ठाणे : शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअॅप क्रमांक सुरू केला आहे. शेतकरी बांधवांनी या टोल फ्री क्रमांक व व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधून शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हा कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत सुरू आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. शेतीविषयक शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात.
टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 हा क्रमांक संपूर्ण वर्षभर सुरू राहणा आहे. खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत, उपलब्धता, गुणवत्ताबाबत शंका निरसन करता येईल. कृषी विभागाशी निगडित मृदा संधारण, विस्तार, सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन या क्रमांकावरून करता येईल.
संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक, कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक, आवश्यकता असल्यास दिले जातात. टोल फ्री क्रमांक 9822446655 हा केवळ संदेश पाठवण्यासाठी उपलब्ध आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0000
