Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान दिनांक १५ जानेवारीला घोषित केलेली आहे. सदर निवडणूकामी परिवहन उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी १४ जानेवारीला सकाळी व १५ जानेवारीला दुपारी बस संचलन विस्कळीत होण्याची शक्यता असून काही बसमार्गावरील प्रवाशी बससेवा बंद करण्यात येणार आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशी जनतेस होणाऱ्या गैरसोयीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रम दिलगीर आहे. प्रवाशी जनतेने नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ या कालावधीत उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात ठाणे  : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतदान प्रक्रिया बुधवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. दिनांक १४ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे ७५ टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  परिणामी, ठाणे शहरात दोन दिवस बससेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेसाठी १४ जानेवारी व १५ जानेवारीला २७५ बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून दुपारी ३.०० वाजेपर्यत व दिनांक १५ जानेवारीला सायंकाळी ४.०० नंतर फक्त ८० ते ८५ बसेस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहे. परिवहन  बसेसची  वाहतूक प्रत्येक मार्गांवर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाश्यांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करुन परिवहन सेवेस सहकार्य करावे असे आवाहन  परिवहनच्या वतीने करण्यात आले आहे.

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी अनिल ठाणेकर ठाणे : आत्मविस्मृत समाजाचे मत परिवर्तन करण्याचे काम त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. एक प्रकारे वाहक बनुन संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. त्यामुळेच संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे. असे प्रतिपादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंन्द्र कुलकर्णी यांनी ठाणेकरांचे वैचारिक प्रबोधन केले. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती क्रिंडा संकुल मैदानात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील “संघ शताब्दी वर्ष” हे चौथे पुष्प रविवारी उपेंन्द्र कुलकर्णी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षपदी श्रीराम पटवर्धन होते. तर, कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना अनेक उपक्रम साजरे होत असल्याचे सांगून उपेंन्द्र कुलकर्णी यांनी, १८८९ साली डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म, १९२५ मध्ये संघाची स्थापना ते आजपर्यतच्या काळातील क्रांतीकारी घटना आणि राष्ट्रीय चळवळीशी जोडलेल्या घटनांचा उहापोह करून विपरीत स्थितीत संघ स्वयंसेवक कसे राहिले, या आठवणी दृगोचित केल्या. स्वयंसेवकांनी कशा प्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिले, याच्या आठवणी जागवताना संघाच्या प्रार्थनेतील दाखले देत संघाच्या पंचपरिवर्तनाचे कार्य त्यांनी विस्ताराने विषद केले.डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात अनेक प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. जनकल्याण समितीने तर, समाजामध्ये आपल्यापेक्षा पाचपटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करीत जनसंघटन वाढवून समाजाला तप्तर करण्याचे काम समितीने केले आहे. जोपर्यंत सामान्य माणुस जोडला जात नाही, तोपर्यत समाज जागृत होणार नाही, हे हेरून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. असे कुलकर्णी म्हणाले. समाजाच्या साथीने होणार हिंदु संमेलने आजकाल हिंदू कुटुंबातील संवाद हरवत चालला असून घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा, विसंवादावर मात करण्यासाठी कुंटुंब प्रबोधना करण्याकरीता यातुन सावरलेल्या दांपत्यांनी पुढे ५ कुटुंबांच्या प्रबोधनाची जबाबदारी घ्यायची आहे. हे संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे, तेव्हा पुढील काळात हिंदूंचे व्यापक संघटन करण्यासाठी समाजाच्या साथीने हिंदुंची संमेलन करणार असल्याचे उपेंन्द्र कुलकर्णी यांनी सांगितले. या संमेलनासाठी समितीही स्थानिक समाजाचीच असणार असुन तेच संमेलने भरवणार आहेत, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन यूपीएससी परीक्षार्थींना डीएएफ फॉर्म व सेवा प्राधान्याबाबत मार्गदर्शन ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे “DAF Form Filling & Preference of Services” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार  नुकतेच विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी व सध्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले सनदी अधिकारी डॉ. नितीन जावळे (IAS – २००३) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या विशेष व्याख्यानात ठाणे व मुंबई शहरातील यूपीएससी परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात डॉ. नितीन जावळे यांनी UPSC DAF फॉर्म म्हणजे काय, तो कसा भरावा, फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल करता येतात का, सेवा प्राधान्य (Service Preference) कसे द्यावे, त्यात बदल कधी व कसा शक्य आहे, याबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन केले. याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संयम, प्रामाणिकपणा, सातत्य व आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे उपआयुक्त सचिन सांगळे तसेच संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेतील अनुभवातून मार्गदर्शन मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. संस्थेचे गिरीश झेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जिल्हा परिषद निवडणुका जाहीर स्लग- ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला निकाल 

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील रखडलेल्या  १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत. महिलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. निवडणूक होणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतदारांना एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी असे दोन मते द्यावी लागतील . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल आणि त्यानंतर प्रचार तसेच जाहिरातींवर बंदी राहील. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, पुरेशा प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्सचा समावेश आहे. मतदार यादी १ जुलै २०२५ या आधारे तयार करण्यात आली असून, दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी ” हे चिन्ह वापरण्यात आले आहे. मतदारांना माहिती मिळवण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप तसेच आयोगाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे.

