Month: December 2024

 पारोळामधील जिल्हापरिषद शाळेमधल्या गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिसे भेट

 राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम   कल्याण : नुकतीच पारोळा केंद्र समुहातील शाळांची डिसेंबर महिन्याची शिक्षण परिषद जि प उच्च प्राथमिक शाळा क्र २ पारोळा येथे गुणवत्तापुर्ण व उत्साहवर्धक वातावरणात केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शाळेतील शिक्षिकांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी भव्य सुंदर व आकर्षक रांगोळी शाळेच्या प्रांगणात साकारून सर्वांचेच लक्ष आकर्षित केले. शाळेच्या विदयार्थीनींनी अगळया वेगळ्या पद्धतीने व विविध वेशभुषा परिधान करीत ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. आपण सदैव ज्या पर्यावरणात जीवन जगतो ते स्वच्छ, सुंदर, निर्मल असले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेपासुनच बालकांच्या मनावर पर्यावरण जतन, रक्षण व संवर्धन हे ध्येय बिंबविण्याचा शाळा शिक्षकांचा प्रयत्न दिसुन आला. झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा ही नाटिका अतिशय प्रबोधन करणारी विदयार्थ्यांनी सादर करून याबाबत जागृती केली. या सर्व २५ गुणवंत विद्यार्थ्यांना जि प शाळा क्र ३ पारोळा शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी आपल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रम अंतर्गत रायटिंग पॅड देवुन प्रोत्साहित केले. शिक्षण परिषदेत अपेक्षित विषयांवर चर्चेत सर्वच शिक्षक यांनी सहभागी होवुन आपले त्या त्या विषयानुसार अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्याक रविंद्र पाटील, मंगला शिवदे, किशोर पाटील, मोहन बागुल, स्वाती देवरे, शितल पाटील, मयुरी पाटील, मंगला पाटील, स्नेहल वराडे, विठोबा महाजन या शिक्षकांनी विदयार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बसवुन शिक्षण परिषदेचे उत्कृष्टपणे आयोजन केले. 000000

येऊरच्या डोंगरात ट्रेकिंगला गेलेल्या मुलांना मधमाशांचा चावा

 दहा मुलांची सुखरूप सुटका, तिघे गंभीर जखमी   ठाणे : येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डाेंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर (१८) याच्यासह दहा मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी दिली. ही मुले ट्रेकिंगसाठी डोंगरात गेली होती, त्यांना मधमाशा चावल्या. त्यामुळे  भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पोलिसांना दिली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयोगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह  टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास  ऋषी याच्यासह समर्थ मयेकर (रा.  घणसोली, नवी मुंबई),  प्रणव परब (रा. विक्रोळी, मुंबई), वरद बासा (रा. विक्रोळी, मुंबई), सोहम देशमुख (रा. वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे),  कुणाल पानमंद (रा. घाटकोपर, मुंबई), तन्मय नाईक (रा.  मुलुंड, मुंबई),  रोहन गरुड ( रा. मुलुंड, मुंबई), अलोक यादव (रा. कळवा, ठाणे) आणि  आर्य यादव (रा. कांजूरमार्ग, मुंबई) या दहा मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका केली. या  मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि सोहम या तिघांना  एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 00000

डोंबिवली, कल्याणमध्ये आदेशाविरुद्ध वृक्ष प्रदूषित रोषणाई

 पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा   कल्याण : नववर्षानिमित्त अनेक दुकानदार, खासगी आस्थापनांनी आपल्या दुकान, आस्थापनांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही काही व्यावसायिक त्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे उपायुक्त आणि उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने सजवली आहेत. ही दुकाने सजविताना दुकान समोरील झाडांवर, झाडाच्या खोडावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे झाडांवर विद्युत रोषणाई केल्याने झाडांवरील जैवविविधतेला धोका पोहचतो. या झाडांवर अधिवास करणाऱ्या पक्षी, इतर जीवांच्या निवाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणाशी निगडित एका जनहित याचिकेवर निर्णय देताना झाडांना विद्युत रोषणाई करण्यास प्रतिबंध केला आहे. न्यायालयाच्या निर्णयावरून कल्याण डोंबिवली पालिकेने गेल्या आठ महिन्याच्या काळात एक हजारहून अधिक दुकानांसमोरील झाडांना केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली आहे. ज्या दुकानदार, आस्थापनांना न्यायालयाच्या निर्णयाची माहिती नाही ते अनभिज्ञपणे झाडांना रोषणाई करत आहेत. याविषयी पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर उद्यान विभागाकडून संबंधित व्यावसायिकाला ती रोषणाई काढून टाकण्याची तंबी दिली जाते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक हाॅटेल्स, ढाबा मालक, मद्यविक्री दुकाने, कपडे विक्री दुकाने, केशकर्तनालय, शोभेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांनी दुकानसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. याविषयी पर्यावरणप्रेमींनी काही व्यावसायिकांना ही कृती करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेला कोणीही दाद दिली नाही. व्यावसायिकांनी दुकानाला विद्युत रोषणाई केली की ती वर्षभर झाडावरून काढली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नववर्षानिमित्त पालिका हद्दीत अनेक व्यावसायिकांनी झाडांना विद्युत रोषणाई करून वृक्ष प्रदूषित केले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने मोहीम हाती घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये यासाठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ज्या व्यावसायिकांना या आदेशाची माहिती आहे ते अशाप्रकारची विद्युत रोषणाई करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र ज्यांना माहिती नाही ते अशाप्रकारची रोषणाई करतात. त्यांची तक्रार आली तर तात्काळ त्यांना रोषणाई काढण्यास सांगितले जाते. जे हेतुपुरस्सर रोषणाई करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे झाडांवर कोणी विद्युत रोषणाई केली असेल त्यांनी ती तात्काळ काढून टाकावी. – संजय जाधव उपायुक्त, उद्यान विभाग. 00000

 नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 एस. टी. कदम विद्यालयाचे आगळेवेगळे स्नेहसंमेलन   योगेश चांदेकर पालघरः प्रत्येक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन वेगवेगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरे केले जात असते; परंतु एखादी विशिष्ट ‘थीम’ निवडून त्यावर कार्यक्रम सादर करण्याचे आव्हान कुणीच स्वीकारत नाही, असे आव्हान स्वीकारून पालघरच्या एस. टी. कदम विद्यालयाने नवरसाच्या ‘थीम’वर एक अभिनव उपक्रम राबवून पालक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  नवरस या अभिनव व अर्थपूर्ण ‘थीम’वर या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अभिनव ‘थीम’ची चर्चा आता पालघरमध्येच नव्हे, तर सर्वत्र होत आहे. नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादरीकरण तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नवरस ही ‘थीम’ घेऊन त्यावर विविध नृत्य, नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर केले. आनंद, दुःख, करुणा, रौद्र, वीर, भयानक, शृंगार, विभक्त आणि शांत या नऊ रसांची प्रभावी व व भावनिक प्रस्तुती विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मुलीचा जीवन प्रवास उलगडला ‘थीम’मधून नवरस या ‘थीम’चा मुख्य भाग एका मुलीच्या जीवन प्रवासावर आधारित होता. तिच्या आनंदी बालपणानंतर ती कठीण प्रसंगावर कशी मात करते, समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या सहाय्याने ती कशी उभारी घेते, हे या वेळी नृत्य नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मोनोॲक्ट आणि नुत्यांद्वारे या भावनांना प्रभावीपणे सादर करून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाची सुरुवात जीवन विकास संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक कमल कचोलिया यांनी शाळेच्या वार्षिक प्रगती अहवालाचे वाचन केले. या वेळी विद्यार्थ्यांचा व पालकांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कदम परिवार आवर्जून उपस्थित या वेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, व्यवस्थापक कोमल कदम, भावी मुख्याध्यापक प्रदीप पाणीग्रही, उपमुख्याध्यापक नेहा पाटील, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापक संगीता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक आणि उपस्थितांची मनापासून मिळालेली दाद ही या शाळेसाठी एक अभिमानाची आणि चिरस्थायी बाब ठरली. 000000

नववर्षाचे औचित्य साधून आजोबा गडावर राबवली स्वच्छता मोहिम

कल्याण : शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाचे निमित्त साधून दोन दिवसीय गडकिल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वछता मोहिमेचे…

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ११ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  ठाणे गिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 000000

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर

ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी…

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा – ॲड. इंदवी तुळपुळे

ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि…

 ‘नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या’

बाळासाहेब थोरातांची खरमरीत टीका  मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं…