Author: bittambatami.com

मुंबईत कचरा करणाऱ्यांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीने दंड वसुलीच्या कारवाईच्या पहिल्या दिवशी ७२ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत महानगरपालिका प्रशासनाकडून तंत्रज्ञानाचा…

महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला!

 मार्चअखेरपर्यंत ५४७१ पैकी ४३३२ प्रकल्प मंजूर! मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल ठाणे (५९७), मुंबई उपनगर (५२८), रायगड (४५०), नागपूर (३३६), नाशिक (३१०) आदींचा समावेश आहे. राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची संख्या १९७६ अशी सर्वात जास्त आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील १४१५ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील ४३७ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे ३३६ प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३४७ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे ३१० प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील १४९ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात औरंगाबादचे ११७ नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही आठ प्रकल्प आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद््भवू नये यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणी क्रमांक मंजूर करते. याशिवाय कल्याण-डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी क्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून ‘बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र’ त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर पाठवणे बंधनकारक केले आहे. महारेराने गेल्या १९ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही. सुरूवातीच्या तुलनेत यात सुसूत्रता आलेली असली तरी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले मंजुरीचे इमेल मिळण्यात काही प्रमाणात होणारा विलंब आणि प्रस्तावातील त्रुटींची संबंधित विकासकाकडून पूर्तता होऊ न शकल्याने ५४७१ प्रकल्पांपैकी ४३३२ प्रकल्पांना नोंदणीक् क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ११३९ प्रकल्पांची छाननी सुरू आहे. संबंधित विकासकांनी त्रुटींचा पूर्तता केल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे महारेराच्या प्रवक्त्याने सांगितले.

 धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांची उमेदवारी

 प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा… मुंबई : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून  अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला

मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल…

 पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप

आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी कल्याण :कल्याण मधील पत्रीपूल ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यानच्या रहेजा गृहसंकुला समोरील काँक्रीट रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या आठवड्यापासून सुरू केले आहे. या रस्ते कामामुळे एका मार्गिकेतून पत्रीपूल भागात वाहतूक होत असल्याने या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. तीन वर्षापूर्वी पत्रीपुलाच्या नवीन उभारणीचे काम सुरू असताना नागरिक दीड वर्ष या भागात वाहतूक कोंडीत अडकत होते. हा त्रास पूल उभारणीनंतर संपला. गेल्या आठवड्यापासून पत्रीपूल ते रहेजा संकुलालगतचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे पत्रीपुलावरून वाहतूक एका मार्गिकेतून होत आहे. वाहनांचा चारही बाजुने भडीमार आणि एक मार्गिका यामुळे पत्रीपूल भागात दररोज एक ते दीड तास वाहतूक कोंडी होत आहे. दिवस, रात्र हा भाग कोंडीत अडकत असल्याने नागरिकांनी शिळफाटा, कल्याण पूर्व भागातून इच्छित स्थळी जाणे पसंत केले आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाणारे प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. शिळफाटा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडे आहे. या यंत्रणेने भिवंंडी वळण रस्ता, कोन ते दुर्गाडी ते शिळफाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पत्रीपुलाजवळील काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवून काम करावे लागणार असल्याने या कामाला वाहतूक विभागाकडून सण, उत्सव, परीक्षांचा हंगाम विचारात घेऊन लवकर परवानगी दिली जात नव्हती. गेल्या वर्षापासून हे काम रखडलेले आहे. येत्या पावसाळ्यात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता असल्याने एमएसआरडीसीने घाईने हे काम हाती घेतले आहे. शिळफाटा रस्त्याने, डोंबिवलीतून, कल्याण पूर्वेतून येणारी वाहने पत्रीपुलावरून कल्याणमध्ये प्रवेश करताना रहेजा संकुला लगतची रस्त्याची उजवी बाजू खोदण्यात आली आहे. ही वाहने एका मार्गिकेतून कल्याणमध्ये किंवा गोविंदवाडी दिशेने निघून जातात. वाहतूक सुरू असताना पोलीस दुर्गाडी किल्ला दिशेने पत्रीपूलमार्गे शिळफाटा, डोंबिवलीत जाणारी वाहने रोखून धरतात. ही वाहने सुमारे अर्धा ते पाऊण तास अनेक वेळा रोखल्याने दुर्गाडी किल्ला दिशेने वाहनांच्या रांगा लागतात. गोविंदवाडी वळण रस्त्याची पत्रीपुलकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी सुरू केली की शिळफाटा रस्त्याने कल्याणकडे येणारी वाहतूक रोखून धरली जाते. शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या अधिक असल्याने या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी दररोज होत आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. १५ ते २० वाहतूक पोलीस, सेवकांचा ताफा याठिकाणी तैनात असतो. रुग्णवाहिका, शालेय बस यांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम भागातील अनेक विदयार्थी खासगी वाहने, शालेय बस मधून पूर्व, पश्चिमेतील शाळांमध्ये जातात. त्यांची या कोंडीने सर्वाधिक कोंडी केली आहे. आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यात ही कोंडी सुरू झाल्याने पालक वर्ग अस्वस्थ आहे.

ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारणार

  ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल मुंबई : ठाण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) एकमेव स्वारस्य निविदा सादर झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा विकास करण्यासाठी ठाण्यातील ५० एकर जागा एमसीएला देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास ठाण्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येईल. एमएसआरडीसीच्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या जागा निविदा प्रक्रियेअंतर्गत विविध खासगी संस्था, कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावरील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. भिवंडीतील वडपे गावापासून ५ किमी अंतरावर ही जागा असून सध्या ही जागा एमएसआरडीसीच्या ताब्यात आहे. क्रिकेट मैदानासाठी राखीव असलेली ही जागा विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर २०२३ मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकासित करण्यासाठी इच्छुक संबंधित संस्थेचा अनुभव, त्यांचे किती खेडाळू राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत. सदस्य संख्या आदी बाबींची पडताळणी करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारीत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत एकमेव एमसीएने स्वारस्य दाखवत अर्ज सादर केल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमसीएच्या निविदेची छाननी करून एमएसआरडीसीने ५० एकरचा भूखंड एमसीएला देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास हा भूखंड एमसीएकडे हस्तांतरित करण्यात येणार असून एमसीए या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकसित करणार आहे. आचारसंहितेनंतरच या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे मैदान विकसित झाल्यास ठाण्याला पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होणार आहे.

रंगीबेरंगी गुढ्यांनी बाजारपेठा सजल्या

डोंबिवली : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला नवउपक्रम, संकल्पांनी सुरुवात केली जाते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. डोंबिवलीतील बाजार गुढीपाडव्याचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठीची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच रेडिमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या तसेच ड्रायफ्रुट असलेल्या साखरगाठींनी दुकाने सजली आहेत. गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरल्याने साखरगाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने शहरातील अनेक मंडळे तयारीत व्यस्त आहेत. डोंबिवलीतील दुकाने साहित्यांनी सजली असून नऊ इंचाची रेडिमेड गुढी १०० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची रेडिमेड गुढी १५० रुपयांपासून मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार ९०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंगाच्या साखरगाठी २० रुपये ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, घर, दागिने, मोबाईल इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे नागरिक आकर्षित करण्यासाठी शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवल्या आहेत. पूजेसाठी अन् लहान आकारातील तयार गुढ्या, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स, गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र, अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची खरेदी होत आहे. यंदा लहान आकारातील तयार गुढ्यांना सर्वाधिक मागणी आहे, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. मोठ्या आकारातील तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत असून, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, असे गुढी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे. गृहखरेदीसाठी सवलती साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत. रेडिमेड साडीला पसंती गुढपाडव्यासाठी रेडिमेड गुढीचे वस्त्र बाजारात उपलब्ध झाले आहेत. रेडिमेड गुढीच्या वस्त्रांना महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणी, जरीकाठ, रेशन काठ, खाण-काठाची रेडिमेड साडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. १०० ते ८०० रुपयांपर्यंतच्या गुढी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेडिमेड गुढी विदेशात विक्रीसाठी पाठवल्या आहेत. – रोहित प्रसाद, डोंबिवली गुढ्या तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यंदा गुढीच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. – सुमित कदम, डोंबिवली