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ती निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज…

इराणमध्ये अराजकता! आंदोलनात २००० हून अधिकांचा मृत्यू

इराण: इराणमध्ये महागाई, भ्रष्टाचार आणि हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे देशात अराजक माजले आहे. देशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशभरातील निदर्शनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर वाढत्या दबावादरम्यान, खराब आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली अशांतता, इराणी अधिकाऱ्यांसमोर तीन वर्षांतील सर्वात मोठे अंतर्गत आव्हान आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या इराणच्या धार्मिक अधिकाऱ्यांनी निदर्शनांवर दुहेरी दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यांनी आर्थिक समस्यांवरून निदर्शनांना समर्थन दिले आहे आणि त्याच वेळी कारवाई देखील केली आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर अशांतता भडकवल्याचा आरोप केला आहे. ‘ज्यांना ते दहशतवादी म्हणतात, त्यांनी निदर्शने हायजॅक केली आहेत, असंही ते म्हणाले. एका मानवाधिकार गटाने यापूर्वी शेकडो मृत्यू आणि हजारो अटक झाल्याची नोंद केली होती. काही दिवसापूर्वी इंटरनेट बंद करण्यासह संप्रेषण निर्बंधांमुळे माहितीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. photo caption इराणमधिल रस्त्यांवर आंदोलकांचे मृतदेह न्यायाच्या प्रतिक्षेत

म्हसा यात्रेत विक्रमी गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त

म्हसा यात्रेत विक्रमी गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त अशोक गायकवाड ठाणे-म्हसा :  म्हसा यात्रेच्या निमित्ताने रविवारी विक्रमी गर्दी झाली. एकाच वेळी लाखो भाविक दाखल झाल्याने परिसरात प्रचंड ताण निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून तीव्र ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही पोलिसांनी संयमाने व नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्त सांभाळत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यात्रेदरम्यान चोरी, मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले. तसेच गर्दीत हरवलेली सुमारे १० ते १५ लहान मुले पोलिसांनी तत्काळ शोधून सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली. या संपूर्ण बंदोबस्ताचे नेतृत्व एडके साहेब यांनी केले. त्यांना एपीआय संदीपान सोनवणे, एपीआय जाधव, पीएसआय कामडी, पीएसआय अरमाळकर, हवालदार शिंदे तसेच सर्व पोलीस अधिकारी, होमगार्ड अधिकारी अंमलदारांनी समन्वयाने काम करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. पोलिसांच्या या सतर्क व प्रभावी कामगिरीमुळे मसा यात्रा शांततेत व सुरक्षिततेत पार पडली. सादर बंदोबस्त साठी स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लाड यांनी समक्ष थांबून मार्गदर्शन केले. सदर बंदोबस्ता बाबत पोलीस अधीक्षक स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मित्तल, यांनी मार्गदर्शन केले, परिसरातील लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

प्रचार संपला राडे सुरू, लक्ष ‘लक्ष्मी’कडे

 डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर शिंदेंच्या सेनेचा कोयत्याने हल्ला नवीमुंबई भाजपाकडून शिंदेंच्या कार्यकर्त्याला मारहाण उल्हासनगरमध्ये ५० लाखांची कॅश पकडली मुंबई:  मुंबईसह राज्यातील २९ महागनरपालिकांसाठीच्या निवडणूकीचा प्रचार संपला असून निवडणूकीतील राड्याला मात्र सुरूवात झाली…

दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ (ड) मध्ये बळीराज सेनेची कडवी झुंज

दिवा- ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून प्रचाराचा वेग चांगलाच वाढला आहे. दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ (ड) मध्ये बळीराज सेनेने प्रवीण उतेकर यांना उमेदवारी देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. या निर्णयामुळे या प्रभागात बळीराज सेनेची मोठी राजकीय दहशत निर्माण झाली आहे. रविवारी ११ रोजी बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी दिवा येथे जाहीर मेळावा झाल्याने बळीराज सैनिकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. राजकीय सर्व्हेनुसार या प्रभागातील खरी लढत बळीराज सेनेभोवतीच फिरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. दिवा शहरात राज्यातील विविध भागांतून नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण विभाग, विद्युत व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच पावसाळ्यात साचणारा चिखल या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये आता बदलाची तीव्र इच्छा असून बळीराज सेना हा एक नवा आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. प्रवीण उतेकर यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांच्या कार्यप्रेरणेने त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह बळीराज सेनेत  जाहीर प्रवेश केला. त्यानंतर घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक २८ (ड) मधून उमेदवारी दिली. दरम्यान, दिवा शहरात बळीराज सेनेने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक रणांगणात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. s