Author: bittambatami.com

काँग्रेसचे पळपुटे उमेदवार !

आधी सूरत आणि आता इंदौर. काँग्रेस पक्षापुढचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक करणाऱ्या दोन घटना गेल्या सात आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडून…

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…

चांदवडनजीक भीषण बस अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…

‘कातील पंजा’ तुमची कमाई लुटणार- मोदी

लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट…

होय ! माझा आत्मा अतृप्त आहे

शरद पवरांचा मोदींवर पलटवार शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते  मात्र, आता ते बोलत आहेत…

दहा माओवाद्यांना छत्तीसगडमध्ये खात्मा

छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा  माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह…

महाराष्ट्राची जनता गद्दारांना माफ करणार नाही- वर्षा गायकवाड

इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल. (छाया-संतोष नागवेकर) मुंबई: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे…

यामिनी जाधव दक्षिण मुंबई तर वायकर वायव्य मुंबईतून लढणार

शिंदे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा मुंबई : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले अभिवादन

रत्नागिरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उप जिल्हाधिकारी मारुती बोरकर, रोहयो उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनीही अभिवादन केले.

रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठाण्यात भाजपाची क्लस्टर बैठक

तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात सोमवारी तीन विधानसभा मतदारसंघांची क्लस्टर बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर्सबरोबर थेट संवाद साधून लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण जागेवर महायुतीच्या विजयासाठी रणनीती आखली जात आहे. त्यानुसार भाजपाकडून नियोजन केले जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मिरा भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुख व सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या संघटनात्मक स्थितीबरोबरच बूथनिहाय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. भाजपाच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयात भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे लोकसभा मतदारसंघ प्रमुख व माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे,  आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नरेंद्र मेहता, विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सुभाष काळे व मनोहर डुंबरे, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी संपर्क साधावा. आयुष्मान योजनेत ७० वर्षांवरील नागरिकांच्या सहभागासाठी फॉर्म भरून घेणे, ८५ वर्षांवरील मतदार व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करावी, लाभार्थींबरोबर संपर्क साधावा,आदी सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्या.