Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

रमेश औताडे मुंबई: इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

अभियान सन्मानच्या ऐंशीव्या पुष्पात चाळीस कलाकार रंगमंच आविष्कार घडवणार

कलाश्रमने स्वतंत्र भारताचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा केला. योगायोग म्हणजे ‘मी पाऊस पहिला’ हे ऐंशी पानांचे पुस्तक प्रकाशित होत आहे. ऐंशीव्या पुष्पात निसर्गकवी ना. धों. महानोर कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना गीतांजली अर्पण केली जाणार. ऐंशीवे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता पंकज विष्णू उपस्थित रहाणार. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था गेली नऊ वर्षे ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवत असते. दिवंगतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सोमवार, ३१ ऑगस्ट,  दुपारी ३ वाजता, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, तिसरा मजला, लघु नाट्यगृह, प्रभादेवी येथे या उपक्रमाचे ८० वे पुष्प म्हणजे काव्य सादरीकरण नृत्य, गायन, वादन यांना प्राधान्य देणारा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धक कवी आणि इतर कलाकार असे चाळीस कलाकार आपला रंगमंच अविष्कार येथे घडवणार आहेत. अभिनेते पंकज विष्णू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने १५ ऑगस्ट निमित्ताने स्वतंत्र भारताचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला. परंतु योगायोग म्हणजे या संस्थेचे हे ८० वे पुष्प आहे. यानिमित्ताने ‘मी पाऊस पाहिला’ हा स्पर्धक कवींचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. तो सुद्धा ८० पानांचा आहे. शिवाय या उपक्रमात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. याही उपक्रमाचे हे ८०वे पुष्प आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे याच महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांच्या ‘अजंठा’ या चित्रपटातील पाऊस गीतावर ३० कलाकार येऊन गीतांजली अर्पण करणार आहेत. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांची असून लेखन, दिग्दर्शन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केलेले आहे. ‘मी पाऊस पाहिला’ या शिर्षकात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ‘मी पाऊस पाहिला’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या निमित्ताने याच नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. हा काव्यसंग्रह निवृत्त पोलीस अधिकारी आणि आदर्श गृहिणी शुभांगी जौंजाळ यांना अर्पण केला जाणार आहे. कार्यक्रमाला डॉ. कामिनीदेवी देसाई यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या रंगारंग कार्यक्रमात चंचल कांबळे, पूजा मंत्री, खुशी जाधव यांची नृत्य अदा पाहायला मिळणार आहे. रविकिरण पाटील, प्रीतम शिंगे, ज्ञानेश्वर भगत, संजना जाधव, मंजुषा साष्टे यांचा स्वरसाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्योती शिंदे, सविता जाधव, प्रिया राजपूरकर, सावित्री कदम यांच्यावर सोपवलेली आहे. अमित सोळंकी हे संगीत समन्वयक तर रोहन वानखेडे यांची प्रकाशयोजना या कार्यक्रमाला लाभलेली आहे. पुस्तक प्रकाशन आणि ‘ते आज काव्य झाले’ ‘मी पाऊस पहिला’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ००००००

राष्ट्रीय क्रीडा दिनी ‘बदलते क्रीडा जगत’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पोईसर जिमखाना येथे २९ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिकलबॉल खेळाचे भारतातील आद्य प्रवर्तक व ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील वालावलकर लिखित ‘बदलते क्रीडा जगत’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोईसर जिमखानाच्या वतीने करण्यात आले आहे.

लाइफ वॉचर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती परिसंवाद

राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत मार्गदर्शन कल्याण : लाइफ वॉचर्सतर्फे युवकांमध्ये सामाजिक आणि शालेय आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून एस.डी.टी. कलानी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापरापासून बचाव या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम लाइफ वॉचर्सच्या स्कूल हेल्थ एज्युकेशन प्रोग्रामअंतर्गत, मनॊदय न्यूरोसायकट्रीक हॉस्पिटल, कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमित धर्माधिकारी यांनी राग समजून घेणे, भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच समवयस्कांचा दबाव आणि शैक्षणिक ताण यांचा आरोग्यदायी पद्धतीने सामना करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या आणि व्यसनांच्या समस्येबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि योग्य व जबाबदार निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या परिसंवादातील एक महत्त्वपूर्ण संदेश होता — “अमली पदार्थांना ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका.” मित्र किंवा इतर व्यक्तींकडून अमली पदार्थ घेण्यासाठी दबाव आणला जात असल्यास आत्मविश्वासाने नकार कसा द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा कठीण किंवा धोकादायक परिस्थितीत विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आपल्या भावनांना समजून घेणे, समवयस्कांचा दबाव ओळखणे आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आरोग्यदायी सामोरे जाण्याच्या पद्धती तसेच समस्या निवारणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. हा कार्यक्रम लाइफ वॉचर्सच्या संस्थापक डॉ. रुपिंदर कौर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. त्या लाइफ वॉचर्सच्या शालेय आरोग्य शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शालेय जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण रुजवणे आणि बालक व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करणारे जनजागृती कार्यक्रम विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला लाइफ वॉचर्सचे सहसंस्थापक रत्नेश महाडिक यांचीही उपस्थिती होती. एस.डी.टी. कलानी स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना मनुजा तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला सहकार्य करून उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रुपिंदर कौर यांनी सांगितले की, योग्य वयात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांना जबाबदार निर्णय घेण्यास मदत होते आणि त्यांना अधिक निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भविष्य घडवता येते.

ईद-ए-मिलाद व रक्षाबंधनातून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’

कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व…

आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रामदास आठवले

आरक्षण हा संविधानिक अधिकार, वंचित घटकांना अधिक संधी देण्याची गरज अनिल ठाणेकर ठाणे : देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी…

 कराडमध्ये खो-खोच्या पंचगिरीला आधुनिकतेचा ‘टच’

राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न डिजिटल स्कोअरिंगपासून ऑडिओ-व्हिज्युअल प्रशिक्षणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराड, ता. २६ : खो-खो आता केवळ मैदानावर वेगाने धावणारा खेळ राहिलेला नाही; पंचगिरीपासून स्कोअरिंगपर्यंत संपूर्ण व्यवस्थेलाच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. कराडमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या खो-खोला अधिक अचूक पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि आधुनिक तांत्रिक व्यवस्थेचा नवा अध्याय मिळाला आहे. नियमांच्या बारकाव्यांपासून निर्णयक्षमतेपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामुळे राज्यातील पंचगिरीला नवी धार मिळणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, द ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन (सांगली) आणि सद्गुरू गाडगे महाराज (एसजीएम) कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. एसजीएम कॉलेजच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभागृहात झालेल्या समारोप सोहळ्याने शिबिराची सांगता झाली. राज्यभरातून सहभागी झालेल्या पंचांना आधुनिक नियम, तांत्रिक बाबी आणि सामन्यातील निर्णयप्रक्रियेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीटी आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर. सामन्यातील गुंतागुंतीचे प्रसंग प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्याने पंचांना अचूक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीपणे मिळाले. त्यामुळे पंचगिरीत अचूकता, सातत्य आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. समारोपावेळी एसजीएम कॉलेजच्या शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी खो-खोच्या इतिहासाचा आढावा घेत अशा प्रशिक्षणामुळे पंचांची निर्णयक्षमता अधिक अचूक व दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. रविंद्र (भाऊ) पवार यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खो-खो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पोहोचत असल्याचे सांगितले. संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी खो-खोच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी संघटनेच्या आधुनिक उपक्रमांची माहिती दिली. गुणलेखन अर्थात स्कोअरिंग डिजिटल व ऑनलाइन पद्धतीकडे नेण्याची प्रक्रिया सुरू असून, सामन्यांची नोंद, गुणपत्रिका आणि निकाल अधिक वेगवान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे. एसजीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहभागी पंचांच्या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे युट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाचा आवाका प्रत्यक्ष सहभागी पंचांपलीकडे खो-खोच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचला. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा, सांगली असोसिएशनचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष अर्जुन माने आणि कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख उपस्थित होते. सहभागी पंचांसाठी एसजीएम कॉलेजतर्फे उत्कृष्ट भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले, तर डॉ. प्रशांत इनामदार यांनी आभार मानले. कराडचे हे शिबिर केवळ पंचांचे प्रशिक्षण ठरले नाही, तर महाराष्ट्राच्या खो-खोला आधुनिक, अचूक आणि तंत्रस्नेही बनविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरले. खेळाडूंच्या गुणवत्तेसोबत पंचगिरी, डिजिटल स्कोअरिंग आणि तांत्रिक व्यवस्थाही सक्षम झाली, तर महाराष्ट्राचा खो-खो देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक भक्कमपणे झेप घेईल. 0000

 साउथ मुंबईचा मुंबई स्नायपर्सवर निसटता विजय

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग मुंबई, २६ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर…

ठाण्यात समृद्ध मराठी परंपरेतील

मंगळागौरीच्या उत्साहाची नजाकत! भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम, वृषाली वाघुले यांचे आयोजन ठाणे : जुन्या काळातील पारंपरिक पद्धतीबरोबरच बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण पद्धतीने बदल करीत शेकडो महिलांनी मंगळागौरीचा उत्सव साजरा केला. युवती बरोबर मध्यमवयीन महिलांनी एकत्र येत अपूर्व समन्वय साधत मांडलेल्या मंगळागौरीच्या खेळांमुळे समृद्ध मराठी परंपरेच्या उत्साहातील नजाकत रसिकांना अनुभवता आली. निमित्त होते भाजप व विश्वास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने, दरवर्षी गडकरी रंगायतनमध्ये भाजप व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे मंगळागौरी स्पर्धा भरविले जाते. मराठमोळ्या सणांबरोबरच पिढ्यान पिढ्या सुरू असलेल्या संस्कृतीची युवा पिढीला ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून महिलांनी उपस्थिती दर्शविली. सकाळी साडेदहापासून सुरू झालेला हा उत्सव सायंकाळी ७ पर्यंत सुरू होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांनी आयोजित केलेल्या उत्सवात मंगळागौरीचे खेळ साजरे केले जात असतानाच, पारपंरिकतेबरोबरच सामाजिक संदेश आणि जनजागृतीवर भर दिला गेला. या उत्कंठावर्धक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्नेहासखी गटाने ३१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले. तर नवी मुंबईतील रुचिरा गटाने २१ हजारांसह द्वितीय, डोंबिवलीतील साझ ह्यो तुझा गटाने ११ हजार रुपयांचे तृतीय, करीरोड येथील शिवाई गटाने ५ हजार रुपयांचे चतुर्थ आणि डोंबिवली येथील मराठमोळ्या गटाला २५०० रुपये मिळाले. या कार्यक्रमाला भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, माधुरी मेटांगे, जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक, मंडल अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनासाठी ज्ञानेश्वर अंदुरे, जगदीश मोहिते, प्रशांत कळंबटे, आकाश गोसावी, बाळकृष्ण शिंपी, वसंत वाघुले, हनीफ खान, भक्ती मोहिते, राणी क्षीरसागर, पूजा सरवदे, वैशाली विधाटे, शिल्पा उतेकर, मधुरा जोगळेकर, भाग्यश्री मुळे, भंडारे काकी यांनी प्रयत्न केले. 0000

 फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ‘ग्रोथ इंजिन’ बनविणार : एकनाथ शिंदे

मुंबई-एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी वेगाने पावले टियर-२, टियर-३ शहरांच्या विकासावर भर अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्राला केवळ मुंबईपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट…