Author: bittambatami.com

 ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर!

ठाण्यात घुमणार शिवशाहीचा जागर! जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे भव्य ‘शिवजयंती उत्सव २०२६’ चे आयोजन ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातील ‘जनस्वराज्य प्रतिष्ठान’ च्या वतीने गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती सोहळ्याचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून ऐतिहासिक संस्कृती, समाजप्रबोधन आणि जनसेवा यांचा त्रिवेणी संगम ९० फिट रोड, पारसिक नगर, खारीगांव, कळवा येथे ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार निरंजन डावखरे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर कृष्णा दादु पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. मुख्य सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  संजय केळकर उपस्थित राहणार असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार आहेत. संदिप लेले (जिल्हाध्यक्ष, भाजपा), राजाराम साळवी (अध्यक्ष, आगरी सेना), दशरथ पाटील (उपनेते, शिवसेना) ,संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे (ज्येष्ठ नगरसेवक), विकास पाटील (नगरसेवक), अशोक भोईर (माजी उपमहापौर), सचिन मोरे (अध्यक्ष, के.बी.पी. कॉलेज) आणि विक्रम भोईर (सरचिटणीस, भाजपा) मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. तसेच परिसरातील सर्व स्थानिक नगरसेवकांची देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात गायक नंदेश उमप यांचा ‘शिवगिते व पोवाड्यांचा नजराणा’. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्यांच्या माध्यमातून जिवंत केला जाईल. तसेच, प्रा. विशाल गरुड यांचे ओघवते व्याख्यान तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. शिवताल ढोल ताशा पथक (नाशिक) यांच्या कडकडाटात निघणारी मिरवणूक आणि वाद्यवादन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.. केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत जनस्वराज्य ही संस्था विविध उपक्रम राबवते आहेत. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. “हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ठाणेकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील व त्यांचे विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता

ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथे विशेष पोक्सो न्यायालय (मा. न्यायाधीश रुबी मालवणकर) यांनी विशेष सत्र प्रकरण क्र. ०९/२०२६…

 आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई

आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई बिल्डर मेहता यांच्या कंपनीविरुद्ध खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने मोठा निर्णय मिरा – भाईंदर/ अरविंद जोशी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण कोर्टाने सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणात खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने निकाल दिला. कंपनीचे प्रवर्तक आणि जबाबदार अधिकारी आमदार नरेंद्र एल. मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला कडक शब्दांत फटकारले. कोर्टाने या प्रकरणाला सेवेतील कमतरता, फसवणूक आणि अनुचित व्यापार असल्याचे म्हटले आहे. मनोज दुबे यांनी १२ फेब्रुवारी २०१३ रोजी भाईंदर (पूर्व) येथील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक डी/७०६ साठी नोंदणीकृत करार केला आणि मोठी रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्याने इंडियाबुल्स फायनान्सकडून गृहकर्जासाठी अर्ज केला, परंतु बिल्डरकडे ७ व्या मजल्याच्या बांधकामासाठी मंजूर आराखडा नव्हता, कारण परवानगी फक्त ४ थ्या मजल्यापर्यंतच देण्यात आली होती. या कारणास्तव, बँकेने कर्ज रद्द केले. नंतर, बिल्डरने सुधारित परवानगी घेतली, परंतु मेहता अँड कंपनीने तरीही भरीव व्याज आणि दंडाची मागणी केली, पेमेंटमध्ये विलंब झाल्याचे कारण खरेदीदाराला जबाबदार धरले. कंपनीच्या मागणीबाबत, कोर्टाने म्हटले की बिल्डर स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही, कारण परवानगीशिवाय ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकण्याचा करार करणे हा गंभीर गुन्हा आहे. रद्द करणे आणि धमकावणे वृत्ती खरेदीदार मनोज दुबे यांनी दुसऱ्या बँकेकडून कर्जाची व्यवस्था करून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ९ जानेवारी २०१४ रोजी, बिल्डरने एकतर्फीपणे करार रद्द करणारे पत्र जारी केले आणि पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला. मेहताच्या वर्तनाबाबत, कोर्टाने म्हटले की नोंदणीकृत करार केवळ पत्राद्वारे रद्द करता येत नाही आणि बिल्डरचे वर्तन स्पष्टपणे अन्याय्य होते. कोर्टाला असेही आढळून आले की वाटप पत्रात क्षेत्रफळ ५९० चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे, तर करारात कार्पेट क्षेत्रफळ ४७२ चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे. ही तफावत देखील बेकायदेशीर आणि अस्पष्ट आहे. कोर्टाचा आदेश आयोगाने बिल्डर, प्रवर्तक नरेंद्र एल. मेहता आणि रजनीकांत सिंग यांना संयुक्तपणे जबाबदार धरले आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्यांनी खरेदीदाराला मानसिक छळासाठी भरपाई म्हणून ₹२.५ लाख, खटल्याचा खर्च म्हणून ₹५०,००० आणि प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत दररोज ₹१,००० देण्याचे आदेश दिले. आयोगाच्या या आदेशात स्पष्ट केले आहे की बांधकाम व्यावसायिक वैध परवानगीशिवाय करार करू शकत नाहीत आणि बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे होणाऱ्या विलंबासाठी खरेदीदारांना दंड आकारला जाऊ शकत नाही. रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आवश्यक आहे.…

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे. `टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

  दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी

शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.  हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले. जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू अनिल ठाणेकर मुंबई – राज्यातील शासकीय रुग्णालयांतील सेवांवर शुल्क आकारण्याबाबत जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ रद्द करावा आणि…

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर,-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तर लाखो शिवसैनिकांसाठी एक ऊर्जास्त्रोत आणि सामान्यांसाठी आधारवड आहेत. त्यांच्या विचारांतील…

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगर पालिका हद्दीत ८.२४ किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, ही तोडलेली झाडे…

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात प्रथमच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन १४ फेब्रुवारी रोजी पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना आणि जिव्हाळा यांच्या पुढाकारातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवस भरगच्च असणार आहे. सकाळी ‘संस्कृती दर्शन’ फेरीने संमेलनाची सुरुवात होणार असून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विविध सत्रे पार पडतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिका कुसुम आलाम असतील. उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. भास्कर,भगरे तसेच नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर या आमदारांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, माजी महापौर रंजना भानसे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त दिनकर पावरा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, आदिवासी प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात आदिवासींचे वास्तव जीवन साहित्यात आहे का ?, या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय लोहकरे असतील. डॉ. पद्माकर सहारे, डॉ. सुलतान पवार, डॉ. मधुचंद्र भुसारे, साहित्यिक रवी बुधर आणि लेखक राजू ठोकळ हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मुलाखत सत्रात साहित्यिक देवचंद महाले विविध आदिवासी साहित्यिक, राजकारणी व कलाकारांच्या मुलाखती घेणार आहेत. महिला सत्राच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा चौरे असून या सत्रात आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर युवा कवी संतोष पावरा यांच्या सहभागातून नवोदित कवी संमेलन होईल. निमंत्रित कविसंमेलन ज्येष्ठ कवी तुकाराम धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याशिवाय सांस्कृतिक फेरी, लघुनाट्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, चित्रप्रदर्शन आदी कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. काही लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यातील आदिवासी साहित्य, संस्कृती आणि विचारप्रवाह यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.