आता भाजपचा मनमानी कारभार उघडा पाडणार

रमेश औताडे मुंबई : राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडले कारण इडी कडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही असेच घडणार आहे. भाजपचा मनमानी कारभार आता उघडा पाडणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी धनराज वंजारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारताची लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाचे प्राण हे ईव्हीएम मशीन मध्ये आहे परंतु त्याचा आत्मा आता जनतेकडे असेल. त्यामुळे भाजपाचा ४०० पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे. न्यायालयाने आता इलेक्ट्रॉल बाँड ची तपासणी करणे गरजेचे आहे कारण एक्सटॉर्शन चे रॅकेट हे भाजपाच्या माध्यमातून ईडी चालवत आहे.  खंडणीच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी भाजपाने विविध कंपन्यांना धमकावून जमा केला आहे असा आरोप धनराज वंजारी यांनी केला आहे. भाजपाने आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून पक्षातील इतर आमदार व खासदारांना धमकावून भाजपाकडे खेचण्याचे षड्यंत्र केले होते. परंतु आम आदमी पक्षात सर्व देशभक्त व क्रांतिकारी लोक आहेत आम्ही सर्व भगतसिंगाचे चेले आहोत. देशहितासाठी जेल काय फाशी घेण्यास सुद्धा तयार आहोत. आणि त्यामुळेच भाजपाचा डाव फसला आहे .आज देशात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला घाबरत असतील तर फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांना  घाबरतात हे आता स्पष्ट झाले आहे. असे धनराज वंजारी यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झाला आहे आणि सर्व भ्रष्टाचारीना सोबत घेऊन नरेंद्र मोदी आमच्या पार्टी विरुद्ध कारवाई करत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.  तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत ४००  पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे असे ऍड.संदीप कटके यांनी यावेळी सांगितले. संजय सिंग यांना सहा महिने जेलमध्ये फक्त यामुळेच ठेवण्यात आले की त्यांनी त्यांचा आवाज लोकांमध्ये भाजपाच्या विरुद्ध उचलला. भाजपा हा आमच्या पार्टीच्या नेत्यांना किती घाबरते हे आज सिद्ध झाले आहे. आम आदमी पार्टीचे बाकीचे नेतेही पुढच्या काळामध्ये निर्दोष बाहेर येतील यामध्ये कुठलीही शंका नाही. असे यावेळी ऍड संदीप कटके यांनी सांगितले.

ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाचे के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.रुपेश यशवंत महाडीक यांना कोकण ग्राम विकास संस्थेतर्फे “आदर्श अध्यापक पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गप्पागोष्टीकार जयंत ओक यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ.महेश बेडेकर विश्वासाने तसेच प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक रुपेश महाडीक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण,सोबतच सेट, नेट आणि एलएलबीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विद्यार्थीप्रिय पण त्याचसोबत शिस्तप्रिय असणारे प्रा.रुपेश महाडीक हे मागील १४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अनेक स्पर्धा उपक्रमांमध्ये आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य,नाटक,पथनाट्य,वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी उत्तम यश प्राप्त केले.मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ या कार्यक्रमात महाडीक सरांनी लेखन ,दिग्दर्शिन आणि अभिनय केलेल्या स्किटला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते.अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याचसोबत नावाजलेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तम मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे नाते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण,संकट असो,त्यांना हमखास मार्गदर्शन मिळेल या विश्वासाने अनेक विद्यार्थ्यांनी सरांकडे धाव घ्यावी आणि अगदी गोवर्धन करंगळीवर लीलया उचलावा तसे विद्यार्थ्यांना संकटातून,समस्येतून मार्ग सहज दाखवावा अशा प्रकारचे भावबंध त्यांचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा,कुटुंब-समाज यांचा समतोल राखत उत्तुंग यश प्राप्त करावे,आत्मविश्वासाने,संयमाने परिस्थितीवर मात करत माणूस म्हणून चांगले आयुष्य जगावे,त्याचसोबत मैत्रीचे जीवनातील महत्त्व, अशा अनेक गोष्टींचे सिंचन विद्यार्थ्यानमध्ये करत आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सर अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत.

आधुनिक अनाजी पंतांनी आमचं घर फोडलं- रोहित पवार

बुलढाणा : संतांच्या आणि छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज यांच्या काळात ही अनाजी पंत सक्रिय होते आणि आजही आहे. आधुनिक अनाजी पंतांनी आमचंही घर फोडलं, तीनचार पवार तिकडे गेले. मात्र,त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार…