Author: bittambatami.com

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ अशोक गायकवाड नवी मुंबई : विकासाची ध्येय- रणे ठरविण्यासाठी जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्वाची असून हे काम काळजीपूर्वक व बिनचूक करावे असे महापालिका…

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना ठाणे :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ११६०१ अर्थात ४३४० च्या शहापूर तालुका अध्यक्ष पदावर लक्ष्मण महाळुंगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी माधुरी राठोड, सचिव पदावर संजय पोंढेकर,यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष महेश बागराव व शशिकांत सपाट, खजिनदार पुनम भेरे,सहसचिव रविंद्र पवार, प्रसिद्धी प्रमुख  निलेश विशे, संपर्क प्रमुख पद्माकर राठोड व विकास मेतकर, सल्लागार रमेश लोभी,चित्रा जगताप व अलका चव्हाण,संघटक सदानंद सोनारे, यांची निवड करण्यात आली.शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एच.राठोड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनचे जिल्हा अध्यक्ष गजानन विशे तसेच सहायक.प्रशासन अधिकारी अजय भोंडिवले यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली शहापूर पंचायत समितीच्या या नव्या  कार्यकारणीची निवड ही सर्वानुमते करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समिती शहापूरचे कर्मचारी उपस्थित होते.कर्मचा-यांच्या वेतनत्रुटी तसेच पदोन्नती स्तर कमी करणेकरिता जिल्हा तसेच राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांचे हे जिव्हाळयाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी सांगितले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

 सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत एकूण १,००,०००रकमेची पारितोषिके पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.” स्पर्धेत एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा ७,१०,१२,१५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून १७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ५० रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०) व दिक्षा गडसिंग(७८३७८३०४०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषेचे प्राचीनत्व’ (मराठी भाषेच्या जन्मापासून आजवरची स्थित्यंतरे) या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळे, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका, तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे बदलते स्वरूप यांचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे  आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत.मराठी भाषेचा उगम, तिचे संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेले नाते, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतील उल्लेख, तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळे भाषेला लाभलेले वैभव यावरही ते प्रकाश टाकणार आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे.जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

अंमलबजावणी थंड!

