Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

सुरांचा ‘साज’ हरपला…

सुरांचा ‘साज’ हरपला… ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन संपदा सावंत मुंबई – सप्तसुरांना आपल्या स्वर्गीय आवाजाने ‘साज’ चढवणाऱ्या ‘स्वरसाम्राज्ञी’ ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी  त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात…

‘आशाताई’ दि लास्ट एम्परर

‘आशाताई’ दि लास्ट एम्परर राज ठाकरे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही…

दिवंगत शारदा चन्ने यांचे निधन

ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले‌.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष…

भूराजकीय संकटामुळे भारतासाठी पीव्हीसी ही धोरणात्मक गरज

१३वी ‘विनाइल इंडिया २०२६’ जागतिक पीव्हीसी शिखर परिषद मुंबईत सुरू मुंबई : ‘विनाइल इंडिया २०२६’ या दोन दिवसीय जागतिक पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शनाच्या १३व्या आवृत्तीचा शानदार शुभारंभ ९ एप्रिल रोजी…

 नाशिक कॉर्पोरेट शोषण, नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्ट टार्गेटचा शोध

धर्मांतराचे धक्कादायक वास्तव नाशिक : शहरातील नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे समोर येत आहे. कंपनीत संशयित आपले सावज कसे शोधायचे, त्यांचे मत परिवर्तन कसे करायचे, याची आपबिती तक्रारदारांनी तपास यंत्रणेसमोर मांडली आहे. यावरून संशयित कंपनीतील ‘सॉफ्ट टारगेट’वर लक्ष देऊन त्यांना जाळ्यात ओढायचे, असा प्राथमिक निष्कर्ष पोलीस यंत्रणेकडून काढला जात आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, शारिरीक जवळीक साधण्यासाठी लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मातराचा प्रयत्न असे गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि कंपनीतील अनेक गैरप्रकार समोर आले. या संदर्भात आतापर्यंत आठ महिला व एका पुरूषाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांबरोबर पुरूष कर्मचारीही यामध्ये लक्ष्य ठरले. बहुराष्ट्रीय कंपनीत बैठका, अन्य कार्यक्रम, कामे या धावपळीत संशयितांकडून कामावर नव्याने रुजू झालेले, साधेभोळे, कामापुरता बोलणारे अशा काहींना लक्ष्य केले जात होते. त्यांना धर्मांतर किंवा शोषणाच्या सापळ्यात अडकवताना त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जात होती. त्यांची बलस्थाने आणि ते भावनिकदृष्टया कुठे कमकुवत ठरतात, याचा अंदाज संशयितांकडून घेतला जात होता, असे समोर आले आहे. ज्या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाला, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून कंपनीत गैरप्रकार कसे सुरू होते ते समोर आले. तक्रारदार युवक हा सातारा जिल्ह्यातील एका लहान गावातून आलेला होता. धार्मिक वृत्तीचा. घरापासुन दूर आणि बोलण्याची शैली कॉर्पोरेट विश्वात शोभणारी नसल्याने त्याने स्वत:ला कामांत गुंतवून घेतले होते. भाबड्या युवकाला संशयितांनी लक्ष्य केले. सर्वांशी बोलणे टाळणाऱ्या त्या युवकाला बोलते करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत सोबत जेवण्यासाठी आग्रह धरला जात होता. युवक शाकाहारी होता. मात्र संशयित त्याला बळजबरीने सोबत जेवणासाठी बसवायचे. अनेकदा त्यांच्या जेवणात मांसाहाराचे पदार्थ असल्याने तक्रारदार त्यांच्या सोबत जेवण टाळत होता. त्यामुळे त्याचा डब्बा लपवला जायचा. आपला डब्बा शोधणाऱ्या त्या युवकाला संशयितांनी जेवणात केवळ चव बदल म्हणून मांसाहार पदार्थ खाण्यासाठी दिला. त्याने नकार दिला असता काही धार्मिक संदर्भ देऊन मांसाहार पदार्थ खाण्यासाठी भाग पाडले. हे प्रकार सातत्याने होत राहिले. जेवनानंतर मद्यपानाच्या पार्ट्यांमध्ये त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या श्रध्देला चिथावणी देणारे काही संदर्भ देत एखादा धर्म किती श्रेष्ठ हे त्याला सातत्याने समजावून देण्याचा प्रयत्न झाला. एकाक्षणी त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र हा दबाव झुगारत या युवकाने पोलिसांकडे दाद मागितली.

