Author: bittambatami.com

कल्याण-डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ३६० कोटींची २४ कॉँक्रीट   रस्त्यांची आणि पालिकेतर्फे सात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा आणि प्रवाशांना पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होणार नाही असे नियोजन करा, असे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका, एमएमआरडीए अधिकाऱ्यांंना पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएची सर्वाधिक कामे पालिका हद्दीत सुरू आहेत. ही कामे करताना अनेक वेळा प्रवाशांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नोकरदार वर्ग, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता सुरू असलेली काँँक्रीट रस्ते कामे, इतर रुंदीकरणाची कामे लवकर पूर्ण करा, असे आदेश आयुक्त डॉ.जाखड यांनी अधिकाऱ्यांना दिले. टिटवाळा ते हेदुटणे बाह्य वळण रस्ते मार्गातील दुर्गाडी किल्ला, गोविंदीवाडी ते मोठागाव या तिसऱ्या टप्याच्या कामातील भूसंपादन आणि अतिक्रमणे, इतर अडथळे दूर करून हे काम गतीने सुरू करा. पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. महानगर गॅसला सूचना महानगर गॅसकडून डोंबिवलीत विविध भागात वाहिनीव्दारे गॅस पुरवठा करण्यासाठी सोसायट्यांमध्ये वाहिका टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना महानगर गॅसचा ठेकेदार मनमानेल तशी खोदाई करतो. सोसायटी आवारात वाहिका टाकण्यासाठी केलेले खोदकाम, तोडकाम सुस्थितीत न करता निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेत दाखल झाल्या आहेत. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठेकेदाराला ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना करावी, असे आयुक्तांनी सूचित केले. रोहित्र स्थलांतर, मल, जल निस्सारणाची शहराच्या विविध भागात सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणतेही काम सुरू राहणार नाही याची काळजी घ्या, असे आयुक्त जाखड यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंंता अर्जुन कोरगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, पालिकेचे कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे, जगदिश कोरे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, उपायुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, साहाय्यक आयुक्त, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते. पालिका हद्दीत सुरू असलेली, प्रस्तावित असलेली सर्व काँक्रीट रस्ते कामे आणि इतर विभागांची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्वी पूर्ण करा. पावसाळ्यात प्रवाशांना या कामांंमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर यांच्याकडून स्वागत

अशोक गायकवाड रत्नागिरी : लोकसभा निवडणूक – २०२४, निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याकडून स्वागत ४६- रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल…

 ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा – छायादेवी शिसोदे

जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे : जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिकदृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जल जोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी भिवंडी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत काम पूर्ण करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. अनगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिक दृष्ट्या पुर्ण झाले असून मुंबई महानगर महापालिका यांच्या मार्फत जलजोडणी झाल्यावर येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल अशाप्रकारे कामकाज करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे व उप अभियंता पापू सासे यांना सुचना दिल्या. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. कामकाज तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थितींना दिल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामे पहाणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर प्लान्टला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. तसेच वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्व नियोजन करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यात्रेत स्वच्छ्ता, पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सोयीसुविधा बाबत पोलिस निरीक्षक गणेशपुरी धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक व कमिटी सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे भेट देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधाची प्रत्यक्ष पाहणी करून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे असे मार्गदर्शन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी देखील करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता पापू सासे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी ठोंबरे, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, पंचायत समिती भिवंडी येथील अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू – किशन जावळे

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

मातीच्या मडक्यांना अच्छे दिन

वाढत्या गरमीमुळे माठाला अधिक पसंती वडखळ : मागील दोन आठवड्यांपासून वातावरणात वाढत असलेल्या गरमीमुळे अनेकांनी बचावात्मक पवित्रा घेत अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रीजऐवजी…

‘संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा’

शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला मुंबई : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, वस्तू सेवा कर, राम मंदिर…

उल्हासनगर महापालिकेने केली प्लास्टिक कारखान्यावर कारवाई,

९ मॅट्रिक टन प्लास्टिक जप्त उल्हासनगर : उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक चे उत्पादन सुरु असुन बिनधास्तपणे प्लास्टिक च्या पिशव्या दुकानदार ठेवत आहेत. ही माहीती अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच…

‘पाणी नाही तर मतदान नाही’

रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा…! कल्याण : कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याची टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात ही समस्या जास्तच तीव्र झाली आहे. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील…

हाफकिनकडून आणखी १६ औषधांचे उत्पादन!

मुंबई : राज्य सरकारने हाफकिनला आणखी १६ औषधांची निर्मिती करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, हाफकिन निर्मिती करीत असलेल्या औषधांची संख्या २५ हून अधिक होणार आहे. हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळ निर्मिती…

पक्षाने संधी दिली तर लढणार-संजय केळकर

ठाणे : ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप कडून या जागेवर…