Month: December 2024

घाटकोपर फलक दुर्घटना भावेश भिंडेची दोषमुक्ततेची मागणी

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने आता प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी…

नाशिककरांना हुडहुडी!

 शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद   हरिभाऊ लाखे नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली अहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. शहरात गुरुवारी किमान १०.५, तर कमाल २७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान १०.६, तर कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि मंगळवारी किमान १०.८, तर कमाल २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. राज्यात नाशिकच्या खालोखाल अहिल्यानगर आणि पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी अहिल्यानगरमध्ये ९.४, तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडचा पारा घसरला निफाड : गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडीचा पारा सातत्याने घसरत असून, गुरुवारी कुंदेवाडी येथील निफाड गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीने सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुवारी मात्र चांगलीच वाढली होती. निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होईल. मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ००००

 कर्व्हालो कुटुंबीयांनी जपले दोनशे वर्षांचे गुलाबी लसणाचे वाण

 नव्वद वर्षांच्या निकलस आजोबांची वाण जतनासाठी धडपड   योगेश चांदेकर पालघरः अलीकडच्या काळात शेती करणे कठीण झाले आहे. त्यात वसई सारख्या परिसरात तर शेतीऐवजी उद्योग आणि नोकऱ्या करण्याकडे लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत वसई तालुक्यातील गिरीज गावातील मारोडेवाडी येथे निकलस कर्व्हालो, त्याचे चिरंजीव अनिल आणि सून हर्षाली यांनी वाडवडीलांची गुलाबी लसणाच्या शेतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.अवघ्या दोन गुंठ्यांत हे गुलाबी लसणाचे हे वाण जिवंत ठेवण्यासाठी हे कुटुंब अतोनात कष्ट घेत असून पालघर जिल्ह्यात यांच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न कुठेही घेतले जात नाही त्यामुळे त्यांच्या लसणाचा सुगंध दूरवर दरवळत असून लसूण लागवडी अगोदरच खरेदीचे बुकिंग झालेले असते. वसई जवळ कर्व्हालो कुटुंबीयांची शेती आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. केळी, कांदा बोकर्ली, वांगी, फ्लावर्स, बनकेळी आदी पिके घेतली जातात. हे कुटुंब बाहेरून फारसे काही खरेदी करत नाही. तेल वगळता अन्य गरजा या त्यांच्या शेतीतून पूर्ण होतात. टाळेबंदीच्या काळात तर त्यांचे सर्व कुटुंब शेतीतील उत्पादनावरच जगत होते; उलट बाहेर सर्व बंद असल्याने त्यांना शेतीतील पिकांतून जादा उत्पन्न मिळाले. गुलाबी लसणाच्या शेतीत पडला नाही खंड अन्य पिकांच्या साखळीत जरी बदल करीत असले, तरी गुलाबी लसणाची शेती मात्र ते कायम करतात. अर्थात ती फार मोठ्या क्षेत्रावर केली जात नाही. वसई पश्चिम मधील गिरीज तलावानजीक मारोडे भागात त्यांची ही लसणाची शेती आहे. या परिसरातील जमीन अतिशय कडक असते; परंतु अनिल स्वतःच्या पावर ट्रिलरने तीन-चार वेळा मशागत करून ती भुसभुशीत करतात. त्यात शेणखत घातले जाते. कर्व्हालो कुटुंबीयांनी रासायनिक खतांना दूर ठेवले असून सेंद्रिय खते आणि शेणखतावरच भर दिला आहे. लसणाची शेती फारच अवघड लसणाची शेती तितकीशी सोपी नाही. एकेक पाकळी स्वतंत्र करून खणप्याने अर्धा इंच खोल पाकळी लावावी लागते. दोन पाकळ्यांच्या मध्ये वितभर अंतर ठेवावे लागते. हा लसूण रुजायला पंधरा दिवस लागतात. लसूण लावल्यानंतर त्याला पोहोच पाणी दिले जाते. पाणी जास्त दिले, तर लसूण सडण्याचा धोका असतो. त्यामुळे पोहोच पाणी ठराविक अंतराने द्यावे लागते. पंधरा दिवसानंतर कुठे लसूण पातळ झाला असेल, तर पुन्हा मोकळ्या जागी दुसऱ्यांदा