Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

प्रभाग २८ च्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाचे १५ कलमी ‘गॅरंटी कार्ड’ जाहीर

प्रभाग २८ च्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गटाचे १५ कलमी ‘गॅरंटी कार्ड’ जाहीर शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित…

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली शिवसेनेने करुन दिली देवाभाऊंना आठवण मुंबई :  ५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ…

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीच्या प्रचार मेळाव्यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश दिवा : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आज मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश…

एकनाथ शिंदेंंचा ठाण्यात बाईक रॅली…

ठाणे पूर्व, पश्चिम, आनंद नगर, कशीश पार्क, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर यांसारख्या प्रमुख मार्गांवर एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅली करी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रचार केला.…

डोंबिवलीत भाजपाच्या लक्ष्मीदर्शनचा शिंदेंच्या शिवसेनेकडून पर्दापाश

ठाणे : भाजपने  सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली  महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेन उघडकीस आणल आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पांढऱ्या पाकिटात ३००० रुपये म्हणजे ५०० रुपयांच्या ६ नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात होते. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत होते अशी माहीती मिळताच येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. भाजपाचे विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेचे हा व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत आहेत.

महिलांना बेस्टचे हाफ तिकीट

   महायुतीचा ‘वचननामा‘ जाहीर ० ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत ० २४ तास पाणी ०   लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपा, एकनाथ शिंदें यांची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आरपीआय यांच्या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही कायकाय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. आम्ही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असा…

महाराष्ट्र नव्हे ‘अदानीस्तान’?

भाजपाने अख्खी मुंबई विकायला काढली आहे, अशा शबदात राज ठाकरे यांनी भाजपाच्या अदानी प्रेमाचा बुरका टराटरा फाडला. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर एका व्यक्तीने माहिती दिली, माझी रिसर्च टिम कामाला लागली. आत्ता हे सगळं मी तुम्हाला…

‘शिवतिर्था’वरून ठाकरेंची महाराष्ट्राला साद आता चुकलात तर कायमचे संपलात…

स्वाती घोसाळकर मुंबई : मराठी मनाचा हुंकार म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतिर्थावरून आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यां ठाकरें बंधूनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातलीय. आता चुकलात तर…

आक्रमक इतिहासजमा झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच उभं आहे पंतप्रधान मोदींचे शौर्य यात्रेत प्रतिपादन

  सोमनाथ : गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथ मंदिरावर आक्रमक करणारे अनेक आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच गर्वाने उभं आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी  नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला यावेळी ते बोलत होते. सोमनाथ मंदिर येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती. शौर्यसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की,  एक हजार वर्षांपूर्वी १०२६  साली महमूद गझनी याने केलेल्या हल्ल्यावेळी इथे काय वातावरण असेल,  आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी आपल्या आस्थेला वाचवण्यासाठी आपल्या महादेवांसाठी प्राणांची बाजी लावली होती. एक हजार वर्षांपूर्वी हे आक्रमक विचार करत होते की, त्यांनी आम्हाला जिंकलंय. मात्र आज एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ महादेव मंदिरावर फडकत असलेला ध्वज हिंदुस्तानची शक्ती काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवून देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंत सर्व आक्रमक सोमनाथ मंदिरावर हल्ले करत होते. तेव्हा त्यांना वाटत होते की, त्यांची तलवार सनातन सोमनाथवर विजय मिळवत आहे. मात्र ज्या सोमनाथला ते नष्ट करू इच्छित होते, त्याच्या नावामध्येच सोम अर्थात अमृत आहे, हे धर्मांध कट्टरपंथी समजू शकले नाहीत.  त्याच्यामध्ये हलाहल प्राशन करून अमर राहण्याचा विचार जोडलेला आहे. तसेच त्यामध्ये सदाशि महादेवांच्या रूपात चैतन्यशक्ती प्रतिष्ठित आहे.  ती कल्याणकारक आहे आणि प्रचंड तांडव: शिव: हा शक्तीचा स्रोहती आहे. त्यामुळेच गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथवर हल्ला करणारे सर्व आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले. मात्र चिरंतन सोमनाथ मंदिर सागर किनाऱ्यावर अभिमानानं उभं आहे. असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.