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अंमलबजावणी थंड! मुंबई : मुंबईतील काही मोजक्या  क्रीडा संघटक कार्यकर्त्यांनी केंद्रात नव्याने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय क्रीडाप्रेमी क्रीडामंत्री यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यावेळचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून  खेळांच्या क्रीडा संघटना संदर्भात त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीबाबत त्यावेळी पत्रव्यवहार चालू केला. केंद्राला लक्षात आले की, या कार्यपद्धतीमुळे क्रीडा संस्कृतीच्या विकासाला पायबंद बसतो आहे.याच दरम्यान पासून   त्वरित विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांसाठी   सुधारित नियमांवलींची  प्रक्रिया करण्यासाठीचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होऊ लागला. बराच कालावधी लागला पण आता याला चांगलं यश प्राप्त झालं. या गोष्टींचा आम्हा क्रीडा संघटकांना आनंद होत आहे.याची अंमलबजावणी आता नव्या वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. विविध खेळांच्या विविध स्तरांवरील क्रीडा संघटनां वरील  क्रीडा कार्यकर्ते वर्षानुवर्षे विविध पदांवर राहून वरिष्ठ क्रीडा संघटनांवर हक्क आणि अधिकार गाजवून मनमानी कारभार आजही करीत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मनमानी कार्यपद्धतीला अधिकृतपणे पायबंद बसावा हा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता. विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांच्या या कार्यपद्धतीबद्दल मी वैयक्तीक स्वरूपात विविध वर्तमानपत्रे,साप्ताहिके, मासिके,दिवाळी अंक व अन्य माध्यमातून  याच विषयावर भरपूर लिखाण गेली दशकाहून अधिक काळ केलेले आहे.त्याचाच हा परिणाम असल्याने प्रसिद्ध माध्यमांना देखील धन्यवाद देत आहे.माझ्या इतके विस्तृत स्वरूपात लिखाण  कुणीच केलेले नाही. केंद्र सरकारने क्रीडा प्रशासनात सुधारित नियमांना चालना देणारा कायदा लागू होत असताना माझ्या विविध महत्वाच्या  सूचनांचा विचार  केला गेला याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.आता क्रीडाक्षेत्राला भविष्यात विविध स्तरांवर सुवर्ण दिवस येतील. विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांच्या अंदाधुंदी कारभारावर अंकुश ठेवणारा हा कायदा आहे.परंतु याची अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे व पारदर्शक होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे क्रीडाक्षेत्रात चांगलेच स्वागत होत आहे. असं  जरी असले तरी महाराष्ट्र शासनाच्या धर्मदाय आयुक्ताकडून मात्र क्रीडा संघटनेच्या जुन्या तक्रारीबद्दल नव्याने कायदा होऊनही आजही नव्या वर्षात वाटण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत. ही मंडळी झोपेचे सोंग घेऊन बसलेली आहेत. केंद्राच्या या नियमांचे कायद्यात रूपांतर झाले तरी येथील म्हणजे राज्यातील  दावे एकतर्फी न्यायाने यावर निर्णय होणे आवश्यक आहे. असं असूनही ते तारखा देणे याच कामात आजही मग्न आहेत.  आता तर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार क्रीडा संघटनांच्या तक्रारीचा निकाल देणे सहज शक्य झालेले आहे.यानुसार नव्याने निवडणुका घेणे शक्य होणारे आहे. असं  सारं असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. तारीख वर तारीख देऊन या क्रीडा संघटनांना बेकायदेशीर रित्या पाठिंबा देत असतात. परंतु ही मंडळी आपल्या डोळ्यावर पट्टी ठेवून गप्प  बसलेली दिसतात. या अशा कृतीमुळे ही मंडळी महाराष्ट्र शासनाची देखील डोळेझाख  करून क्रीडा संघटनांना अनुदाने देण्यास भाग पाडतात. आता राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार  क्रीडा संघटनांच्या कार्यकारणी अधिकृतरित्या बरखास्त नक्कीच करू शकतात. महाराष्ट्रात राज्य शासनाच्या क्रीडा व न्याय व विधी खात्यांच्यावतीने धर्मादाय आयुक्तांना कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडावे. आवश्यक असेल तेथे या क्रीडा संघटनांची कार्यकारिणी बरखास्त करून केंद्र सरकारने नेमलेल्या समितीच्या सदस्यांना प्रशासकीय नेमणूक करून नव्याने झालेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार कार्यकारिणीची निवड ठराविक मुदतीत त्वरित करण्यात यावी. विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि देशातील विविध स्तरांवरील विविध क्रीडा संघटनांवरील  भांडण, तंटा , वाद आदींवर तोडगा काढण्यासाठी प्रस्तापित राष्ट्रीय क्रीडा लवाद यांची  नेमणूक करून त्याची प्रत्यक्षात कायदेशीर अंमलबजावणी दिनांक १ जानेवारी २०२६ पासून सुरुवात करण्यास मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय , ऑलिंपिक, राष्ट्रीय  पॅरालिम्पिक, देशातील राष्ट्रीय,राज्य,जिल्हा क्रीडा संघटना या आता राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या अंतर्गत यांना कार्यपद्धत राबवावी लागणार. वरिष्ठ क्रीडा संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांना संलग्नता देताना यांना या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याचे  पालन करणे बंधनकारक असेल. आता या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी व्यवस्थापक मंडळ सदस्य मर्यादा एकूण १५ सदस्यांची राहील. मात्र ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकच्या जागतिक ऑलिम्पिक हिंवाळी, ऑलिम्पिक खेळाडूंच्या निवडणूक निवडीसाठी स्वतंत्र नियमावली आहे. राष्ट्रीय स्तरांवरील क्रीडा संघटनांवर प्रतिनिधी पाठविण्यासाठी पुरुष व महिलांना समान संधी देणे बंधनकारक आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील अध्यक्षांची निवड केंद्र सरकार करणार. या अध्यक्षांना सार्वजनिक आणि क्रीडा प्रशासना बरोबरच क्रीडा विषयक कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींची निवड करतील. केंद्र सरकारची समिती वरिष्ठ क्रीडा संघटनांना संलग्न मान्यता देताना त्यांच्या अर्थिक कारभारावर लक्ष ठेवीत असताना त्यांना दंड आकारण्याचा अधिकार असेल.