Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी पुणे: जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने पुण्यात शिवजयंती  ‘मेरा युवा भारत’’  पदयात्रेत  खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.  पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, भारतीय  खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव  शैलेश टिळक,  लेखक संजय दुधाणे शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या. युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे  लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन संदिप घोलप केले तर आभार शिवाजी कोळी यांनी मानले.  या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.  पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या  २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी

सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी राजीव चंदने मुरबाड :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या रोमहर्षित वातावरणात विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मुरबाडचा भूमिपुत्र शिवळे आंबेळे गावचा जलसाकार निखिल वाघचौडे हे उपस्थित होते त्यांच्या  दोनच राजे इथे गाजले या गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले गेले. शिवजयंती निमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गितगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी सुरेख असे इशस्तवन व स्वागत गीत इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनीनी सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ प्रा.आर. ए. सुरवसे यांनी स्वीकारले तर सुरेख असे सूत्रसंचालन इयत्ता-८ वी च्या विद्यार्थिनीं सोनल शिंगोळे, हेमलता शिंगोळे, नेहा पष्टे, अनन्या पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता देवयानी शिंगोळे हिने आभार मानून केले.

 डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन

डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कल्याण : हिंदू धर्मसंस्कृतीत पादुका पूजन व दर्शनाची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. गुरु-शिष्य परंपरेतून आलेल्या या परंपरेला सगुण स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. याच भक्तीभावातून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, २२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील चंद्रेश नीलकंठ बिल्डिंग मागील मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोढा हेवन, निळजे, कल्याण-शिळ रोड येथे करण्यात आले आहे. रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत ३० गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी दूरवर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांनी दिलेल्या ‘ तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या संदेशातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ज.न.म. संस्थानाद्वारे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल वितरण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भक्त, साधक, शिष्य मोठ्या भक्तिभावाने सहभागी होणार असून सिद्ध पादुका रथात विराजमान करून डोंबिवली परिसरातून कार्यक्रमस्थळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भजन, नामगजर, टाळ-मृदुंगांचा नाद, भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा, कलशधारी महिला, लेझीम, फुगड्या आणि आकर्षक देखावे यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. वेदोक्त मंत्रोच्चारात पूजन, शेकडो अनुयायांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. संस्थानाच्या पुरोहितांकडून वेदोक्त मंत्रोच्चारात सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात येईल.  त्यानंतर प्रवचन सेवा, भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह उपस्थित राहून सिद्ध पादुका दर्शनाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मेक इन इंडियाचा ‘कुत्रा’ अखेर चायनाचा निघाला !

नवी दिल्ली : जगभराला नादावलेल्या आर्टीफिशिएल टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या  समिटमध्ये आज एका कुत्र्यावरून वाद उद्भवला. मेक इन इंडियाचे प्रॉडक्टम्हणून या समिटमध्ये भारतीय युनिव्हर्सिटी नोएडाच्या गलगोटियाने दावा केलेला रोबॅटिक कुत्रा हा मुळ चायनिज बनावटीचा…

विमानाचा अपघात पायलटनेच घड़वून आणला- रोहीत पवार

स्वाती घोसाळकर मुंबई: जोवर संपुर्ण तपास पुर्ण होत नाही तोवर अजित दादांच्या विमान अपघाताला घात झाल्याचा संशय कायम राहणार आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती इतकी चक्रावणारी आहे की त्यामुळे…

शिंदेंच्या भेटीसाठी राज ठाण्याच्या नंदनवनात !

मुंबई : महापालिका निवडणुकीतील कडूगोड आठवणी बाजूला सारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदेंचे ठाण्यातील घर नंदनवन गाठले. राज ठाकरे नंदनवनात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. एकनाथ…

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

 नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या राज्यसभेतील जागेसह अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी येत्या सोमवारी १६ मार्चला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या देशभरात रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२६ असेल. अर्जांची छाननी ६ मार्च रोजी केली जाणार असून ९ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

साहेबांचा घातच झाला….

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नसून घातच असल्याचा दावा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रोहीत पवार यांनी आज मीडियासमोर मांडला. साहेबांचा विमान अपघात घडवून आणल्याचा संशय रोहीत…

मॅक्रॉनयांनी अनुभवला छत्रपतींचा ‘शिवसोहळा’

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत खास वेळ काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसोहळा आवर्जुन पाहिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी या शिवसोहळ्याचा अनुभव घेतला. शिवसोहळ्यातील…

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या २० फेब्रुवारीला आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका सचिव मनिष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते. महापौरांनी सभागृहातील आसनव्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तपासणी केली. ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय १३१ नगरसेवक निवडून आले असून, याशिवाय १० स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसनव्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला.  महापौरांनी नमूद केले. ९सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनिव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आणि राज्यगीताने, तर  महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनीफ‍ितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले. एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.