Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम मुंबई: महाराष्ट्र  राज्यात तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश अधिक आधुनिक आणि डिजिटल होत असताना, “एमएमआरडीए” देखील आता अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकांसाठी सोयीस्कर अशी प्रशासन व्यवस्था उभारण्यावर भर देत आहे.  यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद होत व्यक्त होत आहे. तब्बल  १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.      तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत ‘एमएमआरडी’एने राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. संजय मुखर्जी  महानगर (आयुक्त) एमएमआरडीए यांनाही प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे. ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम पुरस्कारासाठी सहभागी शासकीय संस्थांचे मूल्यमापन कर्मचारी विकास आणि सेवा नियमांच्या पालनाशी संबंधित ९ निकषांवर करण्यात आले. तसेच, ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्रशासनाचा वापर करण्यासंदर्भातील ७ विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. हे यश डॉ. संजय मुखर्जी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि टीम “एमएमआरडीए”च्या प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे, ज्यांची वचनबद्धता, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेवरील विश्वास या प्रदेशाच्या परिवर्तनाला दररोज नवी ऊर्जा देत आहे.

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन योगेश चांदेकर पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.

दीपक केसरकरांची भोंदू खरातवर ‘कृपा’ शालार्थ आयडी घोटाळ्यात हरिभाऊ लाखे नाशिक : दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातवर ‘केसरकर कृपा’ झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक…

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा !

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा ! गटार पायवाटांमध्ये भ्रष्टाचाराचा भाजपाचाच आरोप  श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी सिद्धेश शिगवण ठाणे : भ्रष्ट्राचार करणाऱ्यांनी ‘गटाराला’ही सोडले नाही. गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल…

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह नवी दिल्ली :  देशाला दीर्घकाळ सतावणाऱ्या नक्षलवादाचा पुर्णता बिमोड केला  असून त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  केली. शाह म्हणाले की, देशातील १२ राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल. यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता. रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.

 गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!

गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…! पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…! राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे. कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात  गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे  खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड  उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला. मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.  

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र

सिंधुदुर्गात सभापती निवडीतही राणे यांचे धक्कातंत्र प्रक्रिया बिनविरोध, राऊळ, नारकर,साटविलकर, तांबे यांची वर्णी राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.  कट्टर राणे  समर्थक भाजपाचे प्रितेश राऊत( शिक्षण व आरोग्य) आणि सुलोचना नारकर (महिला व बालकल्याण) तर शिंदे शिवसेनेचे संतोष साठविलकर (वित्त व बांधकाम )आणि रुहिता तांबे( समाज कल्याण) यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीत खासदार नारायण राणे यांनी जुन्या नव्या सदस्यांना संधी दिली आहे. रेडी वेंगुर्ले इथून निवडून आलेले प्रितेश राऊळ  यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सुलोचना नारकर या पोंभुर्ले (देवगड ) जि. प.गटातून निवडून आल्या आहेत. शिंदे सेनेचे साटविलकर हे मालवण तालुक्यातील पेंडूर जि. प. गटातून निवडून आले आहेत. तर रोहिता तांबे या जानवली (कणकवली) या जि. प. गटातून निवडून आल्या आहेत. निवडीनंतर जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जय प्रकाश परब,उपाध्यक्ष दादा साईल शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मनीष दळवी शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे गटनेते संजय बोबडी यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व सभापतींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी ठाणे:  ठाणे-पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व त्यासाठी लागणाऱ्या मतदार यादीचे काम चालू झालेले आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये मतदार यादी कायम होऊन नवीन यादी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महानगरपालिका येथे महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महाराष्ट्र सहकार बोर्डाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक बाबाजी पाटील व शिवसेना पक्षाचे सन्मा नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन पक्ष ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण करत आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रगण्‌य आहे असे मानले जाते. सहकाराच्या माध्यमातून जिल्हयातील सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे सर्व दृष्टीने एकत्र येवून ठाणे जिल्हा मध्यवर्ती व पालघर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक लढवावी अशा प्रकारचे साकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे मांडण्याबाबतची भूमिका घेतली आहे. या संदर्भात मतदार यादी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे व पतसंस्थांचे ठराव किंवा पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहरातील सर्व सन्मा. नगरसेवकांना त्याच्या प्रभागामध्ये असणाऱ्या गृहनिर्माण संस्था व पतसंस्था यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नियमाप्रमाणे जो ठराव लागतो तो ठराव 5 तारखेच्या आत अनिल भोर, खांडेकर व ज्ञानेश्वर गायकवाड समन्वयक म्हणून त्यांचेकडून देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. सर्व पदाधिकारी, ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेबरोबर निवेदनाद्वारे चर्चा करतील व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी फेरीवाल्यांवरील दंड ५ हजार रुपये करावा ठाणे  : ठाणे महापालिकेने नव्या ठाणे शहरात विविध विकास प्रकल्प राबवितानाच, जुन्या ठाणे शहराचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी केली. तसेच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त केल्यानंतर १२०० रुपयांऐवजी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली. ठाणे महापालिकेकडून नव्याने वसलेल्या ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांबद्दल आनंद आहे. परंतु, नवे प्रकल्प राबविताना जुन्या शहराचा विचार करायला हवा. गायमुख, नागला बंदर, बाळकूम, कोपरी येथे खाडीकिनारी सुशोभिकरण व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, माझ्या प्रभागातील व जुन्या ठाण्यातील महागिरी खाडी परिसराला वगळण्यात आले. या खाडीत साचलेला गाळ नालेसफाईच्या मोहिमेतून काढण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी खंत व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागातून येणारे सांडपाणी प्रक्रियेविना थेट खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली. ठाणे रेल्वे स्टेशन ते कोर्ट नाका, अशोक टॉकीज ते सिडको बस स्टॉप, सिद्धिविनायक मंदिर ते तलावपाळी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. या रस्त्यावरूनच टीएमटीची वाहतूक सुरू असल्याने लाखो लोक सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण विरोधी पथकाची जीप फिरती ठेवावी. तसेच बेकायदा फेरीवाल्यांकडून सामान व साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडविण्यासाठी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली. तसेच जुन्या स्टेशन रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी १० वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील शाळा क्र. १ बंद आहे. या शाळेच्या ठिकाणी नवी इमारत उभारून तेथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करावी. तसेच चरई येथील जलकुंभासाठी तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.