Author: bittambatami.com

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक ‘सलामी ‘ मुंबई -प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत…

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष रमेश औताडे मुंबई : रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळखले जात नाहीत. परिणामी कोट्यवधी विवाहित महिलांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. काळा घोडा कला महोत्सवात या अनंत साडीचे प्रदर्शन एल्फिन्स्टन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.

 कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!

कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा! नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या…

 राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी लागू केलेले नवीन नियम म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर लादलेला कायदा योग्य नसून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशनने केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रयोग थांबवावेत, असेही संघटनेने स्पष्ट केले. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अ‍ॅड. राहुल उपाध्याय आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनजी यांनी संयुक्त निवेदन जारी करून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी नियमांना जे माध्यमांमध्ये यूजीसी समानता / भेदभाव विरोधी नियम म्हणून ओळखले जात आहेत) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचा अर्थ असा की हे नवे नियम सध्या अंमलात आणता येणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार नाहीत. विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद न साधता घेतलेले निर्णय अस्वीकार्य असून त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला. संविधानाने दिलेले समान संधीचे अधिकार अबाधित ठेवावेत आणि उच्च शिक्षण क्षेत्राला राजकारणापासून पूर्णतः मुक्त ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यूजीसी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून त्यावर कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही ब्राह्मण सेवा फाउंडेशनने दिला आहे.

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी?

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टोकावडे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, एम. एच १४ – सि. पी ७3४७ या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले, धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे परवाना नसल्याचे समजले, तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नर कडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे. टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहे अशी माहिती मिळाली. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का? असा सवाल करत आदिवासी क्रांति सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मा . जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचे आमच्या दै, बित्तंबातमीचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन ८ फेब्रुवारी रोजी बोरीवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात  वित्तीय गुंतवणूकविषयक व्याख्यान तसेच ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ ‘ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.  विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञातीतील ज्येष्ठ बंधु-भगिनींचा सत्कार आणि कला – क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार अशी या सर्वसमावेशक कार्यक्रमाची रूपरेषा आहे.  वधू – वर सूचक मंडळांतर्गत नावनोंदणी तसेच संस्थेच्या नवीन सभासदांची नोंदणी याप्रसंगी करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनास सर्व ज्ञाती बंधु – भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली या संस्थेचे कार्यवाह उदय मथुरे, (९८२१०९९६०५) यांनी केले आहे.

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी

टिटवाळा मंदीर परीसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र कल्याण : टिटवाळा मंदिर परिसरातील नागरी, व्यवसायिक सुरक्षा व वाहतूक कोंडीच्या निवारणाकरिता कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापित करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरमार्फत करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस उपधीक्षक व कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी याबाबत चर्चा केली असता निवेदनानुसार तजवीज करणार असल्याचे आश्वासन महासंघाला देण्यात आले आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिटवाळा हे गाव महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केलेले असून, टिटवाळा हे महागणपतीचे प्रसिध्द तिर्थस्थान आहे. तेथे नियमीतपणे व विशेषतः मंगळवार, चतुर्थी व अंगारीका हया दिवशी हजारोंच्या संख्येने भावीक येत असतात व अनेकवेळा वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्व्यरूपी पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. टिटवाळा येथील महागणपती मंदिर परिसरातून मौजे गुरवली, रूंदा-फळेगाव व गोवेली या गावांकडे रस्ता जात असून या परीसरात अनेक गृहसंकुले असून, व्यावसायिक संकुले आहेत. हा परीसर नियमीतपणे वाहतुकीचा व वर्दळीचा असल्याने बाहेरूनही अनेकवेळा मालवाहतुक होत असते. तसेच अनेक गृहसंकुलनाकडे जाणा-या रस्त्यांवर आंधार पडल्यावर संशयीत फिरस्ते फिरत असतात. अनेक मद्यपी जागोजागी मद्यपान करतांना आढळून येतात त्यामुळे अंधार पडल्यावर या रहीवासी संकुलनातील महीला, वृध्द हयांना या रस्त्यावरून जाणे येणे भितीदायक होत असल्याच्या तकारी प्राप्त होत आहेत. तसेच वेळप्रसंगी चेनस्नॅचिंग, चोरी, घरपोडी व शरीराद्विरुध्दचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि परीस्थिती पहाता टिटवाळा येथील मंदीर परिसरात कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापीत करून त्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक होऊन कायमस्वरूपी विशेषतः रात्रीच्या वेळची गस्त घालणे सोयीस्कर होणार असून होणा-या गुन्हयांना आळा बसणार आहे. तरी कल्याण तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत टिटवाळा मंदीर परिसरात सोयीस्कर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन होऊन त्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात येऊन त्यांना रस्त्यांवर, गृहसंकुलनामध्ये रात्रीची गस्त घालण्याचे आदेश देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहरतर्फे करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी

ठाणे महापालिका कलावंत जपणारी-संदीप माळवी मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन ठाणे: ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुध्दा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी केले. ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच श्रुखंलेतील कवी संमेलन २७  जानेवारीला  कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून “न्यूजलेस कविता” असा  लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा.वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा अविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केल्या. गझल, हायकू, मुक्त छंद, वृत्तबध्द आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवींनी कवितेचा समृद्ध इतिहास ही या निमित्ताने उलगडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन हे कवी संमेलन संपन्न झाले. प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली “बा विठ्ठला” उपहासात्मक  कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली “सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू…” ही गझल… तर “हार नाही जीत नाही” “श्वास गझल..” या सुनील तांबे यांच्या तरनुम्म मधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. पंकज दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरुन गेले.

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

केडीएमसी मुख्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली कल्याण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या असह्य दुःखद प्रसंगी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत, अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची, जनतेसाठी केलेल्या कार्याची आणि संघर्षमय वाटचालीची आठवण यावेळी प्रत्येकाच्या मनात दाटून आली. दादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे दादा आपल्या आज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्ते वल्ली राजन यांनी दिली.