Category: ठाणे

Thane news

९ वर्षांपासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात, यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हातात – संजय केळकर

 शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात ! अनिल ठाणेकर ठाणे : अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे झालेली फळगळ  व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे तसेच हवामान बदलामुळे यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, अशी कोकणातील आंबा शेतकऱ्यांची परवड आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित  शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात होणार असल्याची माहिती आ. संजय केळकर यांनी दिली आहे. कोकणातील एकूण १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची पागवड केली जाते. २०२१ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३  लाख २० हजार मेट्रिक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२२ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०२३ रोजी १ लाख २८ हजार मेट्रिक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. या वर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे चाळीस टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवास दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे. दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठामपा माजी उपमहापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट यंदा असह्य उकाड्यात हैराण ठाणेकरांना आंबा महोत्सवाचा गोडवा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात १ मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. १ ते १२ मे पर्यंत आंबा महोत्सव, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणार आहे. यावेळी महोत्सवाचे १७ वे वर्ष आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना केसर आंब्या बरोबरच आंबा- फणस पोळी, सरबते, सुके-ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे कोकणातील शेतकऱ्यांचे ४५ स्टॉल व ठाण्यातील महिला बचत गटाचे ५ स्टाॅल असे ५० स्टॉल या महोत्सवात असणार आहेत. चौकट महोत्सवात मिळणार अस्सल हापुस ! सध्या बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापुस कापल्यावर केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात ५०० ते ९०० प्रती डझन या दराने आंबा उपलब्ध असुन तरी चोखंदळ ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापुस खरेदी करावी. असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले आहे.

ठाण्यात एसबीआयच्या नौपाडा शाखेकडून ग्राहकांसाठी मतदार जागृती मोहीम

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या १४८ ठाणे विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाच्या वतीने नौपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांसाठी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे, या विषयी स्टेट बँक ऑफ इंडियामधील कर्मचारी व ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.  १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांकडून मी मतदान करणार आणि इतरांनाही सांगणार, अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. बँकेतील सर्व कर्मचारी मतदान जनजागृतीमध्ये सहभागी होणार असून मतदान करा, मतदानासाठी घराबाहेर पडा असे संदेश मोबाईलद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे आश्वासन बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी दिले.

महिला बचतगट मतदार करत आहेत मतदान जनजागृती

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप टीमने भांजेवाडी येथील उतेकर चाळीत महिला बचत गटांच्या महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. मतदान प्रक्रियेची माहिती देणाऱ्या रिक्षातून भांजेवाडी, भास्कर कॉलनी परिसरात जनजागृती करण्यात आली. महिला वर्गात मतदानाबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच मतदार जागरुकता व मतदान टक्का वाढवण्यासाठी उतेकर चाळ, भांजेवाडी, ठाणे येथील महिला बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य आणि इतर महिलाही उपस्थित होत्या. महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. मतदानामध्ये सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये. शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य, आजूबाजूला राहणाऱ्या महिला,कुटुंबातील सदस्य, नव मतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रमाचा समारोप सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला. मतदान म्हणजे मतदान असतं भांजेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी ७४ वर्षे वयाच्या श्रीमती बर्वे म्हणाल्या की, मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या-आमच्यासाठी ते संविधानाचं वरदान असतं!, मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांना ही मतदान करायला सांगणार.

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले. मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला. शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला. मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

दुय्यम निबंधक कार्यालयात मतदान जनजागृती

ठाणे, : ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात लग्नाच्या नोंदणीसाठी आलेल्या नववधू-वरांसह वऱ्हाडींमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीपच्या टीमने केले. सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करण्यासाठी नववधू-वर व वऱ्हाडी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यात आज रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचेच औचित्य साधून स्वीप टीमने दुय्यम निबंधक कार्यालय येथे सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दुय्यम निबंधक श्रीमती. राऊत यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला होता. विवाह नोंदणी करण्यासाठी ठाणे शहरातील नववधू-वर व वऱ्हाडी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्या सर्वाना मतदान टक्केवारी कशी वाढेल या विषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे यांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी व सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या सर्व वऱ्हाडींकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले. यावेळी नवीन घरात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि ठाणे शहरातील सजग मतदार म्हणून मतदान करेल. नागरिकांनीही मतदानात सहभाग घ्यावा, असे नववधू समिक्षा मंचेकरने सांगितलं आहे. संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे आणि मतदान करणार आहे, असे नवीनच लग्न झालेले हर्षद सावंत म्हणाले.

दिव्यांग, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांत मतदान जागृती

पनवेल : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्‍वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वीप पथकप्रमुख शहर अभियंता संजय जगताप, दिव्यांग विभागप्रमुख प्रकाश गायकवाड, स्वप्नाली चौधरी उपस्थित होते. तसेच शुक्रवारी कामोठे येथे बचत गटांतील महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी बचत गटाच्या महिलांनी रॅली काढली. प्रभाग समिती ‘ब’ हद्दीतील कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले. आशा सेविकांनी सेक्टर पाच, कामोठे, साईनगर, दर्गा वाडी, नवीन पनवेल, कळंबोली येथे जनजागृती केली.

रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत

रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश ठाणे : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलगाड्यांमधून निवडणुक काळात रोख रक्कमेची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त करत असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीफची कुमक वाढवावी, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना आणि राहील गुप्ता उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघातील निवडणूका नि:पक्षपातीपणे, शांततेत आणि भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले. मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात रेल्वे स्थानके आहेत. लोकल सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रोकडची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत रेल्वे स्थानकांवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याची सूचना निरिक्षकांनी बैठकीत केली. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. भिवंडी, ओवळा – माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

३७वी श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धा

आर्यनचे बळींचे सप्तक ठाणे : आर्यन दलालच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे यजमान स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धे च्या बाद फेरीत स्थान मिळवले. आर्यनने सात बळी मिळवत मुंबई क्रिकेट अकॅडमीला अवघ्या ४९ धावांवर गुंडाळल्यावर यजमानांनी ४.२ षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ५३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यजमानाच्या कर्णधाराचा निर्णय आर्यनने  एकदम सार्थ ठरवला. आर्यनने केवळ १९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाजाना माघारी पाठवले. आर्यनच्या गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या दोघांच फलंदाजांना दुहेरी धावांचा पल्ला पार करता आला. विक्रम पैच्या १४ आणि अक्षत कांबळेच्या १० धावांमुळे मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या खात्यात बऱ्यापैकी धावा जमा झाल्या. त्यांनतर शंकर सुब्रमणियमने १० चेंडूत तीन चौकार मारत नाबाद १६ धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अथर्व अधिकारीने १३ चेंडूत पाच चौकारासह नाबाद २४ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट अकॅडमी : १२ षटकांत सर्वबाद ४९ ( विक्रम पै १४, अक्षत कांबळे १० , आर्यन दलाल ४-१-१९-७, यश जठार ३-०-१२-२, तुषार कार्विझया २-०-६-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : ४.२ षटकात १ बाद ५३ (शंकर सुब्रमणियम नाबाद १६, अथर्व अधिकारी नाबाद २४, शिवेन मिश्रा २-०-१९-१).

ठाण्यात विचारेंनी अर्ज घेतला: महायुतीत अजुनही सस्पेंस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन…

ईव्हिएमवर ठाण्यात साप तर नांदेडमध्ये कुऱ्हाड !

ठाणे : शुक्रवारचा दिवस ईव्हिएमचा होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट ईव्हिएमवर विश्वास दाखवित असतानाच आज नांदेडमध्ये एका एमए झालेल्या युवकाने मतदान सुर असताना कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएमचे दोन तुकडे केले तर…