Category: ठाणे

Thane news

  जिहांश पाटीलचा डबल धमाका

जिहांश पाटीलचा डबल धमाका राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत हृदित्य, काश्वी, त्रिशानेही जिंकली पदके ठाणे : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनेने कोपरगाव येथे आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या जिहांश पाटीलने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत १५ दिवसांपूर्वी नोंदवलेला स्वतःचाच जिल्हा विक्रम पुसून टाकताना नवा उच्चांक नोंदवला. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाच्या जिहांशसह हृदित्य कवीश्वर, काश्वी करंजकर आणि त्रिशा गाला यांनी आपल्या संघासह ठाणे जिल्ह्याला पदके जिंकून दिली. जिहांशने ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत ठाणे जिल्हा अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत रचलेला ७.५ सेकंदाचा जिल्हा विक्रम मागे टाकताना ७.३२ सेकंदाचा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय जिहांशने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १४.२८ सेकंदासह राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक निश्चित केले.  कनिष्ठ गटात ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत हृदित्यने ८.७८ सेकंद अशा कामगिरीसह  अव्वल स्थान मिळवले. मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काश्वीने १५.७ सेकंद अशी वेळ नोंदवून वैयक्तिक रौप्य पदक पक्के केले. या स्पर्धेत अवघ्या ०.०१सेकंदाने काश्वीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.तर अवघ्या सहा महिन्यांपासून धावण्याच्या सरावास सुरुवात करणाऱ्या त्रिक्षाने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १७.८३ सेकंद अशा वेळेसह १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील कांस्य पदक जिंकले.

 महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पदभार सांभाळला

महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पदभार सांभाळला पत्राद्वारे अनधिकृत बांधकामाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश अरविंद जोशी मिरा-भाईंदर आज ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी महापालिकेत येऊन आपल्या दालनाचे उदघाटन करत पदभार सांभाळाला. यावेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, भाजपा अध्यक्ष दिलीप जैन तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ७८ नगरसेवक निवडून बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या कामकाजाला सुरुवात केली. महापौर डिपंल मेहता यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला असता, त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांना तसेच उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांना भेटण्यासाठी मोठी झुंबड उडाली. यावेळी महापौर मेहता यांनी त्यांचे पहिले पत्र आयुक्ताना दिले. शहरात एकही अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी झिरो टोलरन्स पॉलिसी राबवावी अशी सूचना त्यांनी त्यात केली आहे. अनधिकृत बांधकामा संदर्भात वॉर्ड ऑफिसर आणि अधिकारी यांच्यावर कारवाई सुद्धा करावी असे त्यांनी त्यात सुचवाले आहे. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की शहराच्या विकासासंदर्भात आणि जनतेच्या प्रश्नावर त्या काम करत राहणार आहेत.

विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी तुला’ कार्यक्रम संपन्न 

विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी तुला’ कार्यक्रम संपन्न कल्याण : विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्रिवेणी तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या मांगल्यपूर्ण मातृस्तुती ग्रंथाची तुला करण्यात आली. द्वितीय पूजाऱ्यांना दान देण्यासाठी पितांबर पंचा वस्त्रांची तुला करण्यात आली, तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुला करण्यात आली. या सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन विजयकुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख, कल्याण पूर्वचे नारायण पाटील यांनी केले होते. शतकपूर्ती सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, जिल्हा प्रमुख तात्या माने, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे, हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नितीन निकम, विशाल पावशे, युवासेनेचे निरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, सुनीता ढोले, राधीका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण पाटील यांनी आपल्या पित्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सांगितले की, “आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवाभाव, संस्कार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला दिली. त्यांनी कधीही केवळ स्वतःपुरते जगणे स्वीकारले नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त त्रिवेणी तुला करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आप्तस्वकीयांचे, गुरुबांधवांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानतो. वडिलांचे जीवन हेच आमच्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करतो असेही ते म्हणाले.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या…

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक अनिल ठाणेकर ठाणे : शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता अनिल महाडिक यांनी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांकडे केली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार , जिल्हा परिषद, कामगार उपायुक्त, धर्मदाय  सहाय्यक आयुक्त,  रेशनिंग कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन महानगरपालिका  कार्यालय ,व सर्व प्रभाग समिती, सार्वजनिक हॉस्पिटल ,जिल्हा/ ठाणे शहर सहकारी संस्था निबंधक* आपणास सविनय अर्ज सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ फेब्रुवारीला विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या कार्यालयात खालील बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, शासनाचा हा निर्णय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी, आपल्या स्तरावरून या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तशी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, असे. अभिप्राय पेटीची स्थापना: कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी. शासन निर्णयासोबत जोडलेले अभिप्राय प्रारूप पेटीच्या शेजारी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांना गुणांकण देणे सुलभ होईल.कार्यवाही व अहवाल: प्राप्त झालेल्या विधायक सूचनांचे स्थानिक आणि धोरणात्मक असे वर्गीकरण करून त्यावर तात्काळ सुधारणात्मक पावले उचलण्यात यावी, अशी सूचना अनिल महाडिक यांनी केली आहे.

 एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ सवलत धारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता – प्रताप सरनाईक ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे.…

तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभाग अंतर्गत  धनपाल गोकुळ पाटील व श्रीम. मालती धनपाल पाटील, घर क्र. ५१८, सेक्टर – ५, सानपाडागांव, सानपाडा, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या ९.४० मी. x ५.० मी. मोजमापाच्या क्षेत्रफळामध्ये चौथ्या मजल्याचे (G+४) आर.सी.सी. स्वरुपाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कारवाई करुन सदरचेअनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेलेआहे. सदर मोहिम आयुक्त सो. यांचे आदेशान्वये अति. आयुक्त राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त, तुर्भे  सागर मोरे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील  विनोद आंब्रे, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे. तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता ४ इलेक्ट्रीक हॅमर, १० मजूर यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकामावर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 चिन्मय मिशनच्या जागतिक स्तरावरील ७५ गौरवशाली वर्षांच्या निमित्ताने “चिन्मय अमृत यात्रेचे” आयोजन

चिन्मय मिशनच्या जागतिक स्तरावरील ७५ गौरवशाली वर्षांच्या निमित्ताने “चिन्मय अमृत यात्रेचे” आयोजन कल्याण : सेंट मेरीज हायस्कूल चक्की नाका, आर्य गुरुकुल, नांदिवली–कल्याण आणि आर्य गुरुकुल, अंबरनाथ या तीनही शाळांमध्ये भक्तिभाव, आध्यात्मिक जागृती आणि सांस्कृतिक चेतनेच्या वातावरणात यात्रा संपन्न झाली. प्रत्येक ठिकाणी पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी यांच्या पादुका, प्रतिमा व वस्त्रांचे पावन सान्निध्य लाभले. भव्य पारंपरिक स्वागत, पादुका पूजन, मंत्रोच्चार, सांस्कृतिक सादरीकरणे आणि माहितीपूर्ण प्रदर्शने यांच्या माध्यमातून गुरुदेवांचा व्यावहारिक वेदांत व मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरले स्वामिनी निष्कलानंदा अम्मा यांचे “चिन्मय कल्याण” या विषयावरील प्रेरणादायी मार्गदर्शन, ज्यातून विद्यार्थ्यांना व पालकांना मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा मिळाली. मान्यवर संत, विशेष पाहुणे आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला. विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रे, ऑडिओव्हिज्युअल सादरीकरणे आणि अमृत वाहिनी प्रदर्शन बस यांद्वारे चिन्मय मिशनच्या प्रवासाची व शिकवणीची सखोल ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थना, श्री विष्णुसहस्रनाम पठण, महाआरती, तसेच गीता पंचामृत ग्रंथ व प्रसाद वितरणाने झाली. या आध्यात्मिक अनुभवाने उपस्थित सर्वांच्या मनात शांती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीन्ही शाळांमध्ये पार पडलेली ही चिन्मय अमृत यात्रा केवळ उत्सव न राहता एक आध्यात्मिक जागरण ठरली. चिन्मय व्हिजन प्रोग्रामच्या अनुरूप शैक्षणिकदृष्ट्या सक्षम, आध्यात्मिकदृष्ट्या दृढ आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या शाळांच्या बांधिलकीची ही यात्रा सशक्त साक्ष ठरली.

शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा

शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा कल्याण : शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय, बी.एड., शहाड विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुल सजावट, नेल आर्ट स्पर्धा, हेअर स्टाईल स्पर्धा तसेच फूड स्टॉल (खाद्य मेळावा) या उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्या वैशाली पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. कल्पना सोमनाचे, प्रा. बबन पाटील, प्रा. अनघा चौधरी, प्रा. डॉ. सुस्मिता म्हाळुंकर, प्रा. योगिनी घरत, ग्रंथपाल प्रा. अनघा मोडक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता व कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी देऊ नका – उपनेते विजय साळवी

महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी देऊ नका – उपनेते विजय साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी न देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण शहरातील काही भूखंड खेळाच्या मैदानासाठी व उद्यानासाठी आरक्षीत करुन ठेवते. त्या आरक्षीत भुखंडावर लाखो रुपये खर्च करुन क्रिडाविषयक सर्व प्रकारच्या सुविधा असलेली क्रिडांगणे व करमणुकीसाठी बगीचे विकसीत करत असते. या क्रिडांगणांचा वापर फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी होणे आवश्यक आहे. हि  क्रिडांगणे महापालिकेने व्यवसायीक उपक्रमासाठी देणे म्हणजे खेळाडू व क्रिडाप्रमींवर अन्यायकारक आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या संघटने तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त हिंदुहृदयसम्राट श्री २०२६ ही जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा महापालिकेच्या यशवंतराव क्रिडांगणावर (मॅक्सी ग्राऊंड) येथे शुक्रवारी आयोजित केली होती. यासाठी महापालिकेचे या क्रिडांगणाचे रितसर भाडे व डिपोझीट भरण्यात आले होते व महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती. परंतु त्या स्पर्धेच्या वेळी या मैदानात भाजी विक्रीचा आठवड्याचा बाजार मांडण्यासाठी अनेक भाजी विक्रेते सर्वप्रकारचे स्टॉल, भाजी व इतर वस्तू घेऊन मैदानात आले आणि त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांबरोबर वाद गळात मैदानात भाजी विक्रीचा बाजार मांडण्याचा आग्रह धरला. मैदानाचे रीतसर भाडे भरलेले असताना मैदानात भाजी विक्री करुन व्यवसाय करण्यात येत असेल तर ते निषेध करण्यासारखे आहे. त्यामुळे या विषयात लक्ष घालावे, मैदाने व उद्याने फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमासाठीच वापरण्यात येणे बाबत योग्य ते निर्देश प्रशासकीय आधिकाऱ्यांना द्यावेत. महापालिकेच्या मैदानात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय होऊ नये, क्रिडांगणे व्यवसाय करण्यासाठी वापरात येऊ नयेत अशी मागणी शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत प्रशासना तर्फे योग्य ती कडक कारवाई न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटने तर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा साळवी यांनी दिला आहे.