लसणाची लागवड करावी लागते. जमिनीचा पोत बिघडू नये, म्हणून निर्माल्यापासून तयार केलेले खतच या गुलाबी लसणाच्या शेतीसाठी वापरले जाते. एरवी दर दहा दिवसांनी पाणी दिले जाते, तर ऊन वाढल्यानंतर मात्र आठ दिवसांनी पाणी द्यावे लागते. नव्वद दिवसात लसून तयार होतो. त्या अगोदर त्यावर करपा पडायला लागला, तर फवारणी करावी लागते; शिवाय दव पडण्याच्या काळात अधिक लक्ष द्यावे लागते. एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते. गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व पात पडायला लागली की लसून काढणीला आला, असा त्याचा अर्थ होतो. लसणाची शेती करणेही कांद्याइतके सोपे नसते, खुडणार नाही अशा पद्धतीने लसून काढावा लागतो. शेतातच २०-२५ दिवस तो सुकून ठेवावा लागतो. नंतर अर्धा अर्धा किलोचे पॅक तयार करून ते घरातील माळ्यावर ठेवले जातात. या गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. लसून आणि गूळ खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर रक्त पातळ होते. लसूण माळ्यावर ठेवला, की घराबाहेर त्याचा सुगंध जातो. त्यामुळे आमच्याकडे लसूण आहे हे सर्वांना समजते, असे हर्षाली यांनी सांगितले. दोनशे वर्षापासून आजोबा, पणजोबांनी जपलेले गुलाबी लसणाचे वाण जपण्यासाठी निकलस, अनिल आणि हर्षाली खूप कष्ट घेतात. मजूर मिळत नसल्याने समस्या कर्व्हालो कुटुंबीयांच्या लसणाची ख्याती दूरवर पसरली असून लसून लागवडीच्या अगोदरच त्यांच्याकडे आगाऊ नोंदणी केली जाते. कधी कधी एक एक वर्ष अगोदर नोंदणी असते. विशेषतः ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्याकडून तर हमखास गुलाबी लसणाची मागणी येते. अलीकडच्या काळात शेती परवडत नाही. विशेषतः कोकणातील शेती तुकड्या तुकड्याची आहे. त्यामुळे मशागत करता येत नाही; शिवाय मजूर मिळत नाही. ही वेगळी समस्या असतानाही कर्व्हालो कुटुंबीयांनी आपल्याशी मजुरांची एक टोळी कायम जोडून ठेवली असून, या महिलांच्या मदतीने लसूण लागवड आणि काढणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. निकलस आजोबांना आता शेती परवडत नाही, त्यामुळे शेती सोडण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याची खंत आहे. कोट ‘आपण केवळ आवडीमुळेच हे गुलाबी लसणाचे वाण जतन करण्यासाठी झटपटतो आहोत. माझ्या मुलाने आणि सुनेने शेती जपली आहे, याचा मला अभिमान आहे. पुढच्या काळात कोणी शेती करील, की नाही याबाबत संभ्रम आहे. -निकलस कर्व्हालो, गुलाबी लसून उत्पादक

 काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचे धान्य संतप्त ग्रामस्थांनी पकडले

 जरंडी गावातील घटना..   सोयगाव : चार चाकी वाहनाद्वारे  काळ्या बाजारात रेशन चा गहू,तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी  शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.. सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रेशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू,सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार-दोन गोण्या,एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रेशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र-एम एच-४३,व्ही-६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र-एम एच-२० बी व्ही-००८२,एम एच-२० ए व्ही-९४८२ आणि एम एच-२०,ए यु-९६७९  काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून  अफरोज हमीद शेख,समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख(चारही रा शिवना ता सिल्लोड,)इकबाल तडवी(रा निंबायती ता सोयगाव),शेख नाजीम शेख चांद(रा सोयगाव)व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले  दरम्यान सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेत सदर रेशन चे गहू तांदूळ असे अकरा क्विंटल धान्य  सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तगत केले अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