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे – ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील (वन अभ्यासक, Rainbow Adventure Group  ) हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. श्रीमती साधना वझे (प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी   Animal Conservation/Rehabilitation    ) यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत. ०००००००

पालिकेचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा अभाव?

Slug –  दिवा स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर दिवा(आरती परब): दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी कामावर जाणारे नागरिक तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक दुकानदारांच्या मते, या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी, तसेच रोज वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. ०००००००

नारायण राणेंच्या रूपाने आम्हाला दमदार नेतृत्व लाभले — मुख्यमंत्री फडणवीस

वाढदिवस सोहोळा थाटामाटात संपन्न कणकवली (प्रतिनिधी)- माझ्या संसदीय कामकाजाची सुरुवात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली हे मी माझं भाग्य समजतो. विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांनी केलेली भाषणे ऐकण्याची, बघण्याची संधी मला प्राप्त झाली. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे तर नक्कीच अभ्यासू होती. तरी यापुढेही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.   माजी मुख्यमंत्री, भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सोहोळा qqq अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला.  राज्यातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार  प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, दीपक केसरकर महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून आलेले त्यांचे मित्र, चाहते या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना राणे  अतिशय भाऊक  झाले होते.’आपण पद मिळवण्यासाठी कधी काम केले नाही, मेहनत आणि निर्धार यामुळेच आपण समाजकारणात आणि राजकारणात यशाच्या शिखरावर पोहोचलो’ असे उदगार त्यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे यश मिळवू  शकलो असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या प्रति आपले ऋण व्यक्त केले. राणीसाहेबांच्या हृदयातच कोकण आहे आणि म्हणूनच त्यांनी कोकणच्या  विकासाला दिशा देण्याचे  काम केले  अशा शब्दात फडणवीस यांनी राणे यांचे कौतुक केले. विधिमंडळातील त्यांच्या कामकाजाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पावर ज्यावेळी राणेसाहेब भाषण करायचे त्यावेळी कोणीतरी अर्थतज्ञ बोलतोय असा  भास व्हायचा अशा शब्दात त्यांनी राणे यांचे कौतुक केले. ‘त्यांचा दरारा आपण विधानसभेत बघितला आहे एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेता म्हणून ते सरकारला पळता भुई थोडी करायचे हेही आपण पाहिले आहे. एक दिलदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. कामात गुणवत्ता या गुणांसोबतच हजारो लोकांचे जीवनमान त्यांनी बदलून टाकले असे गौरवपूर्ण उदगारही त्यांनी यावेळी काढले.  त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी केलेली भाषणे वाचा आणि अभ्यासा, असा सल्ला नव्या आमदारांना देत गडकरी म्हणाले,संसदीय इतिहासातला एक आदर्श विरोधी पक्ष नेता म्हणून राणे यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात गडकरी यांनी राणे यांचा  गौरव केला. सत्ताधाऱ्यांना कैचीत पकडण्याची शैली हे राणे यांच्या कडूनच  शिकावे  असा मोलाचा सल्लाही गडकरी यांनी  नव्या आमदारांना दिला. वाढदिवसाची भेट…! राणे हे शब्दाचे पक्के आहेत, तसा मी सुद्धा आहे असे म्हणत येत्या  मे महिन्यापूर्वी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल तसेच रत्नागिरी- कोल्हापूर हा  मार्गही पूर्ण होईल असे गडकरी यांनी जाहीर करत राणे यांना वाढदिवसाची भेट दिली. गेली अनेक वर्ष रखडलेल्या या महामार्गामुळे मी एवढी बदनामी सहन केली आहे की आता उदघाटन  करायला मी येणार नाही. मात्र काम पूर्ण होणार आहे असे त्यांनी जाहीर केले.  ‘कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम दादांनी केले. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपाचे बळ वाढले असे उदगार  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले. रायगड जिल्ह्यात ‘राणे पॅटर्न’ राबवण्यासाठी राणेसाहेबांनी मला टिप्स द्याव्यात अशा शब्दात तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ००००००००

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी सावली येथे दुसऱ्या TBM च्या असेंब्लीला सुरुवात

मुंबई  : येथील घनसोलीजवळ सावली येथे जमिनीखाली सुमारे ३९ मीटर खोलीवर दुसऱ्या टनेल बोरिंग मशीन (TBM) ची असेंब्ली सुरू झाली आहे.  या TBM ची सुरुवातीची ड्राइव्ह जुलै २०२६ मध्ये सुरू होण्याची…

जनगणनेत धर्म – जात नोंदवणे अनुसूचित जातींची संविधानिक गरज !

माजी सनदी अधिकारी श्याम तागडे यांचे प्रतिपादन मुंबई: मुळात आरक्षण हे जाती आधारित असून अनुसूचित जातींची जनगणना ही त्यासाठीची अनिवार्यता आहे, असे सांगतानाच धर्म आणि जातीची नोंद करण्यास त्यांनी नकार देणे म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गातून स्वतः हून बाहेर पडणे ठरेल, असा धोक्याचा इशारा माजी आयएएस अधिकारी श्याम तागडे यांनी आज मुंबईत बोलताना दिला. ते गृह खात्याचे माजी अप्पर मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव आहेत. तसेच ते विदर्भातील ‘प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान’चे संस्थापक असून प्रख्यात धम्म प्रशिक्षक आहेत. त्यामुळे जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होताच त्यांनी मांडलेल्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त श्याम तागडे यांनी शनिवारी फोर्टमध्ये मुंबईतील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक बोलावली होती. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, विचारवंत सुनील कदम, द बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट मिशन ऑफ इंडियाचे संयोजक अच्युत भोईटे , राज्य सरकारचे माजी उप सचिव सी. के. जाधव , बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, प्रा.  प्रियंका गायकवाड, पंचशील सेवा संघाचे संजय शिंदे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. जनगणना : डॉ आंबेडकर यांचे वरदान आरक्षणाच्या रूपाने लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेला प्रतिनिधित्वाचा संविधानिक अधिकार आणि त्यासाठी जाती आधारित जनगणना हे अनुसूचित जातींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. बौद्ध समाजाने ते गमावण्याचा आत्मघात करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केवळ जातवार जनगणना रखडल्यामुळे ओबीसींना हक्काचा आरक्षणाचा टक्का मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे, याकडे लक्ष वेधून तागडे म्हणाले की,  त्यावरून बौद्ध समाजाने अनुसूचित जातींसाठी जनगणनेचे महत्त्व गंभीरपणे लक्षात घेण्याची गरज आहे. अनुसूचित जातीचा माणूस हा हिंदू, शीख, बुद्ध या तीनपैकी कुठल्याही धर्माचा असला तरी तो आरक्षणाचा हकदार असतो. तो लाभ मिळवण्यासाठी धर्म – जातीची नोंद त्यांनी जनगणनेत करणे ही संविधानिक आणि प्रशासकीय गरज आहे, असे त्यांनी सांगितले. धार्मिक अस्मिता आणि संविधानिक अधिकार यांची गल्लत करू नका केंद्रातील सवलतींना प्रदीर्घ काळ मुकावे लागल्यामुळे बौद्ध समाजाचे गेल्या ६५ वर्षांत आधीच अतोनात नुकसान झालेले आहे, असे सांगून तागडे म्हणाले की, धार्मिक अस्मिता आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाच्या अधिकारासाठी  संविधानिक गरजांची पूर्तता या दोन भिन्न गोष्टी आहेत. बौद्धांनी भावनावश होवून त्यांची गल्लत करता काम नये. आरक्षणाचा स्वेच्छेने त्याग करणार ? केंद्र आणि राज्य सरकार आरक्षणाचे उप वर्गीकरण करण्याच्या भूमिकेत असून काही जाती त्यासाठी आग्रही आहेत. अशावेळी बौद्ध समाजाने जनगणनेवेळी अनुसूचित जाती या प्रवर्गातून बाहेर पडणे म्हणजे आरक्षणाचा स्वेच्छेने त्याग केल्याचेच मानले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही तागडे यांनी बैठकीतून दिला आहे.