या समितीचे सदस्य ६५ वर्षाच्या वयाच्या आतील असतील. यांची नियुक्ती फक्त दोन टर्म साठी   असणार. राष्ट्रीय क्रीडा लवादानांतील सदस्यांची मुदत चार वर्षांची असेल. मात्र यांच्या वयाची मर्यादा ६७ वर्षांची असेल. शिवाय केंद्र सरकारच्या या सर्व राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याचे चोख पालन करण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक पॅनल स्थापन केले जाईल आणि तेच राष्ट्रीय व राज्य संघटनांच्या निवडणुकीत उपस्थित असतील. कोणत्याही स्तरांवरील क्रीडा संघटना बरखास्त करण्याचा अधिकार हा कुणाकडे असावा याचा कुठेही उल्लेख नाही. न्यासाच्या नियमानुसार हा अधिकार त्याच नोंदणीकृत संघटनेस असतो. हा अधिकार राज्य संघटनेस नसावा.कारण ते या अधिकाराचा वापर निवडणुकीसाठी मनमानी पद्धतीने करतात.  यासाठी शासकीय समितीकडे हा अधिकार असावा. विविध खेळांच्या विविध स्तरांवरील क्रीडा संघटनांची व्यवस्थापकीय कार्यकारिणी ही १५ सदस्यांचीच असेल. त्यात कमीतकमी २ राष्ट्रीय अथवा क्रीडा पुरस्कार पटू असतील व कमीतकमी ४ महिला सदस्यांचा समावेश असेल. या व्यवस्थापक कार्यकारिणीत कमीतकमी २५% संख्या ही खेळाडूंची असेल.यांचा कालावधी चार वर्षाचा असेल.जे शासकीय अथवा निमशासकीय सभासद कार्यकारिणीत सेवा देऊ इच्छित असतील तर त्यांना त्यांच्या नोकरीतील  आस्थापनेतील  प्रमुख व्यवस्थापनाकडून निवडणूकपूर्व संमती पत्र सादर करणे बंधनकारक राहील. अध्यक्षांचा कालावधी हा जास्तीतजास्त सलग १२ वर्षे असेल अथवा या कालावधीत एक टर्म खंड पडला किंवा नसला तरी चालू शकतो. सचिव व खजिनदार (कोषाध्यक्ष) हे सतत दोन टर्म (एक टर्म चार वर्षाची राहील.) पदावर राहू शकतात किंवा एक टर्म (चार वर्षाचा) खंड घेऊन पुन्हा सुद्धा पदावर राहू शकतात.परंतु एकूण आठ वर्षे पदावर राहिल्यावर एक टर्म खंड किंवा विश्रांती घेणे बंधनकारक असेल.नंतर या पदांवर पुन्हा येऊ शकतात. मात्र वयाच्या ७० व्या वर्षी व्यवस्थापक मंडळ   कार्यकारिणीचे सदस्य आपोआप  निवृत्ती होतील. निवडणूक प्रक्रिया आणि पदाधिकारी यांची पात्रता ही केंद्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अन्वयेच्या तरतूदीनुसार असेल. विविध खेळांच्या भारतीय महासंघांशी असलेली आपली  संलग्नता कायम राखण्यासाठी संलग्न राज्य तसेच जिल्हा क्रीडा संघटनांनीही आपल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ नुसार घटना नियमावलीत बदल करणे बंधनकारक राहील.   (१) वय फसवणूक ( वय चोरणे) प्रतिबंध ही तरतूद युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ,भारत सरकार यांच्यानुसार कायद्याचे बंधन राहील.  (२) कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध,मनाई आणि निवारण २०१३ नुसार यासाठी स्वतंत्र समिती नेमून लैंगिक स्वरूपाचे वर्तन रोखणे, त्यावर बंदी घालणं आणि पीडितांना संरक्षण देणे व आवश्यक तेव्हा योग्य निर्णय वेळेवर घेणे.  (३) डोपिंग विरोधी उपाय योजना व प्रतिबंध ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे राहून त्याचे पालन करणे भाग राहील. (४) माहितीचा अधिकार अधिनियम २००५  अंतर्गत कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याकरिता आवश्यक ती माहिती ३० दिवसाच्या आत देण्यासंदर्भात ती बंधनकारक राहील. संघटनांनी वरील सारे घटना व नियमावलीत  बदल न केल्यास राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा अन्वये राज्य, जिल्हा आणि राज्य निवडणूक मतदान  अधिकार व हक्क गमावून बसतील. या साऱ्या गोष्टींच्या  तरतुदी घटना नियमावलीत नसतील तर क्रीडाक्षेत्रात  गैरवर्तणुकीला उत्तेजन मिळू  शकेल ! म्हणूनच केंद्राने जे कायदे केले आहेत ते सारे कायदे केंद्र सरकारने पाळण्याचे बंधन क्रीडा संघटनांना ठेवले आहे. भविष्यात देशात अथवा राज्यांतून ,राष्ट्रीय,आंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धा,एशियन स्पर्धा आणि ऑलिम्पिक आदी सारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असताना अथवा होताना सहभागी खेळाडूंचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. विविध खेळांच्या वरिष्ठ क्रीडा संघटनांना येथे अधिकृत असणं फारच गरजेचे असणार आहे. यामुळे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ चे पालन करणाऱ्या संघटनांना अधिकृतरित्या मान्यता लाभणार आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्या संघटनांच्या कार्यकारिणीला त्यांचे अधिकार व हक्क गमावून बसावे लागतील! याची काळजी घेण्याची आवश्यकता विविध खेळांच्या क्रीडा संघटनांच्या क्रीडा संघटनांवर असेल! मनोहर आ.साळवी शिव छत्रपती पुरस्कार विजेते. क्रीडा संघटक

