Author: bittambatami.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही विभागात कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 8 ही विभागात दि.18/09/2024 व दि.19/09/2024 रोजी या दोन दिवसात छोटे बॅनर 1893 व मोठे बॅनर 623 असे एकुण 2516 बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीचे बॅनर प्रिंट करुन देणारे एकुण 22 प्रिंटींग करणाऱ्या व्यवसायीकांना विभाग कार्यालयामार्फत लेखी सुचना देण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे जाहिरात/बॅनर्स/पोस्टर्स छापु नये व तसे केल्यास त्यांना महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात येईल अश्याही सुचना देण्यात आल्या. यापुढे अनधिकृत बॅनर्स/होर्डींग्ज विरुध्द कारवाई तीव्र करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर – डॉ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर   भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपणाला दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी माहिती दिली की,   जर या पोलीस उपायुक्तांनी मध्ये उडी घेतली नसती तर भिवंडीत दंगल झाली असती; दंगल रोखणार्‍या अधिकाऱ्याला असे बक्षिस दिले जात असेल तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण होणार नाही तर काय होईल? आपणाला अंतर्गत माहिती अशी मिळत आहे की, या बदलीला  पोलीस दलातील अनेकअधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तेथील बीजेपीचा  एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता.  दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे सर्वे आले आहेत. त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काहीही करून सत्ताधारी वर्गाला दंगल भडकवायची आहे.  पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचे आणि दंगल घडवायची, हे तत्व सरकारचे आहे . मी पोलिसांनाच विनंती करेन की,  तुम्ही राजकीय हत्यार बनू नका. या सरकारला दंगल घडवूनच निवडणूक जिंकायची आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनू नका.  आपल्या देशातील हिंदूंना कधीच आक्रमक हिंसा आवडत नाही.  त्यामुळे येथे शांततेत जनजीवन चालू आहे. एकदा दंगल झाली की दंगलीनंतर जी सामाजिक द्वेषाची भिंत उभी राहते;  ती पडायला नंतर 20 – 25 वर्षे लागतात, समाजामध्ये जेव्हा विद्वेष पसरतो तेव्हा समाजामध्ये जो आपलेपणा असतो, तो गायब होतो. याचे भान ठेवण्याऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी दंगली माजवल्या जात आहेत.  काल बिहारमधील नेवाडा गावात  80 दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या. एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथातून  डॉ. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचे निर्मूलन ही संकल्पना मांडली होती.  पण, आताची परिस्थिती पाहता, जाती व्यवस्थेचे उच्चाटन तर होताना दिसत नाहीच;  किंबहुना, जातीयवाद अधिकच वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातले जातेय. आज जर भाजप 400 पार झाली असती तर काय झालं असतं,  याचा विचार करा ! दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांच्या मदतीला संविधानही आले नसते. सगळेच उघड्यावर आले असते.  कमीत कमी आज आमच्यासारखी माणसे बोलतात तरी! बिहारच्या बेलछीमध्ये 27 मे 1977 रोजी  अकरा दलितांना जीवंत जाळण्यात आले होते. त्यावेळेस विरोधात असणाऱ्या इंदिरा गांधी यांना गावात जाण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र,  इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलछी गावात गेल्या होत्या. त्यावेळी लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय त्यांच्या स्वागताला उभे होते. पण, आज एकटा तेजस्वी यादव बोलत आहे. सत्तेत असलेले शांत बसले आहेत.  आज आपण एवढा  प्रवास केला; देश एवढा पुढे गेला आणि आज आपण काय बघतोय तर दलितांचे गावच जाळून टाकले जातेय.   दलितांनी भारतात राहूच नये का? काय परिस्थिती आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. म्हणजे, ज्यांचे जीवन उद्ध्वस्त आहे : त्यांना तुम्ही जगूही देत नाहीत? खरंतर इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी नेवाड्याचा दौरा करून अत्याचारग्रस्त दलितांच्या सोबत आम्ही आहोत, हे सांगायला हवे आहे. त्यांना आता आधाराची गरज आहे. आपली मागणी आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवाय. ते स्वतः मागासवर्गीय आहेत. त्यांच्या राज्यात जर दलित, आदिवासी,  मागासवर्गीयांवर अत्याचार होत असेल तर ते शोभनीय नाहीच. नितीशकुमार हे जर लोहिया, कर्पूरी ठाकूर यांचा वारसा सांगून समाजवादी विचारधारेवर चालत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायलाच हवी. अशा घटनांकडे पाहून दलित, मागासवर्गीयांनी काय विचार करावा, हा देश आमचा राहिला आहे की नाही?, असा सवालही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. चौकट वन नेशन… वन इलेक्शन बाबत पत्रकारांनी विचारले असता, हे फक्त वन नेशन… वन इलेक्शन हा प्रकार नाही. तर वन लीडर आणण्याचा प्रकार आहे. या देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याची ही सुरूवात झाली आहे. या निर्णयाने सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल. भारतीय संविधानाने दिलेला संसदीय लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करण्याची आणि त्यातून संविधान संपवण्याची ही तयारी सुरू झाली आहे. पण, आम्ही जीव देऊ पण संविधान बदलू देणार नाही, असा इशाराही डॉ. आव्हाड यांनी यावेळेस दिला. 00000

मिरा भाईंदर पालिकेतर्फे ‘स्वच्छता हीच सेवा ’ हा उपक्रम

भाईंदर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त  पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक…

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे निवासी पंच प्रशिक्षण शिबिर

मुंबई : येत्या २१ व २२ सप्टेंबर रोजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने पंचांचे निवासी प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्रमसाफल्य निवास, खंडाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. असोसिएशनचे…

 राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धा

 मुंबई उपनगरची १९ पदकांची कमाई   मुंबई : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या २१ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जंप रोप स्पर्धेत मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना ४ सुवर्ण, २ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून ३०० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांनी केले. क्रीडा संकुल, यशवंत महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या १२ खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या युग पटेल, आरोही कांबळे, हर्ष कांबळे, आशनी नितीन काळे, मन पटेल, उत्कर्ष शाह, मन मारू, नम्र वासानी, नैती वासानी यांनी पदके जिंकली. नम्र वासानी ने १ सुवर्ण, ३ कांस्य पदके पटकावली. तर आरोही कांबळे, नैती वासानी ने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदक जिंकले. मन पटेलने १ सुवर्ण, २ कांस्य पदकांची कमाई केली. युग पटेलला १ सुवर्ण, १ कांस्य पदक मिळाले. प्रशिक्षक विद्धेश मोरे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन मुंबई सब अर्बन जंप रोप संघटनेचे अध्यक्ष, स्वप्नील पहुरकर, सचिव, सौ. वर्षा काळे, खजिनदार, योगेश सांगळे यांनी केले.

राज्य तायक्वांदो अध्यक्षपदी संदीप ओंबासे यांची निवड

कल्याण : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप ओंबासे (ठाणे) तर सचिवपदी गफार पठाण (सातारा) यांची एकमताने निवड करण्यात आली. देशातील   शिखर संघटना इंडिया तायक्वांदो च्या मान्यतेने…

 आजपासून बारामतीमध्ये रंगणार

 खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धा   बारामती : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, क्रीडाजागृती आणि बारामती येथील एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून खेलो इंडीया वुमेन्स लीग स्पर्धेचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होत असलेल्या या स्पर्धा सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत. क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केवळ मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमीत्ताने बारामती तालुक्यामधील मुलींच्या क्रीडागुणांना वाव मिळवा म्हणून युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती तालुका स्तरावर शालेय मुलींसाठी तीन वयोगटात सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे २०० हुन अधिक मुलींनी सहभाग घेतला आहे. वुमेन्स लीग सायकल स्पर्धा सबज्युनीअर (१२ ते १६ वर्ष वयोगट), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) आणि १९ वर्ष व त्यावरील अशा तीन वयोगटात होईल. टाईम ट्रायल आणि रोड रेस (मास स्टार्ट) या दोन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आज, शुक्रवारी सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते होत आहे. याप्रसंगी बारामती शहराचा आणि तालुक्याचा क्रीडाक्षेत्रात नावलौकीक जगभर पसरवणा-या युवा खेळाडूंना सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सकाळी १०:०० वाजता खासदार सौ. सुनेत्रावहिणी पवार यांच्या शुभहस्ते स्पर्धेठिकाणी होणार असून यावेळी मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, बित्तमबातमिचे संपादक आणि सलग सहा वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना हजर राहुन वार्तांकन करणारे  संदीप चव्हाण, मराठीमधील पहिल्या महिला क्रीडा पत्रकार  स्वाती घोसाळकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, संयोजन समिती आणि बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास वायकर आदी मान्यवर हजर राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पंच मा. धरमेंदर लांबा यांची या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून नेमणूक झाली असून सुदाम रोकडे, दिपाली पाटील, मिनाक्षी शिंदे, प्रा. साईनाथ थोरात, भिकन अंबे, बिरु भोजने, संजय दराडे स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पार पाडणार आहेत. केंद्र सरकारतर्फे साईचे निरीक्षक म्हणून सार्थक गंगावणे आणि कुस्ती प्रशिक्षक अमरसिंग निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे. 0000

कर्जत नवनिर्वाचित तहसीलदार धनंजय जाधव यांचे उप अधीक्षक भूमि अभिलेख कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

आज ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या…