Author: bittambatami.com

ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

डोंबिवली : भारतीय रेल्वेचा १७१वा वाढदिवस मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने त्याचे आयोजन केले होते, ठाणे ते कर्जत रेल्वे स्थानक पर्यन्त शटल सेवा सोडण्यापर्यन्त शांत बसणार नाही असा निर्धार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी।केला. त्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया।दिली. सातत्याने नागरिकांनी मागणी करूनही रेल्वे प्रशासनावर त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकातील ऐतिहासिक रेल्वे इंजिन बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी १७१ वर्षांचा इतिहास माहितीपर लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच या इंजिनाची ख्याती सर्वदूर जाऊन त्या स्मृती अजरामर} राहण्यासाठी सेल्फी पॉईंट असावा अशी सुविधा रेल्वेने द्यावी अशीही मागणी देशमुख यांनी केली. १७१ वर्षे झाली परंतु दिवसाला सुमारे सरासरी १२ अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात जातो हे योग्य नाही, त्यामुळे ते अपघात शून्य प्रमाणात आणावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत सुधाकर पतंगराव यांनी व्यक्त केले. त्यावेळी स्थानक प्रबंधक केशव तायडे, समाजिक कार्यकर्ते शिवराम मिश्रा, किशोर बोन्द्रे आदींसह लोहमार्ग पोलीस, अरपीएफ जवान, प्रवासी आदी उपस्थित होते. भारतीय रेल्वेचा 171 वाढदिवस साजरा करीत असताना मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुसह्य आणि किमान गर्दीचा व्हावा अशा अपेक्षा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल प्रवाशांनी व्यक्त केल्या. यासाठी गेली 6 वर्षे रेल्वे बोर्डाकडे मंजुरी च्या प्रतिक्षेत असलेल्या बदलापूर व टिट वाळा लोकल 15 डबा चालविण्या च्या प्रकल्पाला  तात्काळ मंजुरी मिळावी व  सदर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा अशी महत्वाची  मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. तसेच वेळा पत्रक बदलताना निदान कल्याण  किंवा ठाणे स्थानकातून कर्जत व कसारा मार्गावर लोकल फेर्या वाढवाव्यात  अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. : मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी संस्था

मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका

मुंबई : मुंबईला एक्सडीआर टीबीचा वाढता धोका असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. मुंबईतील क्षय रुग्णांच्या नमुन्यांच्या केलेल्या संपूर्ण जीनोम सिक्वेसिंगमधून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. यात ६०० पैकी ५१ टक्के नमुन्यांमध्ये एक्सडीआर टीबी असल्याचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. हॅस्टॅक अॅनॅलिटिक्सने पालिकेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार टीबीसाठी देणाऱ्या चारपेक्षा जास्त औषधांचा टीबी रुग्णांवर परिणाम होत नसून हा एक्सडीआर टीबी तरुणांमध्ये सर्वाधिक पसरत आहे. कोविड काळात पालिकेने मुंबईसह इतर परिसरातील प्रामुख्याने ६०० एमडीआर टीबी रुग्णांचे नमुने गोळा केले होते. पालिकेने टीबीवरील उपचार देऊनही या रुग्णांवर औषधांचा परिणाम झाला नाही. दोनपेक्षा जास्त औषधे या रुग्णांवर वापरली; पण त्यांना फरक न पडल्याने हे रुग्ण एमडीआर म्हणजेच (मल्टी ड्रग रेसिस्टन्स) असल्याचे समजले. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या रुग्णांचे नमुने पालिकेने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले. या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालानुसार, ६०० पैकी ५१ टक्के रुग्णांमध्ये प्री-एक्सडीआर (एक्सटेंसिव ड्रग रेजिस्टेंट) संसर्ग झाला होता. ज्या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांचा फारसा परिणाम होत नाही, असे रुग्ण एक्सडीआर टीबी या श्रेणीत मोडतात. सामान्यपणे, टीबी रुग्णांवर वेगवेगळ्या १८ औषधांपासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. एमडीआर रुग्णांना दोन औषधांपासून तयार केलेले औषध दिले जाते; पण अनेकदा रुग्णांवर टीबीची काही औषधे प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे डॉक्टर वेगवेगळे फॉर्म्युल्यातून रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधे देतात. त्यानुसार ज्या रुग्णांना एमडीआर टीबी होता, त्या रुग्णांच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेंसिग केले गेले. या जीनोम सिंक्वेसिंगमधून रुग्णावर कोणती औषधे प्रतिसाद देतात आणि कोणती नाही, हेदेखील समजते. सद्यस्थितीत पालिका सी-डीएसटी म्हणजेच कल्चर डीएसटी ही चाचणी टीबी रुग्णांसाठी वापरत आहे. या तपासणीच्या अहवालासाठी किमान नऊ आठवडे लागतात. या चाचणीतून १२ ते १३ औषधांचा प्रतिसाद कळतो. काय सांगतात तज्ज्ञ? मुंबईत तरुणांमध्ये प्री- एक्सडीआर टीबीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या रुग्णांवर चारपेक्षा जास्त औषधांपासून तयार केलेले औषधही प्रतिसाद देत नाही. यापेक्षा जास्त तीव्र संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर आठ औषधांपासून तयार केलेले औषध काम करत नाही. या रुग्णांना बिडाक्युलिन, डेलामाईन ही औषधे द्यावी लागतात. जीनोम सिक्वेसिंग केलेल्या ६०० एमडीआर नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक ५१ टक्के लोकांमध्ये एक्सडीआर टीबीचा संसर्ग आढळला. विशेष म्हणजे त्यांना आधीपासूनच एक्सडीआरचा संसर्ग असल्याचा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात तरुण वयोगटात संसर्ग आढळला आहे. – अनिर्वन चॅटर्जी, प्रमुख अभ्यासक एमडीआर आणि जे रुग्ण औषधांना प्रतिसाद करत नव्हते, त्या टीबी रुग्णांचे नमुने दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी पाठवण्यात आले होते. सामान्य लोकांमधून नमुने घेण्यात आले नव्हते. याचा हा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती पालिकेने आता टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी पूर्ण क्षमतेने वापरायला हवी. जेणेकरून लवकर योग्य निदान होणे शक्य होईल. – डॉ. मंगला गोमारे, माजी कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

तुर्भे एपीएमसी मार्केटमध्ये 2.5 टन प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई

नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच एकल वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कंपनी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी अजित देशमुख व शशिकांत पाटील यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, सुषमा देवधर, योगेश पाटील उपस्थित होते. या कारवाईत जयेश कुमार अँड कंपनी यांचेकडून साधारणत: 2.5 टनाहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच संबंधितांकडून रू. 5 हजार व सरस फुड्स मार्ट, एपीएमसी मार्केट यांच्याकडून रुपये 5 हजार अशी एकूण रू. 10 हजार दंडात्मक शुल्क वसूली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा मोठ्या प्रमाणात जप्त केलेला प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे.

वनमाळी हॉल येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरमची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनमाळी वातानुकूलित हॉल, छबिलदास मार्ग, दादर-पश्चिम येथे दिनांक ४ ते ६ मे दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम खेळासाठी क्षात्रैक्य समाज, दादर, मुंबईचे योगदान फार मोठे असून एकेकाळी वनमाळी हॉलच्या स्पर्धेने हंगामाची सुरुवात होत असे. जवळपास महिनाभर चालणारी क्षत्रिय युनियन क्लबची स्पर्धा खेळाडू व क्रीडा रसिकांसाठी पर्वणी असे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या विशेष स्पर्धेने हंगामाची सुरुवात करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला असून क्षत्रिय युनियन क्लबनेही स्पर्धेसाठी आपला वातानुकूलित हॉल उपलब्ध करून दिला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत आपली नावे दिनांक २४ एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत. तर जिल्हा संघटनेने प्राप्त नावे दिनांक २५ एप्रिल २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिशनकडे पाठवावीत.

१६ एप्रिल१८५३ रोजी पहिली लोकल रेल्वे मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावल. या घटनेला १७१वर्ष पूर्ण झाले असून प्रवासी संघटना आणि रेल्वे कर्मचारी यांनी केक कापून हा क्षण साजरा केला. (छाया-प्रफुल गांगुर्डे)

विकासाच्या वाटेतले अडथळे

परामर्ष हेमंत देसाई राष्ट्रीय सािं‘यकी कार्यालयाने चालू वर्षात आर्थिक विकासाचा दर ७.६ टक्के असेल, असे म्हटले असले तरी अर्थमंत्र्यांना आठ टक्क्यांच्या पुढे असेल, असे वाटते. देशाला ‘समृद्ध भारता’च्या दिशेने घेऊन…

सत्ताधारी टिकेच्या केंद्रस्थानी

पैलू भागा वरखडे लोकशाही मूल्यांचे नीट पालन न होणे, विविध शासकीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप, दंडेलशाही आकार घेणे हे टाळण्यासाठी देशात सक्षम विरोधी पक्ष असायला हवा. मात्र आज देशात तशी परिस्थिती नसून…

तुमचे पक्ष फोडण्याची संधी भाजपला तुम्हीच दिली ना…!

भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले असा आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच करत असतात. काल भंडारा येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अमित…

राज्यात यावर्षी १०६ टक्के पाऊस !

मुंबई : एल-निनाेचा प्रभाव ओसरून ‘ला-निना’च्या प्रभावाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागानेही साेमवारी चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ही…