 “मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही”

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दिल्लीवारीवरच्या अफवांवर स्पष्टीकरण   डोंबिवली : मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या इतर नेत्यांबरोबर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांचेही नाव चर्चेला येत आहे. शनिवारी ते तातडीने दिल्ली येथे गेल्याची चर्चा समाजमाध्यमांवर पसरली होती. काही माध्यमांनी याविषयी बातम्या चालविल्या. या सगळ्या अफवांवर स्पष्टीकरण देताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मात्र, मी डोंबिवलीतच आहे, मी दिल्लीला गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण ट्विटर (एक्स) च्या माध्यमातून रविवारी दिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. मी दोन दिवसात किंवा मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण देऊन नेते चव्हाण यांनी सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. आठवडा होत आला तरी राज्याचा मुख्यमंत्री ठरत नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेच्या माध्यमांतून अफवा पसरत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याच्या जोरदार हालचाली दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबरोबर, या चर्चेबरोबर मराठा चेहरा महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याच्या चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहेत. मध्यप्रदेश, हरियाणाचा अनुभव भाजप नेत्यांच्या गाठीशी आहेत. या राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्याही स्वप्नात, मनात नसलेले चेहरे भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर बसवून त्या त्या राज्यातील भाजपच्या इच्छुक, मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी सज्ज असलेल्या नेत्यांना हादरे दिले होते. आता तीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली जात आहे की काय, अशी धाकधूक भाजपच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे. राज्य भाजपमधील एक मोठा गट मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसला आहे. तर, मराठा आरक्षण, आंदोलने विचारात घेता मराठा चेहरा महाराष्ट्राला असावा या चर्चा आणि अफवांच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरिश महाजन यांची नावे विविध माध्यमांतून चर्चेला येत आहेत. मोहोळ यांनी समाज माध्यमातून आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारपासून रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने, अखेर चव्हाण यांना आपण दिल्लीत गेलेलो नाही आणि डोंबिवलीत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या सर्व गुप्त हालचालींचे सूत्रधार म्हणून रवींद्र चव्हाण यांनी पार पाडलेली जबाबदारी. कोकणासह, ठाणे, कोकणपट्टीवरील त्यांची हुकमत आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेथे जेथे जोरकसपणे प्रचार केला. तेथील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आले. ते चौथ्यादा निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्याचे राज्य कारभारतील महत्वाचे स्थान विचार घेता, जिल्ह्यावर आता भाजपची हुकमत वाढविण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत येत असावे, असे सांगत भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर मात्र, या सगळ्या अफवाच आहेत. दोन दिवसात खरे काय ते चित्र पुढे येईल, असे सांगितले. 0000

 ठाणे शहरात काँग्रेसला खिंडार!

कळवा येथील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश   ठाणे : शहरातील काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ आता, कळव्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कळवा पूर्व घोलई नगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले. भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणि भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला. काँग्रेस मध्ये असताना आमची कुठलीही कामे होत नव्हती, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर, सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल तसेच काँग्रेसच्या इतर काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यकारणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमिन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षला बुबेरा, कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते. 00000

