Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

पाऊस पडल्यानंतर गाळ काढण्यात ठामपा प्रशासन दंग -राहूल पिंगळे

ठाणे: नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे, असे मत ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल…

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनद्वारे विक्रोळी येथून उत्खननास सुरुवात  

मुंबई :    मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पहिले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आज, पाच जुलै 26  विक्रोळी शाफ्ट येथून बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याच्या उत्खननाचे काम सुरू करणार आहे. एकूण 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी, मुंबईतील सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा 16 किमी लांबीचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने बांधण्यात येणार आहे.           उर्वरित 5 किमी लांबीच्या भागाचे बांधकाम एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाले आहे. (Tunnel…

काश्मीरमधील लोकांसाठी शिवसेना कटिबद्ध

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही कल्याण :  शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. काश्मीरमधील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. लडाखमधील द्रास जिल्हा रुग्णालयाला शिवसेनेने उपलब्ध केलेली सीटी स्कॅन मशीन व रुग्णवाहिका खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना राज्य संघटक आनंद परांजपे, बाजीराव चव्हाण, नितीन राठोड, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहर, लडाखचे खासदार हाजी मोहम्मद हनीफा, डॉ. मोहम्मद जाफर, अब्दुल वाहिद तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक व भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मागील काही वर्षांत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कश्मीरमधील मैत्री वृद्धींगत झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कारगील युद्ध स्मारकासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला. आता वर्षभरात द्रासमधील जिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेकडून रुग्णवाहिका आणि सीटी स्कॅन मशीन देण्यात आली. शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर शिंदे साहेब स्वत: तिथे पोहोचतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे साहेब स्वत: काश्मीरला आले. इथे अडकून पडलेल्या शेकडो महाराष्ट्रीय पर्यटकांना विमानाने पुन्हा राज्यात सुरक्षितपणे नेण्याचे काम त्यांनी केले होते. याच हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना शहिद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह याच्या कुटुंबियांना शिवसेनेने घर बांधून दिले. शिवसेना केवळ मतांसाठी नाही तर माणसुकीच्या नात्याने काम करते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काश्मीरमधील लोकांना जे जे आवश्यक असेल त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. सीमेवर काम करणाऱ्या भारतीय जवानांचे देशाप्रती असलेले समर्पण वाखणण्याजोगे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कर्तव्यावर असताना सहा सहा महिने जवान कुटुबियांना भेटत नाही, देशासाठी जवानांचे सर्वोच्च समर्पण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि लष्कराच्या हातात देश सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. सरहद संस्थेने कश्मीरमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांचे खासदार डॉ. शिंदे यांनी कौतुक केले. लडाखमधील द्रास येथे सरहद फाउंडेशन आणि भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या सरहद शौर्यथॉनचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सरहद शौर्यथॉनमध्ये जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर खासदार खासदार डॉ. शिंदे यांनी कारगीलमधील युद्ध स्मारक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. 0000

नवी मुंबईतील “ मधुर गंधार “ संगीत वर्गाचा वर्धापन दिन सोहळा

नवी मुंबई : येथील “मधुर गंधार”  या  संगीत वर्गाचा  तृतीय “वर्धापन दिन”  सानपाडा येथील सेक्टर ८ मधील गुडविल युनिटी सभागृहात ४  जुलै रोजी मराठी व हिंदी गीतांच्या मधुर आवाजात मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती…

 किरवली गावातून अवैध डबर वाहतूक रिपाईचे तहसीलदारांना निवेदन !

रिपाइं अध्यक्ष हिरामण गायकवाड यांचा आमरण उपोषणाचा इशारा ! अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावातून अवजड वाहनांद्वारे सुरू असलेल्या कथित अनधिकृत डबर व खडी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण रघुनाथ गायकवाड यांनी कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे बोगद्याच्या कामादरम्यान ठेकेदारांनी किरवली परिसरातील काही जागा भाडेतत्त्वावर घेऊन बोगद्यातून निघालेला डबर साठवून ठेवला होता. संबंधित ठेकेदार व जागामालक यांच्यातील करार संपुष्टात आल्याचे सांगितले जात असतानाही गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात डबराची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिरामण गायकवाड यांनी सांगितले की, या संदर्भात किरवली सजाचे तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावातील रस्त्यांवरून ४ ते ८ ब्रास क्षमतेचे डंपर दिवस-रात्र धावत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच मार्गालगत जिल्हा परिषद शाळा तसेच बौद्ध वस्ती असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या अवजड वाहनांमुळे गावातील नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांचे नुकसान होत असून, वाहतूक आणि ध्वनीप्रदूषणामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित वाहनांकडून आवश्यक महसूल भरला जात नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. कर्जत महसूल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून नियमानुसार महसूल वसूल करावा, अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधित डंपर मालकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि गावातील रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना न झाल्यास संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही हिरामण गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी रायगड, प्रांताधिकारी कर्जत, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 प्रस्तावित कचरा संकलन केंद्राबाबत उच्च न्यायालयात सोमवारी अंतिम सुनावणी

