Author: bittambatami.com

आणीबाणीचा विरोध तुम्हाला का झोंबतो…?

२६ जून २०२४ रोजी लोकसभेचे नवे सभापती म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर केलेल्या भाषणात बिर्ला यांनी १९७५ मध्ये देशात याच दिवशी लावलेल्या आणीबाणीचा उल्लेख करत त्या निर्णयावर टीका…

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरने यांना झारखंडज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर…

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरजची आत्महत्या

 कुस्ती जगतावर शोककळा सांगली : कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्याच्या आत्महत्येमुळे कुस्ती जगतावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.…

महाराष्ट्रात चार महिन्यांत ८३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात  राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत…

कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, या योजनांसाठी कुठून आणणार?

खडसेंचा अजित पवरांना सवाल मुंबई : भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास…

हा अर्थसंकल्प ‘थापां’चा महापुर- उद्धव ठाकरे

मुंबई – निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे…

थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प – फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर देत शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प…

‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका मुंबई  :- आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील…

महाराष्ट्रात घोषणांचा ‘अर्थ’पुर्ण पाऊस

० मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये ० मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत ० महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’ ० वारकरी बांधवांसाठी…

राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी नकोच

मुंबई, ता. २७ : राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी घेतली आहे. परिवहनेतर संवर्गातील वाहनांची (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करण्यासाठी त्यांना एग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीच्या अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते. अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना समितीच्या अहवालात होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरी भागातही बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे.