Category: ठाणे

Thane news

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, ‘हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’ असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना नाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असे – परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकीची होळी होळीच्या एक दिवस आधी रविवार, १ मार्चला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सुमारे ८४ वर्षापूर्वी खंडीत झालेली ही परंपरा २०१५ साली जमात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी सुरु केली. यंदा या उत्सवाचे १२ वे वर्ष होते, त्यामुळे एक गाव एक होळी या संकल्पनेची तपपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली. सुरुवातीला परंपरेनुसार होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदांपत्याला देण्यात आला. त्यानुसार जमात ट्रस्टचे विश्वस्त जमीर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री प्रियंका विहंग कोळी, प्रांजल भावेश ठाणेकर, प्रभुती कैवल्य ठाणेकर, केतकी वैभव ठाणेकर, स्मिता रोहित कोळी, अमृता धीरज पाटील, अक्षता तन्मय कोळी, जागृती जित बारांगुळ, कोमल सन्मान कोळी या दांपत्यांनी होळी मातेची रितसर विधिवत पूजा केली. त्यानंतर कोळी गाण्यांच्या गजरात जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी होळीला अग्नी दिला. चेंदणी कोळीवाड्याचा १२ वा गावकीचा होलिकोत्सव यावर्षी पूर्व ठाण्यात कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला. याआधीचे सात पूर्वेत आणि पाच उत्सव पश्चिम भागात साजरे झाले. गावकीची ही परंपरा पुन्हा सुरु करण्यात जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी विरोध सहन करून पुढाकार घेतला होता. यासंदर्भात चंद्रकांत नाखवा म्हणाले, चेंदणी कोळीवाड्यात एक गाव एक होळी ही परंपरा खूप आधी सुरु होती. पण ८५ वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली. २०१५ साली  जमात ट्रस्टचा अध्यक्ष असताना पुन्हा एक गाव एक होळी ही संकल्पना पुढे आली. मी आणि माझ्या कार्यकलरिणीतील सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत सुरुवात केली. त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला, पण त्यांची समजूत घालण्यात आली. त्यावेळी हरियाली तलावाचा काही भाग सुकला जायचा. त्याठिकाणी होळी लावली जात असे. २०१५ साली हा उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी एक अट टाकली. होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर लागणारी कुटुंबीयांची होळीही दारात लागणार. माझ्या कार्यकारीकरिणीसह सर्वांनी गावकीची ही अट मान्य केली. २०१५ साली गावाचा पाटील म्हणून मला होळी पेटवण्याचा मान देण्यात आला.  पश्चिम विभागात होळी लावण्यासाठी लागणारा गाडा मी उपलब्ध करुन देतो. होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदाम्पत्याला देण्याची प्रथा आजही पाळली जाते. तरुण वर्गानेही सक्रिय होत या उत्सवात काळाप्रमाणे बदल केलेत. होळीसाठी म्हणून दरवर्षी ड्रेसकोड असतो. त्यालाही गावकीचा चांगला प्रतिसाद असतो. उत्सव साजरा करताना बदल पाहिजेत. आतापर्यंत तन,मन, धनाने माझा सहभाग असतोच तो नेहमीच असेल.

शिकाऱ्यांच्या टोळीकडून बिबटयाची क्रूरपणे हत्या

शिकाऱ्यांच्या टोळीकडून बिबटयाची क्रूरपणे हत्या हाताचे पंजे तोडून नखे केली लंपास दोन जणांना अटक ठाणे : शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील मौजे ढाकणे चिंध्याचीवाडी कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत…

वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर…

पाणी टंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा

पाणी टंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील…

शहापूर तालुका टँकरमुक्त कधी होणार ?

शहापूर तालुका टँकरमुक्त कधी होणार ? शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट अविनाश उबाळे ठाणे : ठाणे,मुंबईसारख्या महानगरातील करोडो जनतेची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्यात दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात भीषण अशी पाणी…

कल्याण मुरबाड रोडवर नव्याने उभारलेल्या पोलमुळे अपघाताची शक्यता

कल्याण मुरबाड रोडवर नव्याने उभारलेल्या पोलमुळे अपघाताची शक्यता कल्याण : कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या अगदी कडेला वरप तलावा जवळ रस्त्यात लाईट पोल उभारण्यात आले आहेत. या पोलमुळे वाहनांना धडकण्याचा…

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घुमला मराठी संस्कृतीचा जागर

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घुमला मराठी संस्कृतीचा जागर मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा भारूड आणि मंगळागौरीने जिंकली पालकांची मने कल्याण : कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर…

ट्रान्सपोर्टर्सचा एल्गार!

ट्रान्सपोर्टर्सचा एल्गार! ५ मार्चला १ लाख वाहनांसह आझाद मैदानाधर धडकणार अनिल ठाणेकर ठाणे, सरकारने ८ महिन्यांपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. आता आमचा संयम सुटला असून, येत्या ५ मार्चला राज्यभरातून…

ठामपा शाळा क्र. ७ मध्ये मराठी भाषा उत्साहात साजरा

ठामपा शाळा क्र. ७ मध्ये मराठी भाषा उत्साहात साजरा ठाणे : ज्येष्ठ कवी, साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य…