अर्जदारांचेच याचिककडे दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा आरोप. रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी व जऊळके खुर्द ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास स्थगिती आदेश मिळूनही सुरूवातीला असलेले स्वारस्य याचिकाकर्त्यांना राहिले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.सोमवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात आहे. राजु खंडीझोड यांनी कचरा संकलन केंद्राबाबत ग्रामस्थांना सहकार्य करावे असे सांगितल्याने टाव्हरे यांनी ॲड.वासिम सामलेवाले, ॲड. तेजपाल इंगळे यांच्या माध्यमातून रिट पिटीशन जुलै २०२५ मध्ये दाखल केली.त्यासाठीचे शासन निर्णय तसेच संबधित आदेश ही कागदपत्रे मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथून तातडीने उपलब्ध करून दिली. उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीसा पाठवून १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकल्पस्थळी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई केली आहे. याचिकेतील अर्जदार ग्रामस्थ हे सुरूवातीला दोन-तीन सुनावण्यांना उपस्थित होते व नंतर क्वचित  सुभाष बोऱ्हाडे वगळता कोणीही सुनावणीसाठी उपस्थिती दाखविली नाही. अनेक सुनावण्यांना अशोकराव टाव्हरे हेच उपस्थित होते. टाव्हरे यांनी कोणतीही रक्कम प्रवास वा इतर कारणांसाठी  घेतली नाही,जिल्हाधिकारी पुणे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विस्तृत प्रमाणपत्रे दाखल केल्याने त्यास उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागतात.याचिकेतील कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर व दोन विस्तृत प्रतिज्ञापत्रे यासाठी वकीलांनी वाढीव फी मागितली होती,परंतु ती देण्यास अर्जदारांपैकी कैलास टाकळकर यांनी नकार दिला. वाढीव फी देण्यास नकार दिल्याने ॲड.वासिम सामलेवाले यांनी यापुढे याचिकेचे कामकाज पाहणार नसल्याचे टाव्हरे यांना कळविले आहे.त्याबाबत टाव्हरे यांनी याचिकाकर्त्यांपैकी सुभाष बोऱ्हाडे यांना सांगितले असून  पदरमोड करून अंतिम सुनावणीसाठी एक  सिनियर कौन्सिल युक्तिवाद करणार असल्याचे टाव्हरे यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पडणे,बांधकामास स्थगिती आदेश मिळणे या महत्त्वपूर्ण घडामोडी घडूनही अर्जदारांना स्वारस्य नसणे हे गंभीर आहे,न्यायालय जो निर्णय देईल त्यास वकील वा मी स्वतः जबाबदार नसेल तर गुणवत्तेवर आदेश पारित होईल असे  टाव्हरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

 नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीसंचाची उपलब्धता करा !

मुंबईच्या रस्त्यावरील मॅनर्स वर आलेखन करून जाळ्या बसवा शिवसेना नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांची आयुक्तांना सूचना मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील सिमेंट काँक्रीट टप्पा १ व २ प्रमाणे तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील मॅनहोल्सवर आलेखन करून जाळ्या बसवाव्यात त्याचप्रमाणे नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करावी अशी सूचना प्रभाग क्रमांक ५४ चे शिवसेना (उबाठा) नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे मुंबईत शहर व उपनगरांत एकूण १०३९२६ मॅनहोल्स आहेत. यापैकी कितीतरी मॅनहोल्स वर सरंक्षक जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत अश्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन जुलै रोजी  दुर्दैवी घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असून, नागरिकांच्या सुरक्षेबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रभाग क्रमांक 54 चे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट नगरसेवक आणखी सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे . मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे (CC Roads) रस्ते बनवले जात आहेत. मात्र, या रस्त्यांवर असणा-या मॅनहोल्सवर सरंक्षक जाळ्या बसविल्या गेल्या नाहीत त्याचबरोबर सदर मॅनहोल्सचा आलेखन  किंवा माहितीसंच तेथील संबंधित अधिका-यांना उपलब्ध झालेला नाही त्यामुळे असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे  नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे काँक्रीट रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी आणि नियमित साफसफाई करतेवेळी झाकणे उघडली जातात, परंतु काम झाल्यानंतर ती बऱ्याचदा जागेवरून गायब असतात किंवा उघडीच ठेवली जातात, ब-याच मॅनहोल्सवर बसविलेल्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असतात किंवा तिथून चोरीला गेलेल्या असतात. असे अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले असून त्यांनी पुढे म्हटले आहे की अशा उघड्या मॅनहोल्समध्ये पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व मॅनहोल्स सुरक्षित करणे तसेच त्यावर आलेखन करून जाळ्या बसवणे त्याचबरोबर तेथील मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी म्हटले आहे की, या उघड्या गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करणे प्रशासनाला बंधनकारक होते. असे असतानाही जुलै महिना उजाडला तरी अनेक ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम अपूर्ण का आहेत, याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आज मुंबईकर त्रस्त असल्याचे  अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे ३१ मे ची डेडलाईन उलटूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या संबंधित कंत्राटदार (Contractors) आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ठिकठिकाणी  आलेखन करून जाळ्या बसवण्याची उपाययोजना करावी व नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना  पत्राद्वारे सुचविले आहे. 00000

 दिव्याच्या साबेगावातील दत्त निवारा सोसायटीत जिना कोसळला

अग्निशमन दलाची तत्परता, पाच रहिवासी सुरक्षित दिवा, दि. ५ जुलै : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या दत्त निवारा सोसायटीच्या जिन्याचा स्लॅब रविवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच रहिवाशांची सुखरूप सुटका केली. शीळ अग्निशमन केंद्राला दुपारी १२.५२ वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. ही घटना साबेगाव येथील वैभव धाब्याच्या मागे असलेल्या दोन मजली दत्त निवारा सोसायटीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्या प्रदीप मालुसरे (५०), प्राजक्ता मालुसरे (४२), चेतन मालुसरे (२१), गणेश राणे (४८) आणि आरोशी कुमडेकर (१४) या पाच रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली. 000000000

युद्धभूमीवरील गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्याची संधी

२३वे गिरिमित्र संमेलन ११ व १२ जुलैला मुलुंडमध्ये; सियाचीन वीरांचे अनुभव ठरणार मुख्य आकर्षण मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गिर्यारोहण, साहसी क्रीडा आणि राष्ट्रसेवेचा संगम अनुभवण्याची संधी देणारे २३वे ‘गिरिमित्र संमेलन’ ११ व १२ जुलैला…