Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो

कामगार संयुक्त कृती समितीचा इशारा मुंबई, दि. ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत  महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत ८ जुलैला कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती बरोबर चार श्रमसंहिता, त्यांचे नियम व कामगारांच्या अन्य मागण्यासाठी विस्तारित बैठक घेण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. त्यामुळे कृती समितीने महा धरणे आंदोलन स्थगित केले. मात्र महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन केले जाईल,  असा स्पष्ट इशारा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक डॉ. डी . एल. कराड यांनी राज्य सरकारला दिला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना दिलेल्या निवेदनात चार श्रमिक संहिता महाराष्ट्रात लागू करू नये,राज्य सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करावी, किमान वेतन 30 हजार रुपये करावे, कंत्राटी हंगामी निश्चित कालीन कर्मचाऱ्यांना कायम करावे, योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा  व त्यांना ई एसआय, प्रॉव्हिडंट फंड, रजा,बोनस इत्यादी फायदे लागू करावेत, असंघटित कामगारांसाठी  कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना निधीची व्यवस्था करावी व त्यामार्फत सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना लागू कराव्यात. या व इतर मागण्या  यावेळी करण्यात आल्या. केंद्र सरकारने चार श्रमसंहिता तसेच नियमही लागू केले आहेत राज्य सरकारनेही नियम प्रस्तावित केले आहेत. या चार श्रमसंहिता व नियमांना कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे.  चार श्रमसंहिता व नियमांमुळे कामगारांचा युनियन करण्याचा अधिकार, संप करण्याचा अधिकार, नोकरीत कायम होण्याचा अधिकार  याच्यावर गदा येणार आहे. या श्रमसंहितांमध्ये  सर्वत्र कंत्राटीकरणाला परवानगी देण्यात आली आहे,निश्चित कालीन रोजगार,  शिकाऊ कामगार त्या माध्यमातून कामगार वर्गाचे प्रचंड शोषण सुरू आहे.असंघटित कामगारांसाठी कुठलीही योजना नाही. ऊसतोड कामगार,घर कामगार व  असंघटित कामगारांना सरकारने वाऱ्यावर  सोडले आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे कामगार वर्ग अधिच त्रस्त झाला आहे, त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. अशा परिस्थितीत कामगार वर्गाचे हिताचे रक्षण करण्यासाठी कामगार संघटनांशी चर्चा करून धोरण व  कायदे करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी या वेळेला कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मंत्री महोदय कडे केली. शिष्टमंडळात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक व  सीटूचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. डी. एल.  कराड, एच. एम. एस. चे प्रदेशाध्यक्ष  निवृत्ती धुमाळ, इंटकचे प्रदेशाध्यक्ष  कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुकेश  तिघोटे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके,  आयटकचे ज्येष्ठ नेते सुकुमार दामले इत्यादींचा समावेश होता. आझाद मैदानावर  झालेल्या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार,  कामगार नेते  विवेक मॉन्टेरो, निवृत्ती धुमाळ, संतोष चाळके, सुकुमार दामले, कैलास कदम, रवी जोशी, मिलिंद रानडे,मंगला ठोंबरे,महेश करकेरा, उदय भट, मारुती विश्वासराव,  त्रिशीला  कांबळे, स्नेहा सावंत, विजय जाधव, विजय तारमाळे,  बबली रावत, बजरंग चव्हाण, सईद अहमद  इत्यादींनी कामगारांना मार्गदर्शन केले. 000000000

मुसळधार पावसातही मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा सुरळीत

राजेंद्र साळसकर मुंबई- गेल्या ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये २८० मिमीपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊनही, मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा सुरळीतपणे सुरू राहिल्या. मेन लाईनवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुमारे १५० मिमी, दादर – घाटकोपर पट्ट्यात १२० ते १५० मिमी आणि मुलुंड येथे १६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला; यामध्ये ठाणे येथे २८४ मिमी आणि कळवा येथे २७० मिमी पावसाची नोंद झाली.हार्बर लाईनवरील वाशी ते पनवेल या पट्ट्यात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मेन लाईनवरील आग्नेय विभागात (कल्याण ते कर्जत/खोपोली दरम्यान) सुमारे १५० मिमी पाऊस पडला तर मेन लाईनवरील ईशान्य विभागात (कल्याण ते कसारा दरम्यान) २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसानंतरही मध्य रेल्वेची सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिली, ज्यामुळे दररोज प्रवास करणारे लाखो प्रवासी सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले. हे मध्य रेल्वेच्या पावसाळ्यासाठीच्या सक्रिय नियोजनाचे यश दर्शवते. ही अखंड सेवा अभियांत्रिकी, परिचालन, विद्युत आणि सिग्नल व दूरसंचार विभागांमधील उत्तम आंतर-विभागीय समन्वय व सांघिक कार्य, तसेच महानगरपालिकांसोबतचा जवळचा समन्वय आणि पूर्वतयारीचे फलित आहे. पावसाळ्यात रेल्वे चालवण्याचे आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने पाणी साचण्यापासून प्रतिबंध करणे, जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक तयारी केली आहे. विभागातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ११७ ठिकाणांवर १२.५ एचपी ते १०० एचपी क्षमतेचे एकूण २१० ‘हेवी-ड्युटी’ पाण्याचा उपसा करणारे पंप तैनात करण्यात आले होते.शीव – कुर्ला, चुनाभट्टी – कुर्ला, विक्रोळी – कांजुरमार्ग रोड आणि कुर्ला – लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या पूरप्रवण प्रमुख ठिकाणांची निवड करून, तिथे तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी अभियांत्रिकी उपाययोजनांद्वारे विशेष कार्यवाही करण्यात आली. ठाणे मायक्रोटनेलिंग प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील पाणी साचण्याची दीर्घकालीन समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आली आहे; यापूर्वी मुसळधार पावसात येथे रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा वर पाणी साचत असे. तसेच, जलनिस्सारण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण नेटवर्कवर पुलांची दुरुस्ती आणि जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्याच्या पूर्वतयारीच्या मोठ्या प्रमाणावरील कामांमध्ये अनेक मोऱ्यांची साफसफाई, बाजूच्या गटारांमधील आणि ‘कॅच-वॉटर ड्रेन्स’मधील गाळ काढणे, रुळांची देखभाल आणि संवेदनशील ठिकाणी रुळांची उंची वाढवणे, बोगद्यांची तपासणी, स्थानकांवरील प्लॅटफॉर्म व रेल्वे इमारतींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना, तसेच संवेदनशील भागात पावसाळी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, सोशल मीडियावर पावसाळ्याबाबत मिळणाऱ्या सततच्या अद्ययावत माहितीमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत झाली. एकत्रित प्रयत्नांमुळे, या हंगामातील अत्यंत मुसळधार पावसाच्या कालावधीत ही मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने सुरू राहिली. शहराची जीवनवाहिनी अविरत सुरू ठेवण्यासाठी मुसळधार पावसात रात्रंदिवस काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचारी – जसे की रुळांची देखभाल करणारे कर्मचारी, गँगमेन, ‘परमनंट वे’ कर्मचारी, मोटरमन, ट्रेन मॅनेजर्स, अभियंते आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाची दखल घेण्यात आली आहे. पावसाळ्यात उपनगरीय सेवा विनाखंडितपणे पुरवण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. 000000000

राजेंद्र साळसकर यांचा श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

मु़ंबई- अरिहंताणं रक्त सारथी संस्थान,राजस्थान आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान-२०२६ या सोहळ्यात जीवनदान ग्रुपचे संस्थापक राजेंद्र साळसकर यांना श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान -२०२६ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात…

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उल्हासनगरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम उत्साहात संपन्न

सुनिल इंगळे उल्हासनगर  : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या १० लाख मोफत वही वाटप उपक्रमा अंतर्गत,नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा, शिवनेरी नगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई), उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद सालेकर, विभागप्रमुख प्रमोद पाण्डेय, विभाग संघटक आदेश पाटील, युवासेना उल्हासनगर संपर्क प्रमुख तुषार बांदल, विजय इंजे, प्रदीप आयरे, अनंत सावंत, अरुण कोळी तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व समस्त शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शिक्षण हीच खरी ताकद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध!” असलायचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी सांगितले. ०००००००

शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी १० ऑगस्टला देशव्यापी ‘जेल भरो’ आंदोलन

डॉ. अशोक ढवळे यांची घोषणा अनिल ठाणेकर ठाणे, शेतकरी, कामगार व शेतमजुरांच्या प्रश्नांवर १० ऑगस्ट रोजी देशभर प्रत्येक जिल्हा स्तरावर होत असलेले जेल भरो आंदोलन श्रमिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संघर्ष ठरणार आहे. १० ऑगस्टच्या या लढ्यात संपूर्ण ताकदीने सामील होण्याचे आवाहन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व राष्ट्थीय सरचिटणीस विजू कृष्णन यांनी केले आहे. अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे २८ व २९ जून रोजी संपन्न झाली. सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात तीव्र झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची दोन दिवस सखोल चर्चा केल्यानंतर किसान सभेने हे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी शेतकऱ्यांचा देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक दिली आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा, जमीन अधिग्रहण, खतांची कमतरता, फसव्या कर्जमाफी योजना, अन्न महामंडळाचे महत्व संपवण्याचे कारस्थान, ऊस दर, भारत अमेरिका, भारत युरोप, व भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे भारतीय शेतीवरील दुष्परिणाम इत्यादी प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या व श्रमिकांच्या इतर प्रश्नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याची हाक देण्यात आली. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर इतर शेतकरी संघटनांना एकत्र करत शेतकरी संघटनांची देशव्यापी एकजूट मजबूत करण्याची आवश्यकता आहे. २८ जुलै रोजी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व संघर्ष तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत घेण्यात येणार असून यात किसान सभा सहभागी होऊन आपले योगदान देईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शेतकरी एकजुटीला श्रमिक एकजुटीत परिवर्तित करून सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व केंद्रीय कामगार संघटनांची २९ जुलै रोजी राष्ट्रीय पातळीवर होत असलेली संघर्ष परिषद यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. किसान सभेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशभर या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याची हाक यावेळी देण्यात आली.१५ नोव्हेंबर रोजी हुतात्मा बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे ध्वजारोहण करून देशातील हजारो गावांत शेतकरी प्रश्नांवर सभा, व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथे होत असून याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयांमुळे शेतकरी आंदोलनाला आणखी चालना मिळेल असा विश्वास देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला. ००००००

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर – डॉ..संजय मं.गो. 

ठाणे- दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र – मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ…

केडीएमसी व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने किन्नर महोत्सव संपन्न

शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा – महापौर ॲड. हर्षाली चौधरी कल्याण : शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या किन्नर महोत्सव २०२६ या कार्यक्रमात  बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते. किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त यांनी आपल्या भाषणात काढले.  या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली.

साऊथ मुंबईतील कॅरमपटूंसाठी भव्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त खासदार आदरणीय अरविंदजी सावंत आणि जाणीव ट्रस्ट यांच्या पुढाकाराने तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील कॅरम खेळाडूंकरिता रोख…

श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न

ठाणे : प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार  २७ जूनला सकाळी ८.३० ते दुपारी १ या…

चालकाला थेट सव्वा कोटींचा बंगला भेट!

महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व! उलवे : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे.…