Category: ठाणे

Thane news

 ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्या हस्ते वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याण : कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याणात करण्यात आले.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वैष्णवी रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.  डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन.

दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन. दिवा : दिवा शहरातील वाढती अस्वच्छता आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा यासाठी केवळ ठाणे महानगर पालिका जबाबदार असून यापुढे पालिका प्रशासनाचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. दिवा शहरात मागील काही वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची विक्रमी कामे झाली आहेत. दिवा शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक २७ मधील बहुतांशी प्रमुख रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु पालिकेतर्फे सदर रस्त्यांची एक दिवसा आड, दोन दिवसा आड, कळस म्हणजे काही रस्त्यांवर तर तीन ते चार दिवसा आड साफसफाई केली जाते. परिणामी सर्व ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते, ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे महानगर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे नगरसेवक ऍड.आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. करदात्या दिवेकरांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे, यापुढे पालिकेचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.  लवकरच शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी सांगितले आहे.

  पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र

पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत (२० जानेवारी ते ५ फेब्रुवारी) प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.  या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडीत करणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले. या कारवाईत दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडीत करण्यात आली, २१ पंप जप्त तर ३४ पंप रुम सील करण्यात आले असून ३२४ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभागसमितीत ७० नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४ नळसंयोजने खंडीत करुन एकूण ६०० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत २३६ नळसंयोजने खंडीत, १८१ पंप जप्त करुन ४१ पंप सील करण्यात आले असून ३७३६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५ नळसंयोजने खंडीत करुन ३७० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत ४ नळसंयोजने खंडीत करुन २६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर वागळे प्रभाग समितीमध्ये १ नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहे.  एकूण १०७४ नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर २०२ पंप जप्त, ७५ पंप रुम सील करण्यात आले असून एकूण ५०५६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली  वसुली माजिवडा मानपाडा  प्रभाग समिती : रु. २,१६,३२,८४२ नौपाडा कोपरी प्रभाग समिती :  रु. १,५७,५१,०१२ कळवा प्रभाग  समिती : रु १,२२,२७,२९२ वर्तकनगर प्रभाग  समिती रु.: १, १४,०७,८९३ उथळसर प्रभाग समिती रु. १,०९,८९,४९८ दिवा प्रभाग समिती : रु ७५,५४,३७५ लोकमान्य/सावरकर नगर प्रभाग समिती : रु ६९,७७,७३५ मुंब्रा प्रभाग समिती :  रु. ४८,६०,५७५ वागळे प्रभाग समिती :  रु. ५६,२३,५६४ याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून रु. १७,८९,५५९ इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

  महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात पदभार स्वीकारून दोनच दिवसातच रस्त्याचे काम झाले सुरू कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे ठाणे, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (पश्चिम) येथील श्री माँ स्टेडिअमच्या भव्य प्रांगणात एकविसावी आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे परीसरातील बहुसंख्य विद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत नामांकित शाळांनी चित्रकलेतील निपुण विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविले होते. चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी चित्र चितारुन आपले कौशल्य प्रकट केले. तसेच सुंदर पोस्टर पेंटिंग सादर केलेत. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना १०००, ८५०, ७०० रोख रक्कमेची बक्षीसे आणि ३०० रु. ची प्रोत्साहनात्मक १० बक्षीसे देण्यात आलीत. या स्पर्धेसाठी २२ शाळांमधील जवळ जवळ १४०० मुलांचा सहभाग होता. या कार्यक्रामात श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल श्रीमती मिनी नायर, श्रीमती मेघना वांगे, श्रीमती रमा अनंतरामन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत

दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन अव्वल ठाणे: लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि  ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन संस्थेने बाजी मारली. एन के टी सभागृहात जुन्या संमिश्र गाण्यांवर पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत १३ शाळांमधील सुमारे १३० हून अधिक विशेष विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ तरल नागडा यांच्या संकल्पनेतून ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. झवेरी ठाणावला कमलिनी कर्णबधिर स्कूलच्या चमूने दुसरा तर विश्वास सेंटरने तृतीय स्थान संपादन केले. विशेष मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवसोदिवस या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात या मुलांना स्वीकारण्याची भावना वाढीस लागल्याचे लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी सांगितले. सर्वश्री डॉ जुई मांडके आणि दिप्ती नायर यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर राकेश चौमाल, लिओ क्लबच्या जिल्हा गव्हर्नर शिवानी शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी आभार प्रदर्शन केले.

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, डोंबिवली पूर्वेतील धोकादायक इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील भाडेकरू कुटुंबांना दिलासा…

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वे स्थानका जवळील ११२ वर्ष जुना असलेला व १९९२ च्या काळातील  सुपरहिट ठरलेल्या व प्रसिद्ध…

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न मिरा -भाईंदर – विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अभिनव कॉलेजच्या वतीने दरवर्षी स्पंदन उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी या उत्सवाचे आयोजन मिरा रोड…