातील वाहने या वाहनांचामागे अडकून पडतात. करसन चौकात केडीएमटीच्या बसमुळे दररोजची कोंडी होत असल्याने या चौकातील बस इतर भागातून प्रवाशांंच्या सोयीप्रमाणे सोडण्यात याव्यात, अशा मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या चौकाच्या परिसरात राहणारे व्यापारी, रहिवासी या सततच्या कोंडीमुळे हैराण आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी अडथळा नको म्हणून केडीएमटीच्या बस करसन चौकातून सोडल्या जात असल्याचे समजते.

चार महिन्यात वाढले ८३ हजार नवमतदार

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात ३ जानेवारी २४ ते ३ मे २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ८३ हजार ८०७ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली. हे नव मतदार प्रथमच कल्याण लोकसभा आणि पुढील होणाऱ्या निवडणुकांसाठी यापुढे मतदान करतील, अशी माहिती कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी गुरूवारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील निवडणूक कार्यालयात दिली. ३ जानेवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या १९ लाख ९८ हजार ४२४ होती. जानेवारी ते ३ मे या कालावधीत निवडणूक आयोगाकडून नव मतदार नोंदणी मोहीम विविध स्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात ८३ हजार ८०७ नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ८२ हजार २३१ आहे, असे सातपुते यांनी सांगितले. मतदान केंद्रे कल्याण लोकसभा हद्दीतील सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार ९६० मतदान केंद्रे आहेत. यावेळी या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. एकाच भागात १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या एक हजार १२ ठिकाणी वेब कास्टिंग आणि तेथे सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रातील मतदान प्रक्रियेचे (मतदान कक्ष वगळून) काम निवडणूक नियंत्रण अधिकारी कक्षात बसून पाहू शकणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर अपंगांसाठी रॅम्प, व्हिलचेअर सज्ज ठेवली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, पाणी, औषधांचा संच तयार ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी साहाय्यक म्हणून आशा सेविका, आरोग्य सेविकांची नेमणूक केली जाणार आहे. अपंगांना घर ते मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही मतदार व्याधीग्रस्त असतात, हा विचार करून मतदारांना कोणताही त्रास नको म्हणून बहुतांशी मतदान केंद्रे इमारतीच्या तळ मजल्याला प्रस्तावित केली आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली. कर्मचारी सज्ज कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस, गृहरक्षक दलासह एकूण १० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी योग्य त्या प्रशिक्षणासह सज्ज करण्यात आले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांतील काही ठिकाणी एक मतदान केंद्र महिला, एक केंद्र युवा आणि एक केंद्र अपंग व्यक्तिंच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. या निवडणुकीतील हे वैशिष्टय आहे, असे सातपुते यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील दिवंगत सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. नाट्यगृह बंद सावळाराम महाराज क्रीडासंकुलाजवळ सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या भुयारात मतपेट्या ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था असल्याने कल्याण लोकसभेतील मतपेट्या याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था येथे आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसर करण्यात आला आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत सावित्रीबाई नाट्यगृहातील सर्व नाट्यप्रयोग, इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कपिल पाटील यांच्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले 

बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने कुळगाव-बदलापूर शहरात गुरुवारी काढलेल्या भव्य रॅलीने बदलापूर दुमदुमले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प करीत उत्साह व जल्लोषात महायुतीच्या प्रचारासाठी निघालेल्या कुळगाव-बदलापूरच्या रॅलीत जनसागर उसळला होता. बदलापूर शहरातील पूर्व भागापाठोपाठ पश्चिम भागातील बदलापूरवासियांनी महायुतीच्या कार्याला पसंती देत ठिकठिकाणी स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरामध्ये जय श्रीराम व मोदी… मोदी…च्या घोषणांमध्ये वातावरण दुमदुमून गेल्याने कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला विजय यात्रेचे स्वरुप आले होते. माऊली चौकातून सुरू झालेला महायुतीचा हा झंझावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचला. तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील घोरपडे चौक, उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन, सानेवाडी, झेंडा चौक, पृथ्वी बिल्डिंग, रितू वर्ल्ड, स्वामी समर्थ चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोचला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महायुतीच्या नेत्यांनी वंदन केले. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले, प्रभाकर पाटील, भाजपाचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर, राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष  संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली, मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, आरपीआयचे शहराध्यक्ष धनराज गायकवाड आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या आजच्या रॅलीमुळे बदलापूरकरांचे प्रेम व विश्वास अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील हजारो नागरिकांना विकासाची प्रचिती आली. त्यामुळे आजच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रेमाबद्दल नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीला महायुतीच्या हजारो कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणांनी कशाप्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा गुरूवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत. याच संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडाही (Heat Action Plan) तयार केला आहे. आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. तो महत्त्वाचा असून एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हाताशी असल्यास प्रतिसाद जलद देता येतो. त्याशिवाय, माध्यमांच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही आपत्तीबाबत सजग करता येते. आवश्यकता असल्यास त्यांचे तात्पुरते विस्थापन करता येते, असेही राव यांनी स्पष्ट केले. नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी ‘सीईईडब्ल्यू’च्या प्रतिनिधींना केली. सहा महिन्यांपासून या कृती आराखड्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच, आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात, पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचे सादरीकरण करून त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे,  सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.

वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सभासद महायुतीच्या पाठीशी

डोंबिवली : वाल्मिकी बेडर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज डोंबिवली येथे भेट घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सदस्य असलेली शेकडो कुटुंबे कल्याण लोकसभेत वास्तव्याला आहेत. हे सर्वजण सक्रियपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहणार असून कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व विकासाने प्रभावित होऊन आपण हा पाठिंबा देत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले असून येत्या २० मे रोजी सर्वांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.  

आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अशातच शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांकडून विनाकारण नोटीसा पाठविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच या नोटीसा मागे न घेतल्यास आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. येत्या २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ – २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींवर नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्याचा एवढाच गुन्हा आहे की तो निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार आहे, त्यामुळेच त्याच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीसा बजावल्या जात नाहीत. केवळ अशा पध्दतीने टारगेट करुन त्याला ऐन निवडणुकीच्या काळात घराबाहेर काढण्याचाच हा प्रयत्न असून पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, करा तुम्हाला काय कारवाई करायची आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी अन्यथा उलटी पावले उचलावी लागतील, वेळ प्रसंगी बंद पाळावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बोगस कुष्ठरोगी दाखवून लाटले कोट्यवधी रूपये

‘ठाण्यात कुष्ठरूग्ण घोटाळा’ अनिल ठाणेकर ठाणे : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये “कुष्ठरूग्ण” घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पूर्वेकडे असलेल्या  कोपरी विभागात  फक्त १०० ते १५० कुष्ठरूग्ण असताना सुमारे ७१० जणांना ठाणे महानगर पालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रूपयांचा निधी वाटप केला आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे. अजय जेया यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे.   ठाणे पूर्वेकडील  कोपरी येथील गांधीनगर ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून, प्रत्येकी २४ हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे,  या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरूग्ण असताना  ७१० कुष्ठरुग्णांची नावे लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट  केली आहेत. साधारणपणे ३५० जणांचे बोगस प्रमाणपत्रे बनवून, त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुष्ठरोग निधीच्या नावाखाली, गेल्या अनेक वर्षांपासून, ठाणे महानगरपालिकेची फसवणूक करण्यात येत असून, यामागील खरे सूत्रधार ठाणे शहराचे माजी महापौर आणि ठाणे लोकसभेचे विद्यमान उमेदवार नरेश म्हस्के हेच असल्याचा थेट आरोप अजय जेया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दरम्यान,  या घोटाळ्यासंदर्भात अधिक माहिती देताना समाजसेवक अजय जेया पुढे म्हणाले की, नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणारे  अधिकारी अकबर शेख , नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार, कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित करतो, त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) कर्मचारी असणारी ॲलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवते.  त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरुपात घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना  24हजार रुपये दिले जातात . या कामी शिंदे गटाचे  शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख व महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप अजय जेया यांनी  केला. याप्रकरणी शासनाचे कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार नरेश म्हस्के यांच्यावर कठोर, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे.

‘नालेसफाई केल्यावर काढून ठेवलेला गाळ तत्काळ उचलण्यात यावा’

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये, अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिला. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली. नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दैनंदिन स्वरुपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला. या पाहणीच्या वेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.