Month: March 2026

 ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ अनिल ठाणेकर ठाणे- इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३, मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई :९३२१५८७१४३/ ०२२-२२०२७९९०

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भारताकडे २५ दिवसच पुरेल इतका इंधनसाठा!

भारताकडे २५ दिवसच पुरेल इतका इंधनसाठा! नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभुमिवर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतात सध्या…

पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी

पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी आखाती देशातील ८ नेत्यांना फोन युद्धजन्य परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता नवी दिल्ली :  इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्ष दिवसागणित अधिक चिघळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील ८ नेत्यांना फोन करून या संघर्षाबाबत चर्चा केली आणि…

इथे मृत्यू ओशाळला…

इथे मृत्यू ओशाळला… इस्त्रालयने इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १५३ विद्यार्थिनींच्या अंत्ययात्रेत हजारोंनी सहभाग घेतला. तेहरान : इराणमधील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब प्रायमरी स्कूलवर शनिवारी अमेरिका-इस्रायली हवाई व क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.…

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था   मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता…

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी नैसर्गिक रंगांसहीत सहकुटुंब धुळीवंदन करीत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचे रंग सदैव खुलत राहो अशा शुभेच्छा दिल्या…तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण मुंबई : परखड, अभ्यासू आणि थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पहिल्याच लेखसंग्रहाचे लोकार्पण गुरुवार,…

 कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून विनायक कॉलनी येथे कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत विनायक कॉलनी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या परिसरात घंटागाडी नियमितपणे जाऊनही काही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा न करता सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी कचरा साठवून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपायुक्त रामदास कोकरे कडक भूमिका घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी समन्वय साधून कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपआयुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड व उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन सूर्वे, हितेश सोळंकी व अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, सानु वर्गीस, साहिल साठे, महेश बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एकूण १३ समजपत्रे देण्यात आली तसेच जागेवर एन.सी. नोंदी करण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ अनुषंगाने २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे. महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून निश्चित वेळेत घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा साचू देणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत अभियान व स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.