माझी मराठीची बोलू कौतुके… परी अमृतातही पैजा जिंके…..

मराठी ही आपली मातृभाषा आहे तसेच ती महाराष्ट्राची राज्यभाषाही आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शैलीदार लेखणीतून ज्यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर…

सावरकर मुस्लीमविरोधी व जातीयवादी नव्हतेच!

माझे रत्नागिरी येथील ९६ वर्षाचे वयोमान असलेले ज्येष्ठ मित्र बाळ पाटणकर यांच्याशी आज सकाळीच बोलणे झाले. आवाज अत्यंत खणखणीत आणि आत्मियतेचे बोलणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ठ्य आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया…

संबंधांचा नवा टप्पा

संबंधांचा नवा टप्पा 17 वर्षांनंतर ब्रिटनमधून परतल्यानंतर खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रहमान यांचे ढाक्यात जंगी स्वागत झाले. आता तेच पक्षाला ऊर्जितावस्थेत नेतील, हा विश्वास सार्थ ठरला आहे. बांगलादेशच्या जनतेने…

 स्विफ्ट कारमधून अवैध मद्याची तस्करी

स्विफ्ट कारमधून अवैध मद्याची तस्करी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नऊ लाखांचा ऐवज जप्त योगेश चांदेकर पालघरः दादरा नगर हवेली व दीव दमण परिसरात विक्रीसाठी असलेले स्वस्त दरातील मद्य महाराष्ट्रात आणून ते विकण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील पथकाने तसेच पालघरच्या भरारी पथकाने उघडकीस आणून मारुती स्विफ्ट कारसह आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला. पालघर हा दादरा नगर हवेली व दीव दमणला लागून असलेला जिल्हा आहे. या दोन केंद्रशासित प्रदेशात मद्यावर सीमाशुल्क अतिशय कमी असते. त्यामुळे हे मद्य स्वस्त पडते. सीमाशुल्क चुकवून असे मद्य महाराष्ट्रात आणून त्याची विक्री केली जात असते. यापूर्वी महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील वाहनांचा वापर अवैध मद्य आणण्यासाठी केला जात असे. आता गुजरातमधील वाहनांचा वापर सुरू करण्यात आला असल्याचे नव्या कारवाईतून उघड झाले आहे. तलासरी तालुक्यात कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, अभिजीत मानकर आदींचे भरारी पथक तलासरी तालुक्यात गस्त घालत असताना त्यांनी गुजरात राज्यातील मारुती स्विफ्ट कार (क्रमांक जीजे १५ पीपी ९६१५) ही थांबून तिची तपासणी केली, तेव्हा त्यात मद्याची तस्करी होत असल्याचे आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्याचे अठरा बॉक्स जप्त केले. हे मद्य दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी होते; परंतु कर चुकवून तस्करीच्या मार्गाने ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कारसह अवैध मद्याचे बॉक्स असा मिळून आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ‘यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे आयुक्त प्रदीप पवार, पालघरचे उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांना संदीप अहिरे, सत्यवान चोरघे, अमोल नलावडे, दीपक शेवाळे, प्रदीप गांगुर्डे, शशिकांत पाटील आदींनी मदत केली.

सावरकर स्मृतिदिनी घुसखोरांविरोधात देशव्यापी मोहिमेची मागणी

सावरकर स्मृतिदिनी घुसखोरांविरोधात देशव्यापी मोहिमेची मागणी मुंबई – पाटील मारुती मंदिर सभागृह, दादर (पश्चिम) येथे हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात…