Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास महायुती सरकारकडून वेळकाढूपणा, ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब- वर्षा गायकवाड.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत…

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये २०० हुन अधिक सायकलिस्टने भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.  १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहाचं आयोजन केले जाते. केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रक्तदान शिबीर, सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अपघात कसे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात आली. ०००००००

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा, प्रभादेवी-२०२६.

मुंबईतील वरळी येथे आजपसून होणाऱ्या पहिल्या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. वरळीकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडू्नच्या खेळाची मेजवानी पुढील चार दिवस मिळणार. मुंबई :- ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ एप्रिलला सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा संध्याकाळी ६ ते १० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेची तयारी जोमाने सुरु असून स्पर्धेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून ओम् ज्ञानदीप मंडळाचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली. पुरुष व्यावसायिक गट विभागणी :- १) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोष्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्. २) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.…

युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग’ची घोषणा!

अनिल ठाणेकर ठाणे: मैदानात उडणारी धूळ, प्रेक्षकांचा चित्कार आणि बॅटमधून सुटलेले ते सणसणीत चौकार-षटकार यांच्या साक्षीत मीरा-भाईंदर शहराच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मीरा-भाईंदर शहरात क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात भव्य उत्सव रंगणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या तर्फे ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग (PSPL)’ या ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर पश्चिम येथे २४ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार असल्याची घोषणा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. ही स्पर्धा केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, यात संपूर्ण भारताची ‘क्रिकेट क्रेझ’ पाहायला मिळणार आहे. मीरा-भाईंदर शहरात साकार होणारी ही स्पर्धा केवळ खेळ नसून एक उत्सव आहे. एका बाजूला भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले १६ दिग्गज ऑल इंडिया संघ आपली ताकद दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील १६ स्थानिक संघ आपल्या मातीतील टॅलेंट सिद्ध करतील. या स्पर्धेत एकूण ३२ संघ आपले कसब पणाला लावणार आहेत. ऑल इंडिया टीम्स च्या विजयी संघाला २१ लाख रुपयांचे परितोषिक, रनरअप संघाला ११ लाख रुपयांचे परितोषिक तसेच मॅन ऑफ दि सिरीजला लॅविश चारचाकी गाडी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला शानदार दुचाकी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रकारे ठाणे, मीरा-भाईंदर स्पर्धेतील १६ संघातील विजयी संघाला ५ लाख रुपये पारितोषिक, रनरअपला ३ लाख रुपये पारितोषिक, मॅन ऑफ दि सिरीजला शानदार दुचाकी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. २४ ते २९ एप्रिल या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदर प.) येथे क्रिकेटचे मैदान ताऱ्यांनी लखलखणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड-मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत. यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणतात कि, ‘खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘प्रेसिडेंट कप’ च्या यशानंतर, आता पीएसपीएलच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. ही स्पर्धा मीरा-भाईंदरच्या क्रीडा संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. खेळ रंगणार, रेकॉर्ड हि तुटणार. स्थानिक क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची आणि आपली जादू दाखविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मीरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात ही स्पर्धा सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल” असा विश्वास युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. क्रिकेट रसिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ०००००

वाशी येथे राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सुरुवात

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे ६० व्या सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेला आज सकाळी ९…

बालवीर स्पोर्ट्स क्लब चेंबूर, अंबिका सेवा मंडळ कुर्ला संघ विजेते

कुमार गट प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा मुंबई : राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि कुर्ला क्रीडा केंद्र कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी…

क्रॉस मैदानावर रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या टी-२० स्पर्धेला दमदार सुरुवात उपशीर्षक :

उद्घाटन सोहळा बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर व प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते संपन्न मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष/महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ ला आज १३ एप्रिल रोजी चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर…

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे : ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिलला गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील, वन अभ्यासक हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.  प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी साधना वझे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत.

राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप

कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमच्या वतीने शनिवारी सत्कार सोहळा मुंबई,-  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख ठणकावून सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या विद्यमाने हा सोहळा शनिवार, १८ एप्रिल रोजी मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज येथे रंगणार आहे. या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव)  नीलेश गुरव (मेन्स फिजिक) रौप्य पदकविजेते : गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य).

राजीव श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारला

राजेंद्र साळसकर मुंबई:राजीव श्रीवास्तव हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE), १९९० बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक पदवी मिळवली असून, त्यांना भारतीय रेल्वे मध्ये ३४ वर्षांहून अधिक समृद्ध आणि विविध क्षेत्रांतील अनुभव आहे. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) जसे की, उत्तर रेल्वे, रेल विकास निगम लिमिटेड, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे येथे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्विकारण्यापूर्वी, श्रीवास्तव हे उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) म्हणून कार्यरत होते.