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजिनामा

ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश…

 कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दीपोत्सव साजरा

 शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्या वर्षीही आयोजन   राज भंडारी पनवेल : पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर त्या त्या आकाराचे मातीचे दिवे ठेवत तब्बल ४१ हजारांहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत दीपोत्सव साजरा केला. सर्वप्रथम शाळेतील विद्येची देवता सरस्वती देवी आणि शिक्षण महर्षी तथा संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेसमोर शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्याहस्ते पूजन करून शाळेच्या मैदानात साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षी ११ हजार दिव्यांच्या रोषणाइमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ ५ मातीच्या पणत्यांच्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले, आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल ४१ हजार दिवे शाळेत जमा केले. यामध्ये संस्थेच्या वतीने ५०० लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव साजरा केला. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील शाळेत तब्बल ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अत्यंत कमी शुल्क आकारून शिक्षण विद्या देणाऱ्या या शाळेत ४ भाषांच्या शाळा सुरू आहेत. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील जवळपास ३५० इतकी आहे. गोरगरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची प्रतिभा डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब लिमये यांनी या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. ती आजही शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे जपत आहेत. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक श्रीम. पूनम कांबळे, श्रीम. अनिता पाटील, बाबुराव शिंदे, धर्मेंद्र दीक्षित, प्राथमिक विभाग प्रमुख श्री. पाटील, ज्यू. कॉलेज उपमुख्याध्यापक, संजय पाटील, अण्णासाहेब झिटे, कार्यालय प्रमुख बिना कडू, प्रसाद सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. कुलकर्णी, मराठी प्राथमिक विभागाचे मोकल आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन

युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.   अनिल ठाणेकर ठाणे : युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली. शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले. या बैठकीत युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये युवासेनाचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समुदायीक संपर्क मोहिम राबविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते.विशेषत: दुर्बल घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे. या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ००००

लोकसभा निवडणुकीत विजयोत्सव,तर विधानसभेत जनमत विरुद्ध गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा रडीचा डाव – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड यांची शॉर्टटर्म  मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. याचक  कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  २४ हजार दुबार मतदार आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. १२ हजार दुबार नावे ही १४४ कल्याण ग्रामीण मधील, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  मध्ये आहेत. हा सर्वप्रथम आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदविला होता. याच्याविरुद्ध आर ओ कडे तीन नावे वगळता येणार नाहीत यासाठी थयथयाट करायला कोण गेले होते ? याची शोधपत्रकारिता करावी, सीसी फूटेच तपासावे, याचे सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाहीय का ? की आपण एवढ्या मताधिक्याने कसा जिंकलो? याची शंका मनामध्ये आहे का ? आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्यातील जनतेने जो जनादेश दिला तो स्विकारलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे ईव्हीएम हॅक करुन त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी झालेत का ? अशाप्रकारची शंका आता त्यांच्या वर्तवणुकीवरुन येत आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत. ईव्हीएबाबत शंका असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम राजीनामा द्यावा पोटनिवडणूक आपोआप लागेल.  मग ही निवडणूक ईव्हीएम घ्यायची की बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल. जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम कसे हॅक होते हे प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला दाखवावे, पण त्यातुन हे देखील समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक करुन केला आहे, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकते.२८८ विधानसभा जागांपैकी २४ ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार वीवीपॅट मोजणीचा आग्रह केला आहे. याचा अर्थ ९० लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हेच यावरुन सिद्ध होते.आणि २४ ठिकाणी देखील रिकाउंटींग होईल तेव्हा त्यांना देखील विश्वास होईल की महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे.ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४ -२५ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी ही योजना कशी फेल होमार ? या योजनेला पैसे मिळणार नाहीत? तसेच या योजनेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखिल गेले. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ५ महिन्यांचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिबीटी ने गेले आणि ज्या महाविकास आघाडीने ह्या योजनेला विरोध केला, जे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर ३ हजार पैसे देऊ अशा प्रकारे खोटं देखिल बोलले गेले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने दीड हजार रुपयांना विरोध केला, हि योजना पुढे चालणार नाही असे वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात गेले. पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये ३००० रुपये माता भगीनींच्या खात्यामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारे ते खोटं बोलले. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी महाविकास आघाडीचा पराभव केला.  लाडकी बहीण योजना फेल करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टा मध्ये गेली, असे आनंद परांजपे म्